Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send us Fan Mailहे ठिकाण पूर्वी 'गंधादन' वन म्हणून ओळखले जात असे. येथे मेधावी नावाचे एक महान ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना अपत्य नव्हते, म्हणून त्यांनी महालक्ष्मीची आराधना केली. एके दिवशी त्यांना वंजुल वृक्षाखाली एक लहान मुलगी सापडली. ऋषींनी तिचा सांभाळ आपल्या मुलीप्रमाणे केला आणि तिचे नाव 'वंजुलवल्ली' ठेवले. जेव्हा वंजुलवल्ली लग्नाच्या वयात आली, तेव्हा स्वतः भगवान विष्णू गरुडावर बसून तिच्याशी विवाह करण्यासाठी तिथे आले. पण एका कन्येच्या पित्याला, मेधावी ऋषींना, आपल्या लाडक्या मुलीला सासरी पाठवताना काळजी वाटत होती. म्हणून ऋषींनी भगवान विष्णूंकडे एक अट घातली. ते म्हणाले, "हे प्रभू, जर तुम्हाला माझ्या मुलीशी विवाह करायचा असेल, तर या घरात आणि या मंदिरात माझ्या मुलीचा शब्द अंतिम असेल, तिला तुमच्यापेक्षाही पहिला मान मिळेल." भक्ताच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विष्णूंनी हे मान्य केले.

Send us Fan Mailहा नैसर्गिक वायू पृथ्वीच्या पोटातून काढला जातो तेंव्हा तो वायू रुपात असतो आणि तो वायू रूपातच ठेवला आणि वहन करायचं म्हटलं तर त्याला प्रचंड मोठी जागा लागणार म्हणून याला द्रव रुपात परीवर्तित करावा लागतो आणि त्यासाठी त्याचे तापमान शून्याच्या खाली म्हणजेच वजा 163 डिग्री सेल्सिअस इतकं उतरावे लागते म्हणजे तो गॅस द्रावरूपात परीवर्तित करून आम्हाला आमच्या जहाजात नेता येतो, हे गॅस थंड करण्याचे एकमेव कारण म्हणजे 600 लिटर गॅस जेंव्हा -163 डिग्री वर थंड केला जातो त्यावेळी तो फक्त 1 लिटर द्रव इतकाच होतो.

Send us Fan Mailकाही दिवसांपूर्वी माझे मामे सासरे घरी आले होते. त्यांचा ठाम नियम — “माझ्याजागी देवाच्या पाया पडा.”त्यांचं म्हणणंही योग्यच.पण माझं थोडंसं वेगळं म्हणणे आहे.देवाला नमस्कार — तो रोजचा, मनापासून.पण माणसातल्या देवाला नमस्कार — तोही तितकाच आवश्यक.कारण देवाचे आशीर्वाद आपल्यामागे असणे गरजेचेच. पण ते ऐकू येत नाहीत, मोठ्यांचे ऐकू येत असलेले आशीर्वाद —“सुखी रहा”, “आनंदी रहा”, “यशस्वी हो”…हे शब्द कानावर पडतात, मनात मुरतात.

Send us Fan Mailजॉन स्टाइनबेक ह्या अमेरिकन नोबेल साहित्य पुरस्कार विजेत्या लेखकाची ही कथा आहे. मेक्सिकोच्या किनाऱ्यावर एक लहानसा कोळीवाडा आहे. किनो कोळ्याचं चं आयुष्य अगदी साधसुध आहे. बायकोच शांत, समजूतदार, आणि नवऱ्यावर जीव टाकणारी. त्यांच कधी पोट भरतं, कधी भरत नाही. पण ते समाधानी आहेत. त्यांना एक लहानसा मुलगा आहे — कोयोटिटो. जेमतेम काही महिन्यांचा. त्याच्या कडे एक विशेष कला आहे — समुद्रात बुडी मारून मोती काढण्याची.. एक दिवस त्याला एक मोती मिळाला . साधासुधा नाही. असा सफरचंदाच्या आकाराचा. चांदीसारखा चकाकणारा. आत अनेक चंद्र, अनेक आकाशगंगा सामावल्यासारखा. मोती कधीच कोणी बघितला नव्हता.......तो मोती आता फक्त एक वस्तू राहिला नव्हता. तो झाला होता एक आरसा. माणसांचं खरं रूप दाखवणारा आरसा.....

Send us Fan Mail३ एप्रिल १९७३. ठिकाण :न्यूयॉर्क शहर. सकाळचे साधारण दहा वाजले आहेत. सिक्स्थ ॲव्हेन्यूवर त्या एका माणसाकडे लोकं वळून वळून बघतायत.कारण त्याच्या हातात जी वस्तू आहे, ती दिसायला अगदी एखाद्या विटेसारखी आहे. लांबलचक, जाडजूड, वर एक मोठा अँटेना... आणि त्या विटेसारख्या वस्तूतून हा माणूस, चक्क बोलतोय! रस्त्याच्या मधोमध उभं राहून, फोनवर बोलतोय!ज्यादिवशी मार्टिन कूपरने तो फोन हातात घेतला, त्या दिवशी त्यांनी फक्त एक तांत्रिक चमत्कार केला नाही. त्यांनी माणसाला वायरच्या गुलामगिरीतून मुक्त केलं.

Send us Fan Mailशीलाने कामावरच्या लोकांसाठी लेमोनेड व फुलांचे गुच्छ घेतले. एक पर्फेक्ट बिझनेस मॅाडेल 12 वर्षांच्या अनाथ मायाने उभं केलं होते. आजीची रेसिपी, “लेमोनेड फॅार स्माईल्स” हे सुंदर नाव, “आजीचं लेमोनेड तुमचा सगळा शीण घालवेल!” अशी उत्तम टॅग लाईन व प्रमोशन..पाच लेमोनेड वर एक गुच्छ फुकट! कुठं शिकली हे सगळी एवढीशी पोरं ? लॅव्हेंडर, जिंजर-मिंट, बेरी असे किती प्रकारचे लेमोनेड होते!

Send us Fan Mailव्यंकटेश माडगूळकर यांचं पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली .. ही गोष्ट आयुष्यात फारच उपयोगी ठरली. माडगूळकरांच्या बहिणीचा कान ठणकत होता. डॉक्टर म्हणाले, "ऑपरेशन तर करावंच लागेल."माडगूळकर मग त्यांच्या एका परिचित वैद्याकडे बहिणीला घेऊन गेले. वैद्यांनी कान पाहिला. लक्षणं विचारली. औषध कानात टाकलं आणि म्हणाले, .. "तीन दिवसांत कान बरा होईल. काळजी करू नका ..!!" विशेष म्हणजे, या औषधानं कानाचा ठणका थांबला. फडफड बंद झाली. चांगले ऐकायला येऊ लागलं. ..!! माडगूळकर या लेखात म्हणतात .. 'कुठल्याही आजाराच्या बाबतीत आणखी एखाद्या डॉक्टरांचं किंवा वैद्याचं मत घ्यावंच. हे *सेकंड ओपिनियन* आपल्या समस्या कदाचित सोडवू शकतं

Send us Fan Mailन्यायाधीशांनी केस ऐकली आणि मुलाला विचारले, “तू खरंच ब्रेड आणि चीजचं पॅकेट चोरलं होतंस का?”मुलाने खाली मान घालून उत्तर दिलं,“हो.”न्यायाधीश :- “का?”मुलगा :- “गरज होती.”न्यायाधीश :- “खरेदी का नाही केली?”मुलगा :- “माझ्याकडे पैसे नव्हते.”न्यायाधीश :- “घरच्यांकडून घेतले असते.”मुलगा :- “घरी फक्त आई आहे… ती आजारी आहे आणि बेरोजगार आहे. ब्रेड आणि चीज तिच्यासाठीच चोरलं.”

Send us Fan Mail“दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात. पण नातं फाटलं की लोक थांबतात. अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…”ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले,“दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.”============

Send us Fan Mailरॅपिड आय मूव्हमेंट (REM) स्लीप ही झोपेची एक अद्वितीय, सक्रिय अवस्था आहे, जी तीव्र मेंदू क्रियाकलाप, स्पष्ट स्वप्ने, डोळ्यांची जलद हालचाल आणि तात्पुरत्या स्नायू पक्षाघाता मुळे (अटोनिया) वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणपणे दर ९० मिनिटांनी चक्रात येणारी, REM अवस्था स्मृती दृढीकरण, भावनिक प्रक्रिया आणि शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Send us Fan Mailनसरुद्दीनने मित्राला राजेशाही पोषाख घालायला दिला. जिथे जातील तिथे परिचित त्या मित्राशीच बोलू लागले. त्याच्या पाहुणचार करू लागले. त्याने नसरुद्दीनच्या मनात असूया जागी झाली. यजमानांना मित्राचा परिचय करून देताना त्याने सांगितलं की "हा माझा फार जवळचा मित्र आहे, आजच आला, मग माझेच कपडे मी त्याला घालायला दिले. छान आहेत ना?"पुढे काय झालं ?.....

Send us Fan Mailजेवण संपल्यावर बटू म्हणाला , " काकू सगळं छान झालं होत." मैत्रिणीने आनंदाने विचारलं " आवडलं ना सगळं ? "यावर निरागसपणे आठ वर्षांचा आशिष म्हणाला," हो, आईने सांगितलंय ...कसेही झाले असले तरी छान म्हणावे. समोरच्याला बरे वाटते " ===========

Send us Fan Mailतुम्ही खूपच उत्तम कामगिरी करत आहात. तुम्ही लोकांचा आदर करता, मग त्यांची पदे किंवा दर्जा काहीही असो. आता आम्हाला सांगा—आमच्यापैकी 'बॉस' (मुख्य अधिकारी) कोण आहे?""हो, सर. तुमच्यापैकी दोन जण केवळ निरीक्षण करत आहेत. त्यातील एक जण वित्त विभागातील (Finance) आहे—ते केवळ पगाराविषयी चर्चा होईल तेव्हाच बोलतील. दुसरे गृहस्थ या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शक आहेत—ते 'एचआर' (HR) विभागातील आहेत. अगदी टोकाच्या खुर्चीवर बसलेले गृहस्थ अधूनमधून बोलतात आणि कधीकधी स्मितहास्य करतात. तेच खरे 'बॉस' आहेत. मध्यभागी बसलेल्या व्यक्तीकडे मात्र तुम्ही सर्वजण अधिक लक्ष देत आहात; आणि हे केवळ असा आभास निर्माण करण्यासाठी केले जात आहे की, तेच या सर्वांचे 'बॉस' आहेत."

Send us Fan Mailएकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता.त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले.

Send us Fan Mailअख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशानशांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी (दाजींनी) एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, "आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको! तू केस मागे घे." बहिणींनी खाली मान घातली. त्यांना आपली चूक समजली होती.

Send us Fan Mail“ओह! इट इज टू लेट'', म्हणत तो जायला निघाला. त्याला हसून सगळ्यांनी निरोप दिला. तो गेल्यावरही मंजिरीचं ‘राजा पुराण' चाललंच होतं. माधवला भुरक्यावरून खडसावूनही झालं. रात्री मंजिरी शांत झोपली, पण माधवची मात्र झोप उडून गेली. कारण…‘बायकोचा मित्र!'माधव-मंजिरीचा नित्यक्रम सुरू झाला, राजा गेला खरा, पण माधवच्या मनातून राजा काही जात नव्हता. मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी त्या राजाने घर करून ठेवलं होतं आणि ती बोच अधूनमधून डोकं वर काढत होती.

Send us Fan Mailपूर्वी पश्चिम उपनगरांतून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करत असताना ट्रेन अंधेरी सोडून पुढे गेली की पार्ले ग्लुकोज बिस्कीटांचा वास येई. बिस्कीटं भाजली जात असल्याचा तो दरवळ गाडीभर पसरे. अनेकांची भूक खवळून उठे. गाढ झोपेतला प्रवासीही या घमघमाटाने जागा व्हायचा. ट्रेन पार्ल्याच्या जवळ आलीय, हे कळायचं. किती वर्षं तरी मुंबईकरांनी रेल्वेने येता जाता त्या वासामुळे मनात ती बिस्कीटं खाल्ली असतील. पूर्वी बिस्कीट म्हणजे पार्ले असंच वाटायचं.

Send us Fan Mail‘हिस्ट्री टुडे'नुसार, पिझ्झाच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल १८८९ मध्ये झाला. खरे तर, राजा उम्बर्टो पहिला आणि राणी मार्गेरिटा (मार्गेरिटा ऑफ सॅवॉय) नेपल्सला भेट देणार होते. त्यांना फ्रेंच जेवणाचा कंटाळा आला होता आणि त्यांना काही स्थानिक पदार्थ चाखून बघायचे होते. प्रसिद्ध पिझ्झा निर्माता राफेल एस्पोसिटो यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी राणीसाठी तीन प्रकारचे पिझ्झे तयार केले, त्यापैकी एक तिला खूपच आवडला.

Send us Fan Mailकल्पना करा की कडाक्याची थंडी पडली आहे. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीने कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवी आहे. साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचायला लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन्हा जवळ येतात आणि पुन्हा तेच काटे टोचतात. हा खेळ असाच सुरू राहतो. जोपर्यंत त्यांना एक असं 'योग्य अंतर' सापडत नाही, जिथे त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत.

Send us Fan Mailमी ॲमेझॉनमधून मनात एक हुरहूर घेऊन परत आलो…आणि एक जाणीव घेऊन , की त्या सात दिवसांत… माझं शरीर त्याच्या नैसर्गिक घरात होतं !आणि आता ज्या पिंजऱ्यात मी परत आलो…तो मीच बांधला होता…हळूहळू… एकेक सोयीच्या नावाखाली.अजूनही…कधी कधी…डोळे बंद केले की…ते जंगल आठवतं… विचार येतो , "जर मी पुन्हा तिथे गेलो…तर ते मला ओळखेल का?"आतून एक उत्तर येतं "जंगल आपल्यापेक्षा खूप जुनं आहे…आणि खूप संयमी सुद्धा …जंगल लक्षात ठेवत नाही…पण ते नाकारतही नाही."==========

Send us Fan Mailजेरुसलेमच्या गोलगाथा टेकडीवर, प्रभू येशूचं क्रुसीफिक्सेशन उरकून, दोन मजूर खाली सैनिक छावणीत, क्रुसीफिक्सेशनचा 'मेहनताना' घेण्यासाठी आले. मुकादमाने त्यांना किती खिळे ठोकले विचारलं व प्रभू येशूच्या अंगावर ठोकलेल्या खिळ्यांइतक्या सुवर्णमुद्रा अदा करुन, त्यांना म्हणाला, 'जा ऐश करा!'

Send us Fan Mailएक टॅक्सी चालक नेहमी रात्रपाळी करत असे. एक दिवस एक वयोवृद्ध गृहस्थ त्याची टॅक्सी भाड्याने घेतात. पण त्यांची एक अट असते - ते त्याला काही रोख रक्कम देणार असतात. त्याच्या बदल्यात त्याने ते सांगतील त्या त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं व वाटेत एकदाही " का " असा प्रश्न विचारायचा नाही. टॅक्सी चालक त्यांना सगळीकडे घेऊन जातो.परंतु सुरुवातीला त्याला त्यांच्या बद्दल वाटलेलं आश्चर्य शेवटी सहानुभूतीत परावर्तित होतं. अस काय घडतं त्या दोघांच्या प्रवासात?...

Send us Fan Mailअयोध्येत दररोज एक तास रामकथा रंगायची.त्या दरबाराची सुरुवात एका अनोख्या आमंत्रणाने व्हायची“या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा…”त्या काळात ही केवळ परंपरा नव्हती,ती होती अढळ श्रद्धेची जिवंत अनुभूती.त्या दरबारात एक विद्वान वकीलही नियमित येत असे.भक्तिभावाने तो कथा ऐकत असे, पण त्याची बुद्धी तर्काला सरावलेली होती.एक दिवस मनात प्रश्न उभा राहिला,“खरंच येतात का हनुमंतजी?”प्रश्न विचारला गेला…विश्वासाला आव्हान दिलं गेलं…....!

Send us Fan Mail“आजोबा, तुम्ही रोज स्वतःच्याच नंबरवर फोन का करता?”“तुझी आजी जिवंत होती ना… ती मला रोज याच वेळी फोन करायची."दुसऱ्या दिवशी, अगदी त्याच वेळी,त्यांना जगातला सगळ्यात गोड आवाज ऐकू आला“हाय आजोबा… फक्त एवढं सांगायचं होतं, की या वेळी अजूनही कुणीतरी तुमची आठवण काढतंय.”

Send us Fan Mailअनेक वर्षापासून दारावर एक ड्रेस मटेरियल, बेडशिट असे कापड प्रकार विकायला मुलगा येतो. तो सुरतेहून कापडं आणतो.त्याने आणलेल्या सामानावरून मी एक नजर टाकते. एक- एक प्रिंटही फार सुंदर असायची.त्यातल्या त्यात वेधक वेचक असं काही असेल तर केवढ्याला आहे! अमूक अमूक उघडून दाखव वगैरे संवाद सुरू होतो.त्याचा माझा सौदा पटला तरच ती वस्तू घरात येते.बरेचदा आमच्या दोघां मधला सौदा तुटतो/ फिसकटतो. मग मी सरळ नकार देऊन दरवाजा लावू का विचारून दार बंद करते.

Send us Fan Mailजेव्हा खटला सुरू झाला, तेव्हा गिडियनने न्यायालयाकडे एक साधी, घटनात्मक मागणी केली:"महाराज, माझी अशी विनंती आहे की, या खटल्यात माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला एक वकील दिला जावा."जजचे उत्तर सभ्य होते, पण भयंकर होते:"मिस्टर गिडियन, मला क्षमा करा, पण मी तुम्हाला वकील देऊ शकत नाही. फ्लोरिडा राज्याच्या कायद्यानुसार, न्यायालय फक्त तेव्हाच वकील नियुक्त करू शकते जेव्हा आरोपीवर मृत्युदंडाच्या शिक्षेचा गुन्हा असेल."

Send us Fan Mailआज्जी चांगल्या घरच्या दिसत होत्या. अगदी गळून गेल्या होत्या थकव्याने. घाबरलेल्या स्थितीत होत्या. कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देता येत नव्हते. कसंबसं हे कळलं की कोणीतरी त्यांना बाइकने धक्का मारला आणि त्या पडल्या. ज्याची बाईक होती तो तसाच निघून गेला.त्या सतत एकच गोष्ट सांगत होत्या ,'मी माझ्या मुला सोबत आले, हरवले आणि माझ्या जवळ १०० रुपये होते ते सुद्धा चोरले.

Send us Fan Mailनिसर्गावर प्रेम करणारा कवीमनाच्या मुलाची गोष्ट. त्याला शिस्त, संयम लावण्यासाठी एका रेषेत अडकवल. तिथे त्याची शाळा सुरू झाली. मग प्रतिभेला धुमारे फुटले. वडीलांनी पण साथ दिली. त्यातून एका निसर्गप्रिय महान व्यक्तीचा शिक्षण प्रवास सुरू झाला.

Send a textतुळजापुरात तुळजाभवानी भवानी मंदिर परिसरात काळभैरव आणि टोळभैरव या दोन क्षेत्रपाल देवतांची मंदिरे आहेत. वास्तविक तुळजापूर परिसरात भैरवाची अनेक ठाणे आहेत. त्यात कालभैरव, टोळ भैरव, उन्मत्त भैरव, रक्तभैरव, बटभैरव ही प्रमुख आहेत. इथे प्रचलित असलेल्या श्रद्धेनुसार कालभैरव हे देवस्थान तुळजाभवानी मंदिरापेक्षाही पूर्वीचे असून देवीच्या पूर्वीपासून कालभैरव इथे विराजमान आहेत.

Send a textपुण्याच्या 'वैकुंठ स्मशानभूमीत' गेल्या तीस वर्षांपासून 'महादेव' हे मृतदेह जाळण्याचे काम करायचे. अंगावर एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्र वास... हीच महादेव यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कोणीही जवळ करत नसे.

Send a textतेरावं झाल्यावर रोहित शंकरपाशी गेला आणि तोरा दाखवत म्हणाला,"बघा शंकरराव, आता आई नाहीये. त्यामुळे तुमचं आणि माझं नातं संपलं. हे घर माझ्या सख्ख्या वडिलांचं आहे. मला हे घर विकायचं आहे. तुम्ही तुमची सोय बघा आणि उद्यापर्यंत रूम खाली करा."शंकर शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुखः होतं, पण रोहितच्या वागण्याचं आश्चर्य नव्हतं.ते फक्त एवढंच म्हणाले, "हो बाळा. मला माहित होतं हा दिवस येणार आहे. मी माझी बॅग भरली आहे. मी आजच निघतो."

Send a text"मी सुंदर आहे का?" हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे, कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तीलाही ते पटायला लागलं होतं. आरसा सांगू लागला होता, "ती सुंदर नाही. " अखेर तिनं आईला विचारलं, " मी सुंदर आहे? " आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, " पण तुला काय वाटतं स्वरा.....?"

Send a textस्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करून केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, परंतु स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची क्षमताही ती गमावून बसते.' त्यावेळी असे स्पष्ट विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड विचारांमुळे मेरीला प्रचंड प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.

Send us Fan Mailपप्याचा चिन्मय हा बालमित्र. सध्या बेंगलोरला पायलट म्हणून काम करत असतो. गावाकडे जत्रेसाठी वर्षातून एकदा येतो. “ “अरे विमान चालवणं म्हणजे काय तुला बैलगाडी चालवणे इतका सोपं वाटतं काय?” चिन्मयने विचारले.दोघे पप्या ची बैलगाडी घेऊन रानात निघाले. पण चिन्मयला काही बैलगाडी आणि बैल सांभाळता येईना. त्यांने बैलगाडी डायरेक्ट ओढ्यामध्येच लँड केली.“अरे निर्जीव मशिनी चालवण्या परीस हे जिवंत चित्रा व सांभाळणं लय अवघड असतं बाबा! जीवाला जीव जोडावा लागतंय तवा कुठे जनावर ऐकतय” म्हणत पप्प्याने बैलांच्या सोन्या आणि गुण्याच्या शेपट्या विरघळल्या आणि गाडी झपाट्याने रानात पोहोचवली.“ मित्रा खरंच हृदय आणि मन असलेल्या बैलांचे ड्रायव्हिंग करणं अवघड असते बरं आम्ही विमानाने माणसं वाहून नेतो पण तुम्ही शेतात बैल चालवणारे शेतकरी तुमच्या बैलगाडीने देशाची अर्थव्यवस्था ओढत असता” चिन्मय म्हणाला.

Send us Fan Mailपरिस्थिती संवेदनशील होती. इतक्यात बचाव मोहिमेची बातमी आली आणि त्या महिलेला सकाळी सव्वादहाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. संपुर्ण महिला विमान कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. वास्तविक दुसरीच पायलट मोहिमेवर जाणार होती परंतु आयत्यावेळी एका 23 वर्षीय महिला पायलटच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या या बचाव मोहिमेत, कॅप्टन जसविंदर कौर यांच्यासोबत ती कार्य करत होती जिचे नाव दीपिका अधाना होतं.

Send us Fan Mailमुनेच्या काठी गायी चारताना कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी एकत्र केलेला “काला” – आणि त्यामागे दडलेली एक सुंदर कृष्णलीला. देवांनीही तो प्रसाद मिळवण्यासाठी किडे-मुंग्या आणि माशांचे रूप का घेतले? आणि काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुवू नयेत अशी प्रथा कशी पडली? संतांच्या अभंगातून जपलेली ही कथा आपल्याला एकत्र येण्याची, प्रेमाने वाटून खाण्याची आणि सख्य जपण्याची शिकवण देते. चला, गोपाळकाल्याच्या या रंजक कथेत डोकावूया.========

Send a textपांडवांचे स्वर्गारोहण उत्तराखंडमधील माना गावाजवळील 'स्वर्गारोहिणी' पर्वतावरून झाल्याचे मानले जाते. जाता जाता वाटेत मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतु, द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होते. हे एक प्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इथवरच पोहोचू शकली.” पुढील टप्प्यात सहदेवाने प्राण सोडले. युधिष्ठिर म्हणाला, “सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला देहत्याग करावा लागला.” पाठोपाठ नकुलानेही देह ठेवला. तेव्हा युधिष्ठिराने भीमाला सांगितले, “नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता. म्हणून तो मृत्यू पावला.” त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, “आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारू, अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्धांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला.” काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले, “भ्राताश्री, मी काय केले म्हणून मला मरण येत आहे?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, तू माझा अत्यंत लाडका भाऊ! परंतु, तुझ्यातही दोष असा आहे की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे. शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.”

Send a text९४८ साल. टोकियोमध्ये युद्धानंतरचा एक ऐतिहासिक खटला चालू होता. जपानच्या नेत्यांवर युद्धगुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवले गेले होते .जगातील अकरा देशांतील न्यायाधीश त्या खटल्याचा निकाल देण्यासाठी बसले होते. एकामागोमाग एक न्यायाधीश आरोपींना दोषी ठरवत होते. जणू निकाल आधीच ठरलेला होता. पण त्या वेळी एका भारतीय न्यायाधीशाने शांतपणे वेगळे मत मांडले. ते होते न्यायमूर्ती राधाबिनोद पाल. त्यांनी सांगितले की, "न्याय म्हणजे फक्त शिक्षा देणे नव्हे, तर न्यायाची प्रक्रिया तत्त्वांवर आधारित असली पाहिजे." अकरा न्यायाधीशांत उठलेला तो एकटा भारतीय आवाज इतिहासात आजही दुमदुमत राहिला आहे.

Send a textति ज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की, “यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार?” या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं.मी काय केलं?वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं विकत घेते; पण वाचून झाली की ती लायब्ररीला किंवा मैत्रिणींना देते. उरलेली औषधं केमिस्टकडे परत देते. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या, असं त्याला सांगते.वयोमानामुळे साडी नेसणं कठीण झालं, तेव्हा दोन-तीन साड्या ठेवून बाकी देऊन टाकल्या.आता माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने नाहीत, पर्सची चळत नाही; प्लास्टिक पिशव्या किंवा डिस्पोजेबल डब्यांचा साठाही नाही.आणि गंमत म्हणजे, त्यामुळे काहीच अडत नाही, हेच आता लक्षात आलं आहे.

Send a textगोड शब्द नेहमीच गोड असतात का? कौतुकाच्या शब्दांत लपलेला सापळा कसा जीवघेणा ठरतो, हे सांगणारी ही छोटी पण तीक्ष्ण कथा — “गोड सापळा”. एका चलाख कोल्ह्याने गोड बोलून रचलेला सापळा… आणि त्या गोड बोलण्याला भुलून त्याच्यावर दोनदा विश्वास ठेवणाऱ्या भोळ्या गाढवाची गोष्ट.

Send a textएकदा अंधाराने परमेश्वराकडे तक्रार केली की सूर्याचं माझ्याशी काय वैर आहे, ते मला माहिती नाही. पण, पृथ्वीवरून मला सतत हुसकावत असतो.सूर्य म्हणाला, पण, हा अंधार कोण आहे? तो कसा दिसतो? माझी त्याची काही ओळखही नाही. मी कशाला त्याचा पिच्छा पुरवेन? एकदा त्याची माझी भेट करून दे. या गोष्टीला लाखो वर्षं झाली… पण, सूर्य आणि अंधार यांची समोरासमोर भेट परमेश्वरही करून देऊ शकलेला नाही. त्यामुळे अंधाराच्या तक्रारीचा निवाडा आजवर होऊ शकलेला नाही.

Send a textमि. बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते. पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी सतार बनवणे ही एक वेगळीच कला आहे. सतार बनवतांना कुशल कारागीर फक्त पंढरपूरचे आणि लखनौचे भोपळेच वापरतात. पंढरपूरच्या भोपळ्यांची साल जाड असते तर लखनौच्या भोपळ्यांची पातळ. सतार बनवणारे कारागीर त्याच्या पसंतीने भोपळे निवडतात. खाण्याच्या भोपळ्यांपेक्षा हे भोपळे वेगळे असतात. चवीला अत्यंत कडू असतात.

Send a textएकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?'' सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !'' वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !''

Send a textएक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला," खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे "

Send a textशाळेला १० संगणक भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन 'मिस्टर सुहास ओक' आले होते. सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता - "दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे".

Send a textएके दिवशी शिव शंभूंनी भक्त कन्नप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपनं निर्माण करून मंदिराचे छत पाडले, हे दृश्य बघून सगळे लोकं मंदिरातून पळून गेले पण कन्नप्पा यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या शरीराने शिवलिंगाला झाकून घेतलं, नंतर त्यांना शिव शंभूच्या डोळ्यांतील सांडत असलेलं रक्त दिसलं, हे बघून कन्नप्पा यांनी पटकन बाणाच्या सहाय्याने स्वतःचा एक डोळा काढला आणि शिव शंभूला लावून दिला.

Send a textएक दिवस छळछावणीत अचानक गोंधळ उडाला. एक गर्भवती स्त्री जमिनीवर पडली होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण त्या नरकात कोणाकडे तिला मदत करण्याची ताकद नव्हती… औषध नव्हतं… अन्न नव्हतं. ती स्त्री जवळजवळ बेशुद्ध पडली होती.आई मार्सेल यांनी आपल्या मुलीला विचारलं —“आपण चॉकलेटचा हा तुकडा तिला देऊया का?” " हो !"पन्नास वर्षांपूर्वी पोटात अन्नाचा कण नसलेल्या मुलीने स्वतःचा विचार न करता तिला मदत केली होती. त्या कृतीमुळे दोन आयुष्य वाचली . आणि ती मुलगी मोठी होऊन इतरांना बरे करणारी डॉक्टर बनली .

Send a text“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे… चिंटूच्या समोर तुझी ती गावाकडची भाषा बोलू नकोस!”सागरचा आवाज थोडा चिडलेला होता.“उद्या त्याचा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस माज्या राजा' ‘बरा हाय न्हवं', किंवा ‘राम-राम ' म्हटलं ना… तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही. ... स्टेटस बघतात… क्लास बघतात!”

Send a textअँटोनियोने मारियाकडे पाहिलं.एवढीशी.. लहान…इतकी घाबरलेली…आईला हाक मारणारी आणि मग…त्याने तेच केलं, जो आता त्याच्या पुढचा एकमेव मार्ग होता.त्याने आपल्या लेकीला पोर्थोलमधून बाहेर ढकललं.मारिया काळ्या पाण्यात पडताच किंचाळली.अँटोनियोने उरलेल्या ताकदीने ओरडून सांगितलं —“पोहत रहा मारिया! रोषणाईकडे पोहत जा! जहाजं येत आहेत — पोहत रहा!”

Send a text१९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते"बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो दवाखान्यात तळमळत आहे, विचारणारासुध्दा कोणी नाही"??

Send a textमनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. त्यातूनच 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच. एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. "मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या, माझी लेकरं माझी घरी वट पहात असतील. त्यांना एकवार शेवटचे जवळ घेऊ द्या" अशी हरिणीने विनंती करून परत येण्याचे वचन पारध्यास दिले.