Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send us a textआयुष्यात, तुम्हाला अधूनमधून साप चावणारच. इथे साप हे एक रुपक आहे. कोणीतरी तुमचा विश्वासघात करतो. जोडीदार खोटे बोलतो. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी गैरवर्तन करतो. मित्र तुम्हाला निराश करतो. सहकारी तुमच्या कामाचे श्रेय घेतो. तुमच्या कामाचे तुम्हाला बक्षीस मिळत नाही. हेच ते चावणारे साप..!!

Send us a textनंतर गोविंद पंत उभे राहिले, "सदाशिवने सांगितले आम्ही आता जेष्ठ आहोत. अहो, पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचा बालीशपणा अजूनही आहे. आयुष्य सुंदर जगायचं तर तो खूप फायद्याचा असतो. आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच. पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा! त्याला कारणही ह्या सर्व आपल्या मैत्रिणी. ह्या ग्रुप मधे वेगवेगळे उपक्रम राबवतात. महिन्यातून चार पाच वेळा आपल्या खवय्या पार्ट्या असतात. त्यात आम्ही पुरुष कधी स्वयंपाक घरात घुसलो नव्हतो, आता मस्त डिशेस बनवतो. आपले सारे छंद, आवडी आमच्या संसाराच्या कामामुळे जोपासले नव्हते, ते आता पूर्ण करता आलेत.

Send us a textआपल्या आतड्यात 100 ट्रिलियनपेक्षा जास्त सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) असू शकतात, जे 300 ते 1000 पेक्षा जास्त प्रजातींचे असू शकतात, आणि त्यांचे एकत्रित वजन सुमारे 1 ते 2 किलोग्रॅम (एका मोठ्या मांजरीएवढे) असू शकते. हे सूक्ष्मजंतू पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती आणि शरीरातील जीवनसत्त्वे तयार करण्यात मदत करतात, आणि ते चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात, जे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण ते आपल्या जगण्याच्या प्रयत्नांमध्ये खूप चांगल्या गोष्टी करतात.

Send us a text"प्रेमात पडल्यावर अनेक निर्णय भावना आणि मोहाने घेतले जातात . पण आयुष्यात खरं समाधान हवं असेल, तर काही वेळा फक्त प्रेम पुरेसं ठरत नाही. अशा वेळी मनातला आतला आवाज ऐकावा लागतो… आणि त्यानुसार पाऊल टाकण्यासाठी धाडसही दाखवावं लागतं."

Send us a textखरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंत असले पाहिजेत. रात्रंदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल कलाम आणि सीव्ही रामन...!!! याच पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठाय? १५ सेकंदांच्या जगात बंदिस्त......

Send us a textसन १८१७ मध्ये फ्रेंच चिकित्सक हेन्री ड्युट्रोचेट यांनी त्वचेच्या प्रत्यारोपणावर गॅझेट डी सांतेच्या संपादकाला एक पत्र लिहिले होते जे भारतात तैनात असलेल्या त्यांच्या मेहुण्याच्या कथेवर आधारित आहे. पत्रानुसार, सैन्याच्या अधीनस्थ व्यक्तीला त्याचे नाक कापून शिक्षा देण्यात आली होती. त्या माणसाने त्वचेचे ग्राफ्टिंग करण्यात पारंगत असलेल्या स्थानिक लोकांचा शोध घेतला आणि त्याच्या नाकाची शस्त्रक्रिया करून पुनर्बांधणी केली. ड्युट्रोचेटच्या पत्राच्या सत्यतेबद्दल अनिश्चितता असली तरी शेकडो वर्षांपूर्वी भारतात त्वचा ग्राफ्टिंग करण्याच्या पद्धती अस्तित्वात होत्या असे उल्लेख अनेक स्रोतांमध्ये दिले आहे.

Send us a textपहाटेच्या सुमारास आजोबांचा श्वास मंदावत गेला आणि थोड्याच वेळात तो थांबला. मेजरने नर्सला जाऊन सांगितले. मेजरने तिला विचारले, “कोण होते ते?” ते माझे वडील नव्हते. मी त्यांना याआधी कधीच पाहिले नव्हते.”नर्स अधिकच गोंधळली. “मग मी तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन गेले तेव्हा तुम्ही काही का नाही बोललात?” तिने विचारले.मेजर म्हणाले , “तेव्हाच मला कळले होते की काहीतरी चूक झाली आहे. पण मला हेही माहीत होते की त्यांना त्यांच्या शेवटच्या घडीत त्यांच्या मुलाची गरज आहे, आणि त्यांचा मुलगा इथे नाही.म्हणून मी थांबलो, त्यांचा मुलगा म्हणून.”नर्स शांतपणे ऐकत राहिली.....==========

Send us a textतितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता.

Send us a text‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला' ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आपण सर्वांनी ऐकलेली आहे. परंतु, वास्तवात मादी नव्हे तर नर सुगरण पक्षी काडी-काडी जमा करून खोपा विणतो आणि मादीला आकर्षित करतो. त्याच झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना किंवा झाडांना तो किमान दोन तर कमाल आठ ते दहा घरटी बांधतो.

Send us a textभगवंत म्हणले, "पाप काय आहे हे दुर्योधनच काय, तूही जाणतोस. तुला माहीत आहे ‘हे हेल्दी नाही' तरीसुद्धा तू जेवण निवडताना तळण, चीज, ब्रेड, पिझ्झा, बर्गर असं जिभेला आवडणारं तेच निवडतोस.""तुला रात्री झोपायची वेळ कळते. सकाळी उठायचं महत्वही कळतं. पण तरीही रात्र–रात्र जागून सिनेमे, सीरियल्स, रील्स पाहत बसतोस." "दुर्योधनाने माझं सांगणं ऐकलं…पण आपल्यात बदल करायचा नाकारला.""तुझे तरी वेगळे कुठय? आई, बाबा, आपले मन यांचे ऐकलेस कधी?......"================

Send us a textया स्टेशनचा एकमेव नियमित प्रवासी होती हायस्कूलमध्ये शिकणारी काना हराडा.तिच्या शिक्षणासाठी प्रवासाचा हा एकमेव मार्ग होता. स्टेशन बंद झालं असतं, तर तिची शाळाच बंद पडली असती.हे लक्षात येताच जपानी रेल्वेने आपला स्टेशन बंद करण्याचा निर्णय ३ वर्षे थांबवला....

Send us a textहजारो वर्षे पोलियो सक्रिय परंतु स्थिर अवस्थेत अस्तित्वात होता. १८८० नंतर पोलियोच्या साथींचे युरोपामध्ये मोठे उद्रेक होऊ लागले आणि नंतर लगेचच अमेरिकेत पोलियोच्या साथीचा प्रसार झाला. १९१० पर्यंत जगात पोलियोचा खूपच प्रसार झाला होता, आणि त्याच्या साथींचा उद्रेक ही अगदी नेहेमीची घटना होऊ लागली. या साथींमुळे हजारो मुले आणि प्रौढ व्यक्ती अपंग झाल्या, व यामुळे पोलियोवर उपायकारक लस शोधण्यासाठी 'महाशर्यत' सुरू होण्यास जोर मिळाला.

Send us a textनॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. "कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू" असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते..

Send us a textवॉल्टर हंट एका मित्राचा १५ डॉलर्सचा कर्जदार होता. कर्ज फेडायचं होतं पण हाताशी पैसे नव्हतेच मुळी .हंटच्या हातात होती ८ इंच लांबीची पितळी तार. त्याने ती तार बोटांनी वाकवायला सुरुवात केली. वळणावर वळण, एका टोकाला स्प्रिंगसारखी रचना, आणि दुसऱ्या टोकाला टोकदार सुई झाकणारी सुरक्षित कवच.आणि मग काही वेळातच……त्या विलक्षण क्षणी .सेफ्टी पिनचा जन्म झाला.

Send us a text“तुझ्या गणिताच्या शिकवणीची फी फक्त एक पैसा. पण मला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. तू बोर्डाच्या दोन्ही गणिताच्या पेपरमध्ये प्रथम येऊन दाखव.” बर्वे सर ठामपणे म्हणाले.श्रीरंग गुणे सरांनी सुरेशचं इंग्रजी घडवलं. त्याच्यात दडलेलं तेज त्यांनी ओळखलं आणि त्याला सामान्यपणात अडकू दिलं नाही. सतत पुढची दिशा दाखवत, त्याला मोठं होण्यासाठी प्रवृत्त करत राहिले.या दोन्ही गुरुवर्यांचा मान राखत सुरेश बोर्डाच्या परीक्षेत अडतिसावा आला. पुढे अमेरिकेत गेला आणि डॉक्टरेट मिळवली.आज तो आवर्जून सांगतो — “Student is a barrel of explosives, and a good teacher is the one who ignites the spark.”

Send us a textबेरिंग सामुद्रधुनीत दोन छोटी बेटं आहेत – लिटल डायोमीड आणि बिग डायोमीड. या दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं आहे!हिवाळ्यात जेव्हा समुद्र गोठतो, तेव्हा हे दोन बेटं बर्फाच्या पुलानं जोडली जातात. काही धाडसी लोक चालत एक बेटावरून दुसऱ्या बेटावर जातात – म्हणजे आज मधून उद्यात किंवा उद्यातून आज मधे !एका बेटावर दिवस संपत असतो,तर समोरच्या बेटावर तोच क्षण पुढच्या दिवसाचा असतो.

Send us a textबाबांनी मला दिलेल्या शिक्षेची ना आईने दखल घेतली ना आजीने.चुक ही चुकच असते...ती आड अंगाने,सुचवायची गोष्ट नसते,ही पालकत्वाची जबाबदारी आमच्या पिढीपर्यंत शिक्षेच्या माध्यमातून अमलात येत होती.वाचनाचे वेड जसं वाढत गेलं,तसं आईने दोन तीन लेखकांची पुस्तके वाचायची नाहीत... असं एकदाच बजावलं होतं.आजही लायब्ररीचे भांडार समोर उभे असुन,वयाचे सारे निर्बंध संपलेले असुनदेखील,कुतूहल म्हणुनही ...काही पुस्तके हातात घ्यावीशी वाटत नाहीत.जिम ट्रेनर, डाएटीशन, आणि काँन्सिलर हे त्रिकुट कुटुंब संस्थेतच कुठे ना कुठेतरी,कोणत्यातरी नात्याच्या रुपात लपलेलं असायचं!======

Send us a textया वर्षी आपण वंदेमातरम या गीताची १५०वर्ष पूर्ती साजरी करत आहोत. सात नोव्हेंबर या दिवशी १८७५ साली बँकिंचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम ही सहा दिव्य श्लोक किंवा कडवी असलेली स्वर्गीय रचना केली. जगाच्या पाठीवर एव्हढी उदात्त रचना झाली नाहीये आणि होणार ही नाही.... कारण मातृभूमी बद्दल एव्हढी उदात्त संकल्पना ही याच भूमीचं, याच संस्कृतीचं देणं आहे.... या भूमीला केवळ माताच नव्हे तर देवीचे स्थान देणारी आपली संस्कृती.... आणि पारतंत्र्याच्या काळात सर्व समाजाला जागृत करणारं हे महाकाव्य याच उदात्ततेचे अधिष्ठान....

Send us a textबालपणापासून आपल्याला ‘जीवनातील प्रार्थनेचं महत्व‘ सांगितले जाते. जेव्हा काही समजतही नव्हते, तेव्हासुद्धा देवासमोर उभं करून हात जोडायला शिकवले जायचे. थोडे समजायला लागल्यावर “बाप्पाला सांग मला चांगली बुद्धी दे”, असं बोलायला शिकवले. आणखी थोडे समजदार झाले तेव्हा स्वतःला जमेल, पटेल तशी प्रार्थना करायला लागलो. या प्रार्थनेमध्ये मनाला शांत करण्याची अमाप शक्ति आहे. म्हणून आयुष्यात कोणतेही संकट आले की मनुष्य ईश्वराच्या दारी धाव घेतो.

Send us a textकर्नाटकातील बेलवडी येथील (आताचे यादवाड) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प हे एक प्राचीन शिल्प आहे, जे १६७८ साली म्हणजे त्यांच्या हयातीतच बनवले गेले होते. हे शिल्प तेथील श्री. मारुती मंदिरात सापडले आहे आणि ते बेलवडीच्या मराठा मोहिमे दरम्यानचे आहे. हे शिल्प खास आहे कारण ते छत्रपतींच्या काळात तेथील राणीने तयार केले होते, असे मानले जाते..

Send us a textगोविंद म्हणाला, " मला माझ्या आईसाठी चप्पल हवी आहे. ती नेहमी अनवाणीच असते, त्यामुळे तिच्या चपलेचं माप नाहीये माझ्याकडे. हो, पण माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नसलं तरी तिच्या पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का?"दुकानदाराला हे अजबच वाटलं. तो म्हणाला, "याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही?" तेव्हा गोविंद म्हणाला, "माझी आई गावाला राहते. शिवाय आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती." असे म्हणत त्यानं आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराचे डोळे पाणावले.

Send us a textआजकाल अनावश्यक विचार किंवा अतिविचार (ओवरथिंकिंग) करणे, ही एक सामान्य समस्या बनली आहे. लहानसहान गोष्टींवर सतत विचार करणे, भविष्याची काळजी करणे किंवा एकाच विचारात अडकून पडणे, या गोष्टी आपल्या मनाची शांती हिरावून घेतात. जपानी जीवनशैलीमध्ये अशा अनेक परंपरा आणि तंत्रे आहेत, जी मन शांत ठेवण्यास, संतुलन राखण्यास आणि अनावश्यक विचारांना थांबवण्यास मदत करतात.

Send us a textFully conscious and in good health, I am writing today my will.After my death, Ransack my roomSearch each item, That is scatteredUnlocked Everywhere in my house.Donate my dreams, To all those womenWho between the confines ofThe kitchen and the bedroomHave lost their worldHave forgotten years agoWhat it is to dream.Scatter my laughterAmong the inmates of old-age homesWhose children, Are lostTo the glittering cities of America.There are some colours, Lying on my tableWith them dye the sari of the girlWhose border is edged, With the blood of her manWho wrapped in the tricolor, Was laid to rest last evening.Give my tears, To all the poetsEvery drop, Will birth a poemI promise.Make sure you catch the youth Of the country, everyone And inject themWith my indignation, They will need itCome the revolution.My ecstasy एस्टेसी Belongs toThat Sufi, WhoAbandoning everythingHas set off in search of God.Finally,What's left? My envyMy greed, My angerMy lies, My selfishnessThese simply Cremate with me... ---- बाबूषा कोहिली

Send us a text"आपली शेती फायद्याची बिलकुल नाही याचा दिंडोरा पिटणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना कोण आपली मुलगी देईल? हरणाऱ्या घोड्यावर कोणी पैसे लावत नसतोय!मुलांनी शेतीतील नवनवी तंत्रे शिकून घेऊन दरवर्षी ५० लाखांची पॅकेज काढतोय असे सांगितलं तर का त्याचे लग्न होणार नाही? शिका, योग्य मेहनत करा आणि लाखोंनी कमवा. समृद्धी कोणाला नकोय?" नाना म्हणाले.

Send us a textलहानपणापासून पॅरासेल्ससचं निरीक्षण अफाट.त्याला दगडांमध्ये, धातूंमध्ये, औषधी वनस्पतींमध्ये ‘ऊर्जेचं तत्त्व' दिसायचं. तो म्हणायचा,”जगातील प्रत्येक गोष्ट विषारी आहे;फक्त त्याचं प्रमाण ठरवतं की ती औषध ठरेल की विष.”त्यानं पार्याचं, शिश्याचे आणि इतर विषारी धातूंचं सूक्ष्म प्रमाणात वापर करून अनेक आजार बरे केले; सिफिलिस ह्या त्याकाळच्या भयानक लैंगिक रोगावर त्याने नियंत्रित मात्रेत पारा वापरला. जो भयंकर विषारी मानला जात असे. मलम, वाफ आणि लहान डोस देऊन रोगावर आघात केला.रोग बरा होऊ लागला. लोक अचंबित झाले. ”विषातूनच औषध?” हा त्याच्या उपचार पद्धतीच विजय होता.

Send us a textविसाव्या शतकाच्या मध्यात डीएनएची रचना कशी शोधली गेली याची ही कहाणी आहे, ही महत्त्वाकांक्षा, सहकार्य आणि स्पर्धेची कहाणी आहे. या शोधाच्या जनकांपैकी एक असलेले जेम्स वॅाटसन यांचे काही दिवसांपूर्वी म्हणजे, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ वॉटसन पदक विकून वादात अडकले. मात्र, त्यांच्या आयुष्यात असे वादाचे अनेक प्रसंग आले. आई-वडिलांचे एकुलते एक असलेले जेम्स स्कॉटलंडहून अमेरिकेला आले व तिथे स्थायिक झाले.

Send us a textदुसऱ्या दिवशी मृत्युदूत पुन्हा त्या दालनात गेला. सर्वत्र नजर फिरवत तो म्हणाला, "अहाहा, काय सुंदर कारागिरी! एक चूक सोडली तर...""अगदी हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणाऱ्या १२ मूर्ती आहेत ह्या!""चूक ? कोणती चूक ?", समोरून प्रश्न आला.

Send us a textसुनीताबाईंनी त्या संध्याकाळी बोरकरांच्या कविता एकामागून एक, जादू उलगडत जावी तशा ऊलगडल्या. ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो. त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व, बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहिलं.."आहे मनोहर तरी" या सुनीताबाईंच्या आत्मचरित्राबद्दल लेखक त्यांना म्हणतात ..."पुलंचं अख्खं आयुष्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीची एवढी प्रदीर्घ कहाणी आहे, ती तुमच्यादेखत घडली. तुमच्या काळातली आकाशाएवढय़ा उंचीची अनेक माणसं तुमच्या आयुष्यात, घरात राहून, वावरून गेली. अनेक प्रसंगांना, गप्पांना, महत्त्वाच्या वादविवादांना तुम्ही साक्षी होतात. हे सगळं नोंदवणारी, टिपू शकणारी, त्याचं महत्त्व माहिती असणारी प्रखर बुद्धिमत्ता तुमच्यापाशी होती; तर तुम्ही त्यातलं काहीही न लिहिता, पुलंनी कपाटात ठेवलेल्या शर्टाच्या घडय़ा मोडून त्यांची इस्त्री कशी विस्कटली, हे इतकं सामान्य काहीतरी कसं काय लिहिता तुमच्या पुस्तकात? याला काही अर्थ तरी आहे का?''

Send us a textजेव्हा नॉर्मनने त्याच्या बरे होण्याच्या शक्यतांबद्दल विचारले तेव्हा डॉक्टरांनी त्याला असं काहीतरी सांगितलं की ते ऐकून तो गार पडला:ते म्हणाले,"पाचशे रुग्णांपैकी फक्त एकच यातून वाचतो."त्या रात्री, नॉर्मनने जीवन बदलणारा निर्णय घेतला.‘जर पारंपारिक औषध त्याला वाचवू शकत नसेल, तर तो स्वतः त्याच्या जीवनासाठी लढेल‘ हाच तो निर्णय..!

Send us a textफळवाल्या म्हातारीला कृष्ण म्हणतो, "ती सगळीच फळं मला दे. "म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."कृष्ण निरागसपणे विचारतो, "मोल म्हणजे काय ?" त्यावर ती समजावून सांगते, "लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात."कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मागत नाही? गोपी सुद्धा मला दही दूध लोणी देतात माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्या माझ्याकडून काही घेत नाहीत. "

Send us a textकाय अद्भुत होतं ते दृश्य!विजयी अल्फा नरने दुसऱ्याच्या मानेवर फक्त हलके दात टेकवले. चावा नाही, रक्तपात नाही . त्या क्षणी सत्तेचा प्रश्न सुटला होता.पराभूतात भेकडपणा नव्हता, विजेत्यात दया नव्हती — फक्त एक नाजूक समतोल होता. दोघांनीही एकमेकांकडे पाठ फिरवली. टोळी पुन्हा शांत झाली.

Send us a text‘पिट्सबर्ग डिसपॅच' या स्थानिक वृत्तपत्रात‘मुली कसल्या कामाच्या?' अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक खरमरीत प्रतिक्रिया लिहून पाठवून दिली. ती संपादकांना आवडली. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात तिला एक छोटा स्तंभलिहिण्याची संधी दिली. त्याकाळी स्त्रिया सहसा टोपणनावाने लेखन करीत. वृत्तपत्राच्या संपादकाने 'नेल्ली ब्लाय' हेच नाव टोपणनाव म्हणून दिले.

Send us a textअगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्राची होती. ते मेंदूच्या बुडाशी असलेलं बदामाच्या आकाराचं केंद्र (Amygdala) सतत धोक्याची घंटा वाजवत राही. मेंदूच्या इतर सगळ्या कर्त्याकरवत्या केंद्रांचं लक्ष नेहमी त्या बदामकेंद्रावरच खिळून असे.

Send us a textजेव्हा मोहम्मद घोरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला, तेव्हा "गजनीचे सर्वोच्च काझी व मोहम्मद घोरीचे गुरु निजामुल्क" यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले –"या घोरी या! आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्थानवर विजय मिळवून इस्लामचे नाव उजळवलेस. सांग, त्या ‘सोने की चिड़ीया' हिंदुस्थानचे किती पंख कापून आणलेस?"

Send us a textआपल्या हाताला धरून चालायला शिकलेली आपली मुलं जेव्हा मोठी होतात... शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आचार-विचार-अनुभवांची कक्षा रुंदावत जाते. त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीचा सामना करण्यातून ती परिपक्व होत जातात... आणि मग अशी वेळ येते जेव्हा त्यांच्या हाताला धरून आपली वाटचाल सुरू होते...

Send us a textरमेशजींचं वय आता ६५ वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरकोळ कारणांवर नाराज होणं, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता.घरच्यांना खूप त्रास व्हायचा. पत्नी विचारायची, “काय झालंय रमेशजींना? आधी इतके आनंदी असायचे, आता जरा जरी काही झालं तरी संतापतात.” मुलंही आता त्यांच्याशी बोलायला घाबरू लागली होती. रमेशजींनाही जाणवू लागलं होतं की ते स्वतः बदलले आहेत. त्यांनाही स्वतःवर राग यायचा — “मी असं का वागतोय? हा चिडचिडेपणा माझ्यात आला कुठून?”

Send us a text'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. तरीपण त्याला याची जाणीवच झाली नाही, हे तिथं उपस्थित असलेल्या होरॅस वेल्स या डेंटिस्टनं पाहिलं. दात काढताना त्याचे पेशंट मोठ्यामोठ्याने ओरडल्याने बाहेर बसलेले पेशंट देखील घाबरून पळून जात असत म्हणून तो त्रस्त होता. मग त्याने विचार केला, उद्या आपण याचा प्रयोग करून बघू.. आणि हा प्रयोग त्याने स्वतःवरच लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचा दात काढून घेऊन केला. त्याला अजिबात दुखले नाही. तो यशस्वी झाला.

Send us a textमानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले... कानाने अजिबात ऐकू येत नसल्याने कंपनांची जाणीव हेच तिचं इंद्रिय झालं होतं कंपनांच्या जाणिवेतून सुरू झालेला तिचा प्रवास आज तिला अभियंता म्हणून स्वतःच्या पायावर उभा करता झाला. यामागे आहे, तिच्या आईची अतूट इच्छाशक्ती... !

Send us a text"आयुष्याचा वेग आपणच कमी करावा लागतो, काम कधीच संपत नसतात, आपणच ठरवून थांबायचं असत..काही बिघडत नाही चार गोष्टी झाल्या नाहीत तर ."

Send us a text"तू नाही रे महिषासुर, तू माझ्यातला महिषासुर मारला आहेस, गैरसमजा चा, रागाचा.."

Send us a textप्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक चांगली व्यक्ती बनवायचे असते, जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस म्हणून घडू शकेल. जर आपण चांगल्या पालकत्वाबद्दल विचार केला, तर यामध्ये मुलाला चांगले संस्कार देणे, त्याच्या पोषणाची काळजी घेणे, मुलाच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण जपानी पालकांकडून काही टिप्स घेऊ शकतो. उत्तम पालक बनणं हे खूप कठीण काम आहे. यात बरेच चढ-उतार येतात. जपानी मुले, कोणत्याही वयाची असो, त्यांची जगण्याची स्वतःची एक विशिष्ट पद्धत असते जी त्यांना जगावेगळे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध करते. खरं तर, जपानी मुल सार्वजनिक ठिकाणी रडताना दिसणं जवळजवळ दुर्मिळ आहे! कारण जपानी पालक मुलांच्या संगोपनासाठी खूप वेळ देतात. आपल्या मुलाला एक चांगला नागरीक बनवण्यासाठी त्यावर संस्कार करतात. म्हणून जपानी पालकत्वाची पद्धत जगभर प्रसिद्ध आहे. आज आपण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यासाठी काही जपानी टिप्स पहाणार आहोत.

Send us a textएकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण ‘आलं सरकारांच्या मना तिथं देवाचंबी चालंना‘ अशातली गत होती.मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील…छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं…., विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं.

Send us a textलहानपणी शाळेचा पीळ फार घट्ट असायचा.किंग जॉर्जमध्ये असताना आम्हाला वाटायचं — "आम्ही सॉलिड स्मार्ट आहोत, धीट आहोत." बालमोहनच्यांना आम्ही ‘गणू', बावळट म्हणायचो. एखाद्याचं अक्षर पाहून मी सांगू शकतो की तो किंग जॉर्जचा की बालमोहनचा! कारण बालमोहनच्यांचं अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे! ते हुशार असायचे, पण आमच्या मते अतिसुसंस्कृत — शिवीला अपशब्द म्हणायचे इतके सौम्य!आणि त्यांचं आमच्याबद्दलचं मत? "अतिशहाणे, हुशार, पण वात्रट!"आणि आजही कुणी विचारलं की — “किंग जॉर्ज की बालमोहन?” तर हसू येतं आणि आठवणींचं दार उघडतं!

Send us a text"काका मला डॉक्टर किंवा संगीतकार व्हायचा नाही. मला अगदी साध्या मुलाप्रमाणे जगायचं स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि हे मी माझ्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितलेय म्हणून तर मला या साध्या बसने प्रवास करता येतो."" तुम्ही माझ्या घरी याल तर तुम्ही पहाल की दोन परदेशी गाड्या ड्रायव्हर सकट सतत दाराशी उभ्या असतात. मी म्हणायचं अवकाश ते मला अकॅडमी पर्यंत सोडतील आणि संध्याकाळी परत घेण्यासाठी तिथेच थांबून देखील राहतील."वाटलं, संचित आणि त्याचे आई-बाबा खऱ्या अर्थाने एकमेकांचे संचित आहेत!

Send us a text"महागाई वाढली आहे हे तर नक्की. परंतु पैशाला किंमत उरली नाही असं जे आपण सहज म्हणून जातो ते खरं आहे का?""माझ्या आयुष्यात एक प्रसंग काही वर्षांपूर्वी घडला आणि एक दोन आठवड्यातला. पण दोन्ही लक्षात राहिले. कारण पैशाला किंमत आहे हे पटवून देणारा एक, आणि दुसरा पैशापेक्षा माणुसकी किंवा सहृदयतायांचं दर्शन घडवणारा!

Send us a textलोनपोगारनं सकाळीच आपल्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला, “बाळा, ह्या शंभर मेंढ्या घेऊन शहरात जा, पण हे लक्षात ठेव — ना त्यांना मारायचं, ना विकायचं! आणि तरीही शंभर पोती जव घेऊनच परत यायचं.तो शहरात एका रस्त्याच्या कडेला पाणावलेल्या डोळ्यांनी बसला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी आली, म्हणाली — “काय झालं रे? एवढं चिंतातुर का?” त्याची हकीकत ऐकल्यावर ती हसली आणि म्हणाली — “अरे एवढंच? मेंढ्यांची लोकर काढून विक आणि त्या पैशात शंभर पोती जव घेऊन घरी जा!”. मुलगा खुश झाला !

Send us a textगर्दीत वाट काढत एस टी च्या आत घुसणार तोच मला बघून कंडक्टर एकदम ओरडला." ओ, या बाईला आधी चढू द्या. ते दिवसा या बाईन् दिलेला शाप लागला मला.दोन दिवस जेवनाचे वांदे झालेले."मी उभी थरारले.मी दिलेला शाप ? नाही रे बाबा , माझ्यासारखी सामान्य लेकुरवाळी गृहिणी कसला शाप देणार ?गाडीत चढल्यावर आतून जाणवलं की हा शाप बाईने कुठे दिला होता ? हा तळतळाट 'आईचा' होता.कोणीही आतून अगदी आतून...आत्म्यातून दुखावलं गेलं तर उमटणा-या तळतळाटाची आग भाजून काढतेच काढते.तळतळाट घेऊच नये कोणाचा !

Send us a textएक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्य गेले. डॉक्टरांच्या टीमने आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला .ऑपरेशन साठी फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे त्या कॉलमच्या पुढे त्यांनी E.D. अस लिहलं. आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ...."ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील!"........

Send us a text“काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”* “ होय आहे !."“कधी घेतलात?”* “झाली की १५-२० वर्षे.”“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”* “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”“आता कुठे असतो.”* “माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.”“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”* “अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.”

Send us a textत्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती.."पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच?'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून..त्यातील काही लोक बोलू लागलं..'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आमच्याजवळ आले.'सायेब.. कुणीकडं?'कोल्हापूरला जातोय..'मग या माकडीणीला जनावरांचे सिव्हीलला नेऊन पोचवा.. बाकी सारे आमची कोल्हापूरची मानसं करत्यात.

Send us a textडेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल' आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल' या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!'' पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन'. तिथपासून आजपर्यंत डोपामाईन, ग्लुटामिक ॲसिड, सिरोटोनीन अशी १००-१२५ जीवरसायने आणि त्यांचे परस्पर संबंध यावर संशोधन होऊन स्किझोफ्रेनिया, नैराश्य, अतिचिंता, मंत्रचाळेपणा अशा मानसिक आजारांबरोबरीने कंपवात, स्मृतिभ्रंश अशा न्यूरोलॉजिकल आजारांवरची प्रभावी औषधं बनली आणि बनत आहेत.