Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Send us a text"का कुणास ठाऊक पण आजी देवांबरोबर बोलायची." रांगत्या बाळकृष्णला म्हणायची "अरे थांब थांब पळू नकोस आंघोळीच्या नावाने असा. तुला आंघोळ चुकायची नाही त्याने. मी मेली म्हातारी कुठं पर्यंत येइल तुझ्या मागे असं तुला वाटेल ,पण मी येईन हो पार गोकुळ मथुरे पर्यंत." एक दिवस आजी देवांशी प्रत्यक्ष संवाद साधायला निघून गेली इथे देव्हाऱ्यातले देवघरातले देव कायम चे निशब्द झाले!
Send us a textआई-बापानं ४०० रुपये हातावर ठेवले."हे घे. पण बघ, चांगले हापूसच घ्यायचे. आणि तुझे-तुझे पैसै वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक. भाव करायला शीक." असं म्हणून पाठवलं.पोरगं धडपडलं.कधी एका गाड्यावर, कधी दुसऱ्या दुकानात. पण कोणीच ४०० च्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कोणी म्हणे ५००, कोणी ४८०.डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं.पण मागे फिरणार नव्हता.आईचं बोलणं आठवत होतं, "हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही, व्यवहारात पण शहाणपण लागतं."
Send us a textमला नेहमीच नाचावसं वाटतं , आषाढाच्या सरीवर सरी पडू लागल्या की मला नाचावसं वाटतं ओट्यावरच्या पत्र्यावर पावसाचे थेंब पडू लागले आणि ताशा वाजू लागला की मला नाचावसं वाटतं ,अंगणात पाऊलभर पाणी साचलं की अगदी ओरडत ओरडत त्यात नाचावसं वाटतं पण आई मला तसं करू देत नाही
Send us a textश्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. " जागरण करू नका, आराम करा "अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच .
Send us a textदुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच सर्वजीत बैलावर आपली ग्रंथ संपदा लादून काशीच्या दिशेने निघाला व यथावकाश कबीरांच्या घरी पोहोचला. आपल्या येण्याचं प्रयोजन त्याने कबीरास सांगितले व लगेचच आपण वाद सुरू करू म्हणाला. कबीर म्हणाले की "मी एक अडाणी, गावंढळ माणूस आहे. वाचणं लिहिणं मला येत नाही. त्यामुळे वाद सुरू करू नकोस. मी आधीच हरलोय".
Send us a text'सांगली' जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर 'बहे-बोरगाव' नावाचे बेट आहे. हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे. आणि म्हणूनच या गावाचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. “कृष्णा माहात्म्यात“ या गावाचा उल्लेख बाहुक्षेत्र असा केला आहे. बहे बोरगाव मारुती मंदिर बोरगाव जवळ कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहेत. मंदिर "रामलिंग बेट" नावाच्या बेटावर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा जवळ बहे येथे आहे. महाराष्ट्रातील चाफळ-सातारा परिसरातील श्री स्वामी समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या ११ मंदिरांपैकी हे एक आहे.
Send us a textDr. Kokila Patel, an Indian American physiotherapist, uses Iyengar Yoga to treat her patients. She focuses on posture, alignment, and breathing, using props like belts and blocks. Her approach helps relieve chronic pain and improves strength, flexibility, and mental well-being. Patients also learn simple home routines for lasting results. By blending physiotherapy with yoga, she offers a holistic and effective way to heal 50,000 + patients in America so far!
Send us a text"आईच्या खांद्यावरून तिच्या मऊ पदराखालून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करन चिंब भिजताना पाऊस दहा वर्षांचा असतो!भिजायला नको वाटायला लागलं आणि आडोसा आवडायला लागला की पन्नाशी येते पावसाची..गुडघे दुखू लागले आणि डोक्यावर केस जाऊन चंद्रोदय झाला की साठीशांती होते पावसाची............असतं नं वय पावसाला ?"
Send us a textएकदा आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफ्युजी एरियात, आम्हा मुलांची पार्टी चालू होती रात्रीची. आम्ही जवळ जवळ विसेक मुलं - मुली होतो... आणि होते अर्थातच एकमेवं, चितळे काका. पिझ्झा, पावभाजीचा बेत होता... सॅाफ्ट ड्रिंक्स होती... मजा, मस्ती चाललेली. किशोर कुमारची दोनेक गाणी ऐकवून... वाहवा मिळवून... खुर्चीत बसले होते काका, पावभाजीची प्लेट हातात घेऊन. आणि... आणि अचानक कोसळले ते खाली. छातीला हात लावत कळवळू लागले ते. आम्हा मुलांचं तर अक्षरशः धाबं दणाणलं. कोणीतरी जाऊन चितळे काकूंना कळवलं. दोन्ही खांद्याभोवती पदर गुंडाळलेल्या काकू, गडबडीतच वर आल्या. एव्हाना चितळे काकांची हालचाल, पुर्ण बंद झाली होती. आणि पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं...
Send us a textएकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता.
Send us a textशाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता. पण अतिशय चौकस होता. त्याचे शिक्षक म्हणत,"सुंदर ची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंड पाठ होत असे."कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुन्या बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत. पण त्याने कधीही कोणालाही प्रतिउत्तर केले नाही. तो केवळ स्मित हास्य करत असे आणि तेथून काढता पाय घेत असे.
Send us a textविमान कोसळल्यानंतर त्याच्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्सचा कसून शोध घेतला जातो. हा सापडेपर्यंत शोधमोहीम थांबवली जात नाही. Air France Flight 447 – रिओहून पॅरिसकडे. अचानक रडारवरून गायब. अटलांटिक महासागरात कोसळले.विमानाचा शोध वर्षभर चालला. अखेर २०० मीटर खोल समुद्रात, Black Box सापडला आणि अपघाताची माहिती उघड झाली. बर्फामुळे सेन्सरने चुकीचा डेटा दिला, आणि वैमानिक घाबरला… चुकीचे निर्णय घेतले.Black Box शिवाय हे कधीच समजलं नसतं.
Send us a textफळं खाणे नक्कीच चांगले . ती खाण आरोग्यदायी अर्थात असत. ह्या गोष्टीत फळांचे गुणधर्म सांगून निसर्ग सर्वश्रेष्ठ कसा हे समजावले आहे.
Send us a textबसस्टॉप वरचा तो इसम मघापासून त्या युवती कडे नी तिच्या त्या गोल वाढलेल्या पोटाकडे अतिशय कुतूहलाने बघत होता. त्याने धीरानेच विचारलं, " अशा स्थितीत किती दिवस झाले तुम्हाला ? " "तुमच्या कुटुंबातील कोणीच नाहीये का तुमच्या जवळचं, तुम्हाला सांभाळून घेणारं ?" त्याने विचारले. " नाही, मी एकटीच रहाते वडिलांबरोबर. पण ते आजारी असतात. ...."
Send us a textतुम्ही मिस्टर बीन पाहिलाय का?अगदी पाहिलाच असेल! ते गोंधळलेलं तोंड, भिरभिरती नजर, हास्यास्पद हालचाली... आणि शब्द? नाहीच! एक शब्द न बोलता लोकांना पोट धरधरून हसायला लावतो.त्याचा IQ आहे १७८! आईनस्टाईनचा IQ होता १६०. म्हणजे तो किती हुशार होता, कल्पना करा.१९० देशांत मिस्टर बीन लोकप्रिय झाला कारण त्याला भाषेची गरजच नाही!
Send us a textशिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता "आनंदाने कसं जगावं?" मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,"तुमच्या मते, सुख म्हणजे काय?"आणि, आलेली उत्तरं अगदी भन्नाट होती.काय होती ती उत्तरं..?
Send us a text"काका मला निघायला हवे... आईला मदत करायची आहे." असे म्हणून कस्तुरी, प्रसन्नला कडेवर घेऊन लगबगीने निघाली... ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही जाईना.. 'मला शिकायचंय....!! शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय. सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांपुढे सादर करून, त्यात ही भीक न मागता.., फक्त एकच अपेक्षा, "मला शिकायचंय...!!"
Send us a textकिती अद्भुत आहे हे सगळं… आणि काही लोकांकरता अगम्य देखील ! म्हणतात ना, ‘मानो तो भगवान ; ना मानो तो पत्थर' … तसंच काहीसं ! पण गंमत अशी की – कोणी मान्य करा किंवा नका करू – या वास्तुपुरुषाला, या उर्जेला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. त्याचं एकच काम आहे – त्या वास्तूत जे घडेल, जसं घडेल त्याला ‘तथास्तु' म्हणायचं
Send us a textशरीराची अनेक खाती स्वतःकडे असणारा आणि त्यांचा कारभार समर्थपणे सांभाळणारा अवयव म्हणजे यकृत! कारभार मोठा त्यामुळे आकारही मोठा आणि वजनदार आसामी, दीड किलो वजन असलेला ऐवज! कारभार तर एवढा मोठा की जवळ जवळ पाचशे वेगवेगळ्या प्रकारची कामे यकृत कोणताही गाजावाजा न करता शांतपणे हाताळत असते. जणू काही कर्मयोगीच! अशा कर्मयोग्याला (अप्रत्यक्षपणे) दारू पाजून आपण त्याच्या कामात अडथळा आणतो, त्याला त्रास देतो, त्याच्यावर जुलूम करतो. आपण करतो पण निस्तरावं लागतं यकृताला!
Send us a textदुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा तेलाचा दाम दसपटीने वसूल करत होता. एका फाटक्या परकर पोलक्यांतल्या पोरीने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या.""अग, दिवाळीला अवकाश आहे ! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते."दिवाळी कसली? खायला त्याल द्या...""ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या""पण आमच्याकडे धाच पैशेच हाइत."'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे.
Send us a text१९९० च्या दशकात – जग बदलत होतं. संगणक वेगाने पसरत होते, इंटरनेट जन्म घेत होतं, डिजिटल क्रांतीचा नवा वेग जाणवत होता.पण सुपरमार्केटमध्ये प्रत्येक वस्तूवर असलेला काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा, स्कॅनर मशीनला वाचता येणारा संकेत बदलत नव्हता . बारकोडच्या काही त्रुटी आहेत. जशा की मध्ये कमी माहिती साठते, आणि तो ठराविक कोनातच स्कॅन होतो. थोडं जरी खरडलं गेले तरी बारकोड वाचता येत नाही मासाहिरोने QR Code : Quick Response Code शोधून काढून ओपन-सोर्स केला !
Send us a text...माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . पुनः झाड वाढले पण फुलेच ना. आता काय करावे? त्याला सॉरी म्हणू का?
Send us a textसई हलदुले या स्वित्झर्लंड मधल्या विद्यमान खासदाराच्या पत्नी. त्या म्हणतात आल्प्स मध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा सततचा खळखळाट हे तेथील जनतेच्या चिंतेचे गंभीर कारण बनत होते. हवामान बदलामुळे निसर्गाचे स्पष्टपणे बदलणाऱ्या रूपाने जुन्या पिढीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणला. ग्रीन पार्टी राष्ट्रीय राजकारणात दाखल झाली आणि बहुमताने जिंकून आली. लेखिकेचा पती विन्सेंट बोवा एकदम एक्झिक्युटिव्ह पॉवरच्या खुर्ची पर्यंत जाऊन पोहोचला. तेथील विद्यमान राष्ट्राध्यक्ष सार्वजनिक ट्रामने उभ्याने प्रवास करतो व राजकीय भरारी घेतलेला व्हिन्सेंट शुभ्र दिव्याच्या सायकल वरून ऑफिसमध्ये ये जा करतो!
Send us a textआमच्या लहानपणी ट्रॅव्हल बॅग ही सुद्धा मोठी चैनीची वस्तू होती. आमच्या चाळीत त्या मानाने काही संपन्न कुटुंबे होती. मग आई त्यांच्याकडून बॅग मागून आणायला आम्हाला पाठवायची . “जरा दोन दिवस गावी जायचं होतं. तुमची बॅग मागितली आहे आईने.” काकू लगेच बॅग द्यायच्या. अखंड प्रवासात आम्ही स्वतःपेक्षा ती बॅग जपायचे . सारखं एकच वाक्य असायचं. “ए बॅग आपली नाहीये हा! द्यायची आहे परत. सांभाळून वापरा.” खूप प्रवास अनेक वाहनांतून केला आणि ह्या प्रवासादरम्यान, वाहन म्हणजे निव्वळ माध्यम आहे हे कळलं.
Send us a textएक काळ असा होता जेव्हा आमच्या वर्गाच्या मध्यभागी एक चीनची भिंत उभी होती. एका बाजूला मुलं दुसरीकडे मुली. इकडून तिकडे बोलणं हे भयंकर लाजिरवाण. पण म्हणून नजर वळायची थोडीच राहते?.. पुरुष म्हणून आपल्या वाढीमधला एक सुरेख टप्पा मैत्रिणीच्या नात्याचा असतो, पण तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागत. या नात्याची मजा आस्वादायची असेल तर त्याला ‘मानलेली बहीण' वगैरे बनवू नये! मैत्रिणीचा नातं म्हणजे एक कॅल्डिओस्कोप असतो. प्रत्येक हेलकाव्या बरोबर बदलत जाणारा आणि स्वतःचा तोल आणि आकृतीबंध साधणारा. या नात्याला नेहमीच्या मोजपट्ट्या लावू नयेत!
Send us a textलग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे. नांव घातलेली वनांव न घातलेली भांडीवेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची. व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देवाण,घेवाणीसाठी वापरली जात असत. तर अशी ही नांव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.
Send us a textसातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही, त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी.
Send us a text"मिले सूर मेरा तुम्हारा ssssss" हे गाणे माहीत नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.झालं असं की, त्या वेळचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून "मेरा भारत महान" ही संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.
Send us a textपहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ॲापरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला अभिमान वाटेल अशा एका भारतीय महिला गुप्तहेराची कहाणी ऐकुया. ही कहाणी ऐकून राष्ट्राप्रती धैर्य आणि समर्पणाची नवीन व्याख्या तुम्हाला कळेल. या भारतीय गुप्तहेराची कहाणी 1971 च्या युद्धाशी जोडलेली आहे. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमधील एका विद्यार्थिनीला अचानक घरी बोलावले जाते आणि 1969 मध्ये ही कहाणी सुरू होते.
Send us a textमनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला, सुलभाला, बाहेर बसायला सांगितले.त्यांनी अंकुशला बोलते केले..."खूप त्रासात आहे हो मी...काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरीचा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज...कशातच मन लागत नाही...अहो, लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही....मी खूपच निराश आहे..." वगैरे म्हणत संपूर्ण जीवनाचे पुस्तकच उलगडून सांगितले.
Send us a textकाही महिन्यांपूर्वी रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये 'ओ' पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. 'ओ' गटाचे रक्त चढवण्यासाठी 'मॅच' करण्यात आले पण ते मॅच झालेच नाही. नेमका काय प्रकार झाला हे कळेना. मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने एक टेस्ट केली गेली. या टेस्टनंतर कळलं की हा 'बॉम्बे ब्लड ग्रुप' आहे. आता मात्र सगळे हादरले. कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे.
Send us a textमाझी आजी कृष्तक्का कधी शाळेत गेली नाही, तिला लिहिता-वाचता येत नसे. दर बुधवारी ते साप्ताहिक आलं, की मी ही कथा तिला वाचून दाखवत असे. त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे. ती अक्षरश: जिवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे. ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्दन्शब्द मुखोद्गत झालेला असे. माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती, त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या आजीबाईशी तिला खूप जवळीक वाटायची. त्यामुळेच गोष्टीत पुढं काय घडतंय याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिलाच जास्त असे. म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची. एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेड लागू शकतं, हे मला आत्ता समजतं; पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची.
Send us a text सैनिकी शिस्तीचा अतिरेक, आणि ‘नियम हे नियम' या वृत्तीची मिश्कील खिल्लीही ह्या कथेत आहे.
Send us a textजैन धर्मियांच्या संथारा व्रत अथवा सल्लेखना वर बंदी घालण्याच्या जयपूर उच्च न्यायालयाच्या २०१५च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याच संथारा किंवा सल्लेखना याची माहिती आणि महती सांगणारा हा लेख लिहिला आहे डॅा कल्याण गंगवाल यांनी. ते म्हणतात, वस्तुतः संथारा ही आत्महत्या नसून तो देहत्याग आहे. तो मृत्युमोहोत्सव आहे. हे व्रत म्हणजे परमसाधना आहे वैराग्य आहे व तृप्त जीवन जगण्याचे समाधान आहे व शेवटी आपला मृत्यू कसा असावा याबद्दलचे चिंतन आहे.
Send us a textतो एक काल्पनिक खेळ होता.सर म्हणाले, "तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा.""आता चार, दहा, पंधरा... जणांची नावे तुमच्या आयुष्यातून कायमची डिलीट करा कायमची !"हळू हळू फळ्यावर फक्त चार नवे उरली. तिचे आई वडील, तिचा जिवलग मित्र आणि तिचा पती.तिच्या आयुष्यात तिने कोणा एकाला प्राधान्य दिले? ते ऐकुया.....
Send us a textआमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू ते मोठ होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..एकदा मैत्रीण आली. म्हणाली, "आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या . दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला. गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. "
Send us a textपहलगाम हे भगवान शिवाशी देखील संबंधित आहे. हिंदू परंपरेनुसार त्याचे जुने नाव बैल गाव होतेहिंदू मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी अमरनाथ गुहेत प्रवेश करण्यापूर्वी येथे आपला बैल (नंदी) सोडला होता, ज्यामुळे हे गाव पूर्वी बैल गाव म्हणून ओळखले जात असे. या बद्दल ची एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा आई पार्वतीला भगवान शिवाच्या अमरत्वाचे कारण जाणून घ्यायचे होते. यानंतर भगवान शिव यांनी माता पार्वतीला सांगितले की यासाठी तिला योग्य अशा गुप्त ठिकाणी जाऊन अमर कथा ऐकावी लागेल.
Send us a text‘‘पिंगे, तू अगत्याने तुझा ' नाच रे मोरा' विषयी अनुभव कळवलास त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु.ल.देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत." हे वाचले आणि माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं ते पु.लं.नी दोन वाक्यांत सांगितलं. "जीव लावून काम करा, बस्स!"
Send us a textआलिया मोहम्मद बाकर या इराकमधील बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल होत्या. 2003, इराकमध्ये आलियांनी युद्धाचे संकट लक्षात घेऊन, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रंथालयातील 30,000 हून अधिक पुस्तके लोकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. केवळ आपल्या देशाचा ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी !
Send us a textएक दिवस आदित्यच्या वडिलांना एक कल्पना सुचली.नोकरीमुळे आपल्या दोघांना अमेरिकेला जाता येत नाहीय,पण आजीला पाठवलं तर आदित्यकडे? ती हुशार आहे,तिची तब्बेत ही ठणठणीत आहे.आणि महत्वाच म्हणजे तिचा आदित्यवर फार जीव आहे.आजीचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आपण ऑक्सिजन वरच आहोत अस आजीला वाटत होतं.सुदैवाने एअर होस्टेस चांगली होती. तिनं आजीला जास्तीची फळं, बिस्किटे दिली.
Send us a textआपल्या घराच्या भूपृष्ठा खालून 300 ते 500 फूट वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे सिद्ध करणारे संशोधन पुणे येथील डॉ. अविनाश खरात यांनी केले आहे. पाण्याच्या प्रवाहाचे अजूनही खूप काही अपघाता सारखे दृश्य परिणाम आपल्यावर होत असतात. ह्या आगळ्या पण जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची मुलाखत ऐकुया.
Send us a textन्हावी म्हणाला, 'हे काय, तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो?' तुझ्या या कु-हाडीचा दांडासुध्दा लाकडाचाच आहे व तोसुध्दा द्यायला हवास.'लाकूडतोडयाने गयावया केली करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. न्हाव्याने बळजबरीने कु-हाडीचा दांडा काढून घेतला व चार आणे देऊन त्याची बोळवण केली. बिरबलाकडे तक्रार गेल्यावर तो हसला........!
Send us a textगरजे पुरते अन्न मिळाले की तो थांबायचा. जास्तीचे गरजूंना द्यायचा. मग तो पैसे साठवू लागला काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी. गंगेत स्नान करायला उतरला तेव्हा पैसे वाळून पुरून वर शिवलिंग रचले. वर येऊन पाहतो तर सर्वत्र शिव पिंडी दिसू लागल्या!....
Send us a textएका ज्येष्ठ नागरिकाची एक खोली फक्त रद्दी पेपर ने भरलेली होती. एकटेच राहत होते. इतका कुबट वास पसरला होता घरभर की विचारूच नका. म्हणायचे, जेव्हा पैश्याची गरज असेल तेव्हा एकदाच विकून टाकीन म्हणजे भरपूर पैसे मिळतील!बाईंची मूले परदेशात होती. त्यांचे घर साड्या, कपडे, खरे खोटे दागिन्यांच्या यांच्या गाठोड्यानी गच्च भरलेलं होतं. डायनिंग टेबलवरही एवढी गर्दी की ही एकटी असूनही जेवायला ते वापरू शकणार नाही! ती असताना तिने तिचे कपडे गरजूंना देऊन टाकले असते तर?
Send us a textएकदा उन्हाळ्यात शेतकऱ्याने दहा हजाराचे कर्ज सावकाराकडून घेतले होते. परंतु शेतीचे काम सुरू असतानाच त्याच्या मुलीचे लग्न ठरले.त्यासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. सावकार दहा हजाराच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून अकरा हजार रुपये दिवाळीला घेत असे.शेतकऱ्याने खिशातून एक रुपयाचे नाणे काढले व सावकाराच्या हाती देत म्हणाला," लक्ष्मीचे दर्शन घडवण्याची ही किंमत. हा रुपया देऊन मी आज सावकार झाल्याचा आनंद घेत आहे.
Send us a textतहानेने प्राणी व्याकुळ होऊन इकडेतिकडे हिंडू लागले.काही जणांच्या लक्षात आले,आपल्या जंगलात नदीच नाही.त्यामुळे आपल्या पाणी मिळत नाही.सगळेजण मग डोंगरापलीकडच्या जंगलात गेले.तिथे एक नदी वाहत होती. " नदीबाई ,आमच्या जंगलात येतेस का? पाण्यावाचून आमचे खूप हाल होतात" प्राणी म्हणाले." कशी येऊ?" नदीने विचारले.नदीचे काम चालू असताना एक पक्षी मात्र झाडावर निवांत बसून राहिला.त्याला सर्वांनी बोलावले.मात्र तो काही गेला नाही.
Send us a textकोरड्या विहिरीतील एक भांडं पाणी भरण्यासाठी त्या दोघींची अर्ध्या तासाची धडपड उघड्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पाण्याच्या थेंबाची किंमत या माणसांना कशी आणि किती चुकवावी लागते या कल्पनेने अंगावर काटा आला. जे पाणी निघालं ते अत्यंत गढूळ होतं, पण तेच त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी होतं.
Send us a textया बायकांना विठ्ठलावर रुसून दूर राहिलेल्या रुक्मिणीच मन चांगलं ठाऊक आहे. असं एकट रहाणं लग्नाचं नातं न तोडताही नवऱ्यापासून दूर राहणं, काय सोपं असतं काय? पण तरी रुक्मिणी विठूचा गाजत्या मंदिरात त्याच्या शेजारी नाही उभी राहिली.लग्नाआधीच राधेवरच त्याचं प्रेम तिला माहित असेलही,पण लग्नानंतर इतक्या वर्षांनी तिनं पुन्हा त्या दोघांना तस पाहिलं आणि ती वंचनेच्या जाणिवेनं तडफडली.
Send us a textमी मुंबईत जन्माला आले,साहजिकच इथले फास्ट फूड, वडा पाव आणि पावभाजी माझ्या डीएनए मध्ये आले.वांगी म्हणजे माझा शत्रू क्रमांक १.तर या जळगाव करांचे वांग्यावर निस्सिम प्रेम.इतके की सासरे निगुतीने वांग्याची भाजी करत.
Send us a textएकदा मांजर रानात दिवसा हिंडायला गेले.काही खायला मिळते का पाहू लागले.त्याला एक भाकरीचा तुकडा आणि लोण्याचा गोळा एके ठिकाणी दिसल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले. थोडा सुद्धा विचार न करता हावरटपणाने तिथे एकदम झेप घेतली आणि मांजर जाळ्यात अडकले.उंदीर जाळे कुरतडू लागला; पण अशा बेताने की पहाट होईपर्यंत मांजर सुटू नये,कारण त्याला माहीत होते - पहाटेच शिकारी येणार आपली शिकार न्यायला....
Send us a text" ताई, रंग एकच आहे सगळीकडं..पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..ताई, रंगाच्या छटा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.., या सा-या गोष्टी सारख्या करा..मग रंगही समान दिसेल..!!अजून काही महिन्यांनी बघा..रंग अजूनच वेगळा दिसेल..!" रंगारी काका म्हणाले.