Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send us Fan Mailकृष्णाच्या जन्माच्या रात्री मथुरेत मुसळधार पाऊस कोसळत होता. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन यमुनेकडे निघाले. दुथडी भरून वाहणारी यमुना कृष्णाच्या चरणांशी येऊन शांत झाली आणि शेषनागाने फण्यांचं छत्र धरून त्याचं रक्षण केलं. वसुदेवांनी कृष्णाला गोकुळात पोहोचवलं आणि परत तुरुंगात आले. कंसाला मात्र कृष्ण मथुरेतच असल्याचं वाटत होतं. पण ज्याला तो शोधत होता, तोपर्यंत कृष्ण गोकुळात सुरक्षित पोहोचला होता!===========

Send us Fan Mail"आई... तुम्ही जेवलात ना?" वैशालीने सहजच विचारलं.समोर बसलेल्या सुमित्रा काकूंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, "हो गं सूनबाई... पोटभर जेवले."पण वैशाली स्वयंपाकघरात गेली, तर सिंकमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या ताटाकडे तिचं लक्ष गेलं. ताटात अर्धी कोरडी पोळी, थोडंसं पाणी... आणि भाजीला तर हातही लावलेला नव्हता.पहिल्या दिवशी तिला वाटलं, कदाचित तब्येत बरी नसेल...पण दुसऱ्या दिवशीही तेच...तिसऱ्या दिवशीही तेच...आता मात्र तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं.आई रोज "पोटभर जेवले" असं का सांगतात...?

Send us Fan Mail"सूनबाई... या घराच्या चाव्या तुला तेव्हाच देईन, जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील."नववधू स्वराने आश्चर्याने आपल्या सासूबाई सुमनताई यांच्याकडे पाहिले.तिच्या मनात विचार आला, "कदाचित सासूबाई घराचे नियम सांगतील... पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर पदर घ्यायचा किंवा कुणाशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही."स्वरा हळूच म्हणाली,"हो सासूबाई. तुमची प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन."

Send us Fan Mailजयश्रीबाईंनी सुरेश भटांना विचारले..., त्यांची माफी मागितली.., सुरेशभाऊ नुसतेच हसले..., गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला..!"हे घ्या आपले गाणे..! आपली व्यावहारिक अडचण मला समजते जयश्रीताई.., पण त्याचे काय आहे..., काव्य ही एक दैवी देणगी आहे..! प्रतिभेचा हुंकार आहे.., याला काळ.., काम.., वेगाची बंधने लागू पडत नसतात.., सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते...!आज भल्या पहाटेच हे गाणे सुचले मला.., हातासरशी लिहून टाकले...!”

Send us Fan Mailहळूहळू खात्री पटायला लागते की लोकांनी पत्रिकेतील सूचना गंभीरपणे घेतली आहे. आपणही पाकीट खिशातून काढत नाही. उलट मनात यजमानांचं कौतुक सुरू होतं. किती छान विचार आहे. शेवटी लग्न म्हणजे माणसांनी एकत्र येणं. पैशाचा व्यवहार कशाला? माझ्यातला समाजसुधारक नुकताच जन्म घेत असतो आणि तेवढ्यात हॉलच्या प्रवेशद्वारातून ती येते.प्रत्येक लग्नात ती असते. कधी आत्या. कधी मावशी. कधी आईच्या मामाच्या मुलाची बायको. नातं काहीही असो, तिच्या चालण्यातून एक गोष्ट स्पष्ट असते—आजच्या कार्यक्रमात काही निर्णय घेण्याचा अधिकार तिने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. आणि तिच्या हातात असतो एक भला मोठा खोका!

Send us Fan Mailसारंग आधीच प्रचंड मानसिक तणावात होता. त्याचा पुण्यातला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर होता. आज सोलापूरमध्ये दुपारी दोन वाजता त्याची एका सरकारी अधिकाऱ्यासोबत अत्यंत महत्त्वाची मिटिंग होती. एक मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तो तब्बल पन्नास लाखांची लाच देणार होता. हे काम बेकायदेशीर होते, पण स्वतःची कंपनी वाचवण्यासाठी त्याने हा चुकीचा मार्ग निवडला होता. त्याच्या पत्नीने, 'गौरी'ने सकाळी आग्रह केला होता, "सोलापूरला जाताय तर वाटेत अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेऊन जा." केवळ तिच्या समाधानासाठी, कसलीही श्रद्धा नसताना सारंग मंदिरात आला होता.

Send us Fan Mailआधी जेवणाच्या टेबलावर महेंद्रजी एखादा मजेशीर किस्सा सांगत असत. आता, सर्वजण शांतपणे जेवण आटपून आपापल्या खोलीत निघून जात.सर्वात मोठा बदल आरुषमध्ये झाला होता.त्याने आजोबांच्या खोलीत जाणे जवळपास बंद केले होते. त्याला वाटायचे की आजोबा आता त्याच्यावरही रागवले आहेत.एके दिवशी शाळेत त्याला "माझा सर्वोत्तम मित्र" या विषयावर निबंध लिहायचा होता.त्याने लिहिले—"आधी माझे सर्वोत्तम मित्र माझे आजोबा होते. आता ते माझ्याशी बोलत नाहीत. कदाचित माझ्याकडूनही काही चूक झाली असेल."

Send us Fan Mailरिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं, आता आपली कोणालाच गरज नाही.. पण सुनेने असा एक निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. निवृत्ती म्हणजे शेवट नाही… स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ असते ही...

Send us Fan Mailकॅप्टन उरी बार-लेव्ह ॲमस्टरडॅमहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एल -अलच्या प्रवासी विमानाचे उड्डाणाची तयारी करत होते. या फ्लाईट्ची (El Al Flight 219 ) सुरुवात तेल अवीवहून झाली होती आणि ॲमस्टरडॅम हा त्यातील दुसरा टप्पा होता.उड्डाणापूर्वी शिफोल विमानतळावरील एका सुरक्षा अधिकाऱ्याने बार-लेव्ह यांना 'चार प्रवासी संशयास्पद दिसत आहेत' असं सांगितलं. त्यापैकी दोघांकडे सेनेगलचे पासपोर्ट होते आणि त्या दोन्ही पासपोर्टचे क्रमांक सलग होते. उरलेल्या दोघांकडे होंडुरासचे पासपोर्ट होते. विशेष म्हणजे या चौघांनीही विमानाची तिकीटं अगदी शेवटच्या क्षणी काढली होती.

Send us Fan Mailत्या दिवशी जेव्हा ते तिथून निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा हिरोशिमावरील आकाशाचे स्वरूप अचानक बदलले. यामागुची यांनी वर पाहिले असता, त्यांना अमेरिकेचे B-29 हे बॉम्बर विमान आकाशातून उडताना दिसले. त्यातून पॅराशूटला जोडलेली एक छोटी वस्तू खाली सोडलेली होती. काही क्षणांतच, आकाशात एक प्रखर लख्ख प्रकाश पसरला. नंतर त्यांनी याचे वर्णन एखाद्या प्रचंड मॅग्नेशियम फ्लेअरच्या तीव्र झगमगाटा सारखे केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी एका खड्ड्यात उडी मारली, पण त्या स्फोटाच्या प्रचंड धक्क्याने ते जमिनीवरून वर उचलले गेले. स्फोटाच्या लाटेने त्याना हवेत भिरकावले आणि जवळच असलेल्या शेतात फेकून दिले.

Send us Fan Mailरशियाचा हुकूमशहा आपल्या खोलीत बेशुद्ध पडला होता… पण बाहेर उभ्या असलेल्या कुणाचीही आत जाण्याची हिंमत होत नव्हती. ज्याच्या एका शब्दाने माणसं तुरुंगात जायची, त्याच्यासाठी डॉक्टरांना बोलवायचं की नाही, हे ठरवायलाही सगळे घाबरत होते. भीती इतकी होती की लोकांनी स्वतःचा विचार करणंच सोडून दिलं होतं. ही गोष्ट आहे स्टालिनची… आणि त्याने उभी केलेल्या “होयबा” व्यवस्थेची. कारण सगळेच हो म्हणायला लागले, की खरं बोलणारं कुणी उरत नाही.=========

Send us Fan Mailजगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर. याच महासागरात, मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मासेमारी करणारा होता जोसे साल्वाडोर अल्वारेंगा. त्याच्याकडे होती फक्त सात मीटर लांबीची एक छोटीशी नाव.एका दिवशी मासेमारीला गेलेला अल्वारेंगा वादळात सापडला. नाव भरकटली… इंजिन बंद पडलं… संपर्क तुटला… आणि सुरू झाला असा प्रवास, ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती.ना जमीन, ना माणूस… ना अन्नाची शाश्वती, ना पिण्याचं पाणी. चारही बाजूंनी फक्त अथांग समुद्र.वादळं आली, भूक-तहान लागली, निराशा आली… पण जगण्याची इच्छा कायम राहिली.अशा अथांग समुद्रात ४३८ दिवस एकट्याने जिवंत राहणं… हा चमत्कारच नाही का?

Send us Fan Mailप्रिय चंदू.जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं. मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे तर तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. My dear boy, whose deaths are justifiable?परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का?ज्या दिवशी जन्माला येणं justifiable होईल त्या दिवशी आपण मरणाचं justification शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.

Send us Fan Mail"परतफेडीची संधीच न ठेवता केलेली मदत हे उपकार होतात. ते कोणालाही आवडत नाहीत". "तुम्ही त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून परतफेडीची संधी दिलीत. बरोबरीला आणलंत." "प्रेम फक्त बरोबरीच्या नात्यातच जन्मू शकतं! माणसाला असं वाटायला हवं की ‘मीसुद्धा या नात्यात काहीतरी देतोय."

Send us Fan Mailही कथा फक्त कंदिलाची नाही.आपण अनेकदा दुसऱ्यांच्या ज्ञानावर, दुसऱ्यांच्या अनुभवावर, दुसऱ्यांच्या विचारांवर किंवा दुसऱ्यांच्या मतांवर जगत असतो. पण तो उजेड कायमचा नसतो. एखाद्या क्षणी तो विझतो... आणि मग आपल्यालाच अंधारात चाचपडावं लागतं.म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितलेला एक सुंदर संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे—"अत्त दीपो भव."

Send us Fan Mailआपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या ५० फुट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहात होता. फक्त आपली लाडकी कुत्री ब्लाँडीला फिरवायला कधीकधी चॅन्सलरी बागेत जायचा तेव्हा चारी बाजूला बाँम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडलेले असायचे. २५ एप्रिल १९४५ नंतर हिटलरच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, स्वतःच्या मरणाची तयारी करणं.

Send us Fan Mailआटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस उजाडला. वारुळात जी नागाची नागकुळं होती, त्यांना नांगराचा फाळ लागला........जशी नागीण शेतकरी कुटुंबावर प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हांवरही प्रसन्न होवो. ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!”

Send us Fan Mail"ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे,माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे…”असं आपल्या कवितेतून सांगणारे कवी, गीतकार आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी जन्माला आली. त्यापैकीच एक गीत म्हणजे—“घन घन माला नभी दाटल्या,कोसळती धारा…”पावसाळ्याचं नितांत सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं करणारं हे गीत आजही तितकंच ताजं वाटतं. चला, ऐकूया ‘घन घन माला नभी दाटल्या' या प्रसिद्ध गीताची कहाणी.

Send us Fan Mailताईत असो की जादूची कांडी, इच्छा मागताना जरा जपूनच! कारण आपल्याला काय हवंय हे कळतं; पण ते मिळाल्यावर काय होईल, याचा अंदाज नेहमीच येतो असं नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण होणं आपल्यासाठी चांगलीच ठरेल असं नाही. कधी कधी हवी असलेली गोष्ट मिळते खरी, पण तिची किंमत मात्र, कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त निघते. म्हणून जे आहे त्यात समाधान मानणं आणि काही मागण्याआधी जरा विचार करणं—हेच खरं शहाणपण!प्रारब्धात किंवा नियतीत ढवळाढवळ करणे फार महागात पीडीयू शकते.....!

Send us Fan Mailएक तरुण देवाच्या भक्तीत इतका रमला की त्याने जगातल्या सगळ्या सुखांकडे पाठ फिरवली. देवाने त्याला एकच काम दिलं—“मला एक पेला पाणी आण.” पण पाणी आणायला गेलेला तो एका सुंदर मुलीच्या घरी अडकला…म्हातारपणी देवासमोर पोहोचल्यावर त्याने विचारलं, “मला परत का पाठवलंस?”देवाने त्याला जे सांगितलं, ते ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित आपल्यालाही काही गोष्टी नव्याने कळतील.

Send us Fan Mailआपल्या माणसांच्या चुका, सवयी लगेच डोळ्यात भरतात… पण त्यांच्यातलं चांगलं किती वेळा दिसतं? एकदा जरा न्यूट्रल होऊन बघा, माणूसच वेगळा दिसायला लागतो! इतरांकडे पाहण्याची ही नजर हळूहळू स्वतःकडेही वळते. मग कळतं—आपणही काही कमी नाही… आणि काही परफेक्टही नाही! चला, या मजेदार Neutral Thinking Game चा अनुभव घेऊया.=========

Send us Fan Mailऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन अशा 'आउटबॅक' प्रदेशात लाखो उंट मुक्तपणे फिरत असतात. पण मध्य-पूर्वेकडील प्रदेशाची ओळख असलेल्या या प्राण्यांचे इथे इतक्या मोठ्या संख्येने असणे कसे शक्य झाले?खरं सांगायचं तर, मला तिथे उंट दिसण्याची अजिबात अपेक्षा नव्हती.पण, यांची येथील सध्याची संख्या १० ते १२ लाखांच्या दरम्यान आहे आणि ही संख्या दर आठ-नऊ वर्षांनी दुप्पट होत असल्याचे सांगितले जाते. खरे तर, तो महामार्ग म्हणजे ‘उंटांची एक अखंड मिरवणूकच‘ का नाही म्हटली जात, याचेच आश्चर्य वाटते. मग, मुळचे इथले नसलेले प्राणी इतके प्रचंड संख्येने इथे नेमके आले कसे? हेच ऐकुया या गोष्टीत..!

Send us Fan Mailमी माझ्या खिडकीजवळच्या जागेवर बसलो होतो, तेवढ्यात साधारण सात वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांचा हात धरून माझ्या शेजारी आला.तो हळूच म्हणाला,“काका… जर तुमची हरकत नसेल, तर मला खिडकीजवळ बसता येईल का?”मी उत्तर देण्याआधीच त्याचे वडील म्हणाले ,“सर, मला माफ करा. कृपया तुम्हाला काही बंधन वाटून घेऊ नका. तो विमानतळावर आल्यापासून खिडकीजवळ बसण्याचा हट्ट करत आहे. तुम्हाला तुमची जागा ठेवायची असेल, तरी काही हरकत नाही.”मी हसत म्हणालो,“ही जागा आता तुझी आहे, चॅम्प!”क्षणातच त्या मुलाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.

Send us Fan Mailस्वर्गातून पृथ्वीकडे पाहताना एकादशी देवीच्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू होता. संपूर्ण जगात तिचे भक्त अन्नाचा एक कणही न खाता, स्वतःला कष्ट देऊन तिचे कडक व्रत पाळत होते. पण तिची नजर जेव्हा पुरीच्या श्रीक्षेत्र धामावर पडली, तेव्हा तिथे तिला वेगळेच दृश्य दिसले. तिथे उपवासाची कोणतीही सक्ती नव्हती, तर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. "माझे एवढे कडक व्रत सगळे जग पाळते, मग पुरीचे लोक असे काय वेगळे करतात की ते माझे नियम मोडत आहेत?" या विचाराने देवीच्या मनात थोडासा अहंकार आणि राग जागा झाला.

Send us Fan Mailएक भक्त होता. भगवान शंकरांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला इच्छापूर्ती करणारा शंख दिला. पण त्याच वेळी त्याच्या नजरेस पडला त्याहून मोठा महाशंख, आणि त्याचा लोभ जागा झाला. हा महाशंख प्रत्येक गोष्ट दुप्पट देण्याचं वचन द्यायचा... पण त्याचं एक गुपित होतं. त्या गुपिताच्या नादात भक्ताने स्वतःच्या हातचं सुखही गमावलं. शेवटी त्याला असा धडा मिळाला की तो ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चला तर मग, ऐकूया ही धमाल आणि विचार करायला लावणारी गोष्ट – दोन महाशंख!

Send us Fan Mailइंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे तुमारे तीन कोटी लोकसंख्येचे महानगर आहे. दक्षिण-पूर्व आशियातील महत्त्वाच्या आर्थिक आणि व्यापारी केंद्रांमध्ये त्याची गणना होते. पण अनेक दशकांपासून या महानगरावर एक अदृश्य संकट घोंघावत आहे. जकार्ताची जमीन हळूहळू खचत चालली आहे. काही भागातील जमीन गेल्या काही दशकांत चार मीटर पेक्षाही अधिक खाली गेली असून काही ठिकाणी आजही १० ते २० सेंटीमीटर प्रती वर्ष या वेगाने ती खचत आहे. त्यामुळे या देशावर राजधानी बदलण्याची नौबत आली आहे.

Send us Fan Mailमुंग्यांची महावसाहत वैज्ञानिक कुतूहलाचा विषय असली तरी ती पर्यावरणासाठी मोठे आव्हानही आहे. अर्जेंटाईन मुंग्या आक्रमक परकीय प्रजाती मानल्या जातात. त्या जिथे जातात तिथे स्थानिक मुंग्यांच्या प्रजातींचा विस्थापित करतात. अन्नस्रोतांवर ताबा मिळवतात आणि जैवविविधतेला धोका निर्माण करतात.

Send us Fan Mailआपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी असे विचार येतात, की ते कुणाला सांगायचं ही धाडस होत नाही. मग वाटतं, "आपण इतके वाईट आहोत का? मनात असे विचार आले म्हणजे आपण पापी ठरलो का?" हाच प्रश्न एका शिष्याच्या मनाला इतका पोखरत होता की तो थेट गुरुदेवांकडे गेला आणि म्हणाला, "मला शिक्षा द्या!" पण गुरुदेवांनी शिक्षा केली नाही. ते त्याला एका विषारी रोपट्यापाशी घेऊन गेले आणि एक असा प्रश्न विचारला, ज्यामुळे शिष्याच्या डोळ्यांत क्षणात प्रकाश पडला. तो प्रश्न नेमका काय होता?

Send us Fan Mailएक साधा कामगार, त्याने गाढवाच्या गळ्यात बांधलेला एक चमकणारा दगड.तो दगड नेमका काय आहे, याची कोणालाच कल्पना नसते, जोपर्यंत एका रत्नपारख्याची नजर त्याच्यावर पडत नाही.पण खरी कथा तेव्हा सुरू होते, जेव्हा त्या अमूल्य हिऱ्याची किंमत फक्त पन्नास रुपये ठरवली जाते.त्यानंतर घडणारी एक अनपेक्षित घटना या कथेला अशी कलाटणी देते, की तिचा अर्थ हिऱ्यापलीकडे जाऊन माणसांच्या मनाला स्पर्श करतो.कदाचित या कथेत तुम्हाला असा एखादा "हिरा" सापडेल, जो आजही तुमच्या अगदी जवळ आहे.

Send us Fan Mailतिरुपती बालाजी हे जगातील सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. पण या दानामागे नेमकी कोणती श्रद्धा दडलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? भगवान विष्णूंनी खरोखरच कुबेराकडून कर्ज घेतले होते का? महर्षी भृगूंनी विष्णूंच्या छातीवर लाथ का मारली आणि त्यानंतर महालक्ष्मी वैकुंठ सोडून का गेल्या? श्रीनिवास आणि पद्मावती यांच्या दिव्य विवाहाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि आजही भक्तांचे अर्पण त्या प्राचीन वचनाशी कसे जोडले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे उलगडणारी ही श्रद्धा, भक्ती आणि पुराणपरंपरेने समृद्ध अशी रंजक कथा नक्की ऐका.

Send us Fan Mailअण्णांनी त्याचे १०० रुपये परत केले आणि त्याला एक कप चहा फुकट देत म्हणाले,"हा आहे 'आयुष्याचा चहा'... एका घोटात पिऊ नकोस. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत हळूहळू पी."आज तोच मुलगा बंगळूरमधील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे.तो दर महिन्याला अण्णांना फोन करतो.आणि जेव्हा कधी तो पुण्याला येतो, तेव्हा तो सर्वात आधी अण्णांच्या दुकानात जातो.तो नेहमी दोन कप चहा मागवतो—एक स्वतःसाठी आणि एक अण्णांसाठी.

Send us Fan Mailदुसरं महायुद्ध १९४५ मध्ये संपलं. पण एका जपानी सैनिकासाठी ते तब्बल २९ वर्षांनी संपलं. फिलिपिन्सच्या दाट जंगलात तो एका आदेशाशी आणि एका विश्वासाशी आयुष्यभर निष्ठावान राहिला. जग बदललं, पण त्याचं जग तिथेच थांबून राहिलं. ही आहे लेफ्टनंट हिरो ओनोडा यांची अविश्वसनीय आणि हृदयस्पर्शी सत्यकथा. शेवटी ती प्रत्येकाला एकच प्रश्न विचारते, "आपणही नकळत एखाद्या संपलेल्या युद्धाशी आजही लढत तर नाही ना?"

Send us Fan Mailसंपूर्ण आयुष्य संसारासाठी जगलेल्या एका आईची एकच इच्छा होती. एकदातरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची. पण वय, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे ते स्वप्न अपुरंच राहणार असं वाटत होतं. आणि अचानक आलेल्या एका फोनने तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं. या वारीत तिला नेमकं काय मिळालं? विठ्ठलाचं दर्शन... की स्वतःचाच नवा शोध? एका साध्या आईच्या हृदयस्पर्शी वारीची ही भावस्पर्शी कथा नक्की ऐका.

Send us Fan Mailभारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने सात वर्षे देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षींकडे घेऊन गेली. महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून, त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले.सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्रीगणेशाचे ध्यान केले. हजारो वर्षे अन्नपाणी न घेता मंत्रांचा जप केला. सवनची कठोर तपस्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला, जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता.

Send us Fan Mail"ती म्हणते, आयुष्यभर मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचे होते. पण त्यासाठी साठ वर्षे लागली, त्याबद्दल तिला खेद आहे."जेम्सने तिचे हात घट्ट धरले, आणि उत्तर दिले:"तिला सांग, साठ वर्षे काहीच नाहीत.मला, एका अमेरिकन सैनिकाला इटलीतील युद्धभूमीवर एक बेवारस बाळ सापडले. त्याने त्या बाळाला ४० मैल खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. त्यानंतर पुढील ६० वर्षे तो फक्त एकाच प्रश्नाने जगत राहिला "ती जिवंत असेल का?मला फक्त एवढे जाणून घ्यायचे होते की ती सुखरूप आहे."

Send us Fan Mailकाही वर्षांपूर्वी वेटिंगमध्ये बसलेले लोक वर्तमानपत्र वाचायचे-काही मासिकं चाळायचे-काही एकमेकांशी बोलायचे-कुणी दुसऱ्या पेशंटशी ओळख काढायचा-डॉक्टर कसे आहेत याची चौकशी करायचा-एखादं मूल भिंतीवरच्या शरीररचनेच्या चार्टकडं बघून प्रश्न विचारायचं.आणि आता? दहा माणसं बसलेली असतात पण तिथं एकही माणूस नसतो; सगळे कुठेतरी दुसरीकडे गेलेले असतात..कुणी दुबईतल्या फूड ब्लॉगरसोबत-कुणी अमेरिकेतल्या प्रँक व्हिडिओमध्ये-कुणी कोरियन स्किनकेअरमध्ये-कुणी क्रिकेटच्या रीलमध्ये-कुणी राजकारणात तर कुणी कट-कारस्थानात आणि बाकी सगळे त्या "टे टे टे..."च्या तालावर मेंदूचा ताबा गमावत असतात..!"

Send us Fan Mailएकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली होती. तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला होता की तुला माझ्याकडून जे हवे ते तू मागू शकतेस.गांधारीने त्याच्याकडे शंभर पुत्र होण्यासाठी आशीर्वादमागितला होता. गर्भपातानंतर गांधारीने त्यांना बोलावून विचारले की, तूम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे, पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे. त्याला जन्म द्या किंवा एखाद्या मातीत गाडून टाका.

Send us Fan Mailआपल्याला प्रत्येकालाच आयुष्यात कधीतरी कौतुकाची थाप मिळावी, असं वाटतं. पण त्या कौतुकासाठी एखादा माणूस अशी एक खोटी गोष्ट सांगतो... आणि काही क्षणांतच ती खोटी गोष्ट त्याच्याच समोर उघडी पडते!प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात घडलेला हा अगदी खरा प्रसंग आहे.एका छोट्याशा गावात त्यांना भेटतो एक हुशार, सुसंस्कृत आणि अत्यंत आत्मविश्वासाने वागणारा तरुण. पण त्याने स्वतःच्या सुवर्णपदकाबद्दल केलेला एक दावा... पुढे असा काही वळण घेतो, की क्षणात सगळंच बदलून जातं.सत्य आणि असत्य समोरासमोर उभं ठाकल्यावर नेमकं काय घडतं? आणि एका साध्या प्रश्नामुळे त्याचा मुखवटा कसा गळून पडतो?माणसाच्या स्वभावाचा आरसा दाखवणारी ही सत्यकथा नक्की ऐका.

Send us Fan Mailरसिकाचे अविनाशशी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिची सासू, सुहासिनी उर्फ मंदाकिनी, तिच्याकडे शहरात काही दिवस राहायला आली. सुहासिनी रोज रसिकाला काहीतरी नवीन खायला करायला लावायची. जर रसिकाला नाही जमलं तर ते स्वतः बनवून खायची. रात्री मनाला वाटेल तेव्हा पर्यंत टीव्ही पाहायची, कधी कधी टीव्ही सुरु ठेऊनच झोपी जायची. सकाळी कधी आठ वाजता तर कधी नऊ वाजता उठायची. रसिकाच्या साड्या नेसून पाहायची. रसिकाला सासूचे वागणं काही कळेना.

Send us Fan Mailमहाभारतात अनेक प्रमुख आणि दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. मुख्यत्वे कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या भोवती हि कथा फिरते.अंबा, अंबिका आणि अंबालिका या महाभारतातील अत्यंतमहत्त्वाची पात्रे झाल्या. काशी नरेश म्हणजेच, राजा काशीराज, यांच्या तीन कन्या होत्या. जेव्हा या तिघींचे स्वयंवर होणार होते त्यावेळी भीष्माने एकट्यानेच तेथे आलेल्या सर्व राजांना पराभूतकरून तिन्ही कन्यांचे हरण करून त्यांना हस्तिनापुरात आणून माता सत्यवतीच्या समोर उभे केले; जेणे करून त्यांचे लग्न हस्तिनापुराचा राजा आणि सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य यांच्यासोबत संपन्न केला जावा.

Send us Fan Mailकल्पना करा... एक असं जग जिथे अन्न, पाणी, सुरक्षितता आणि प्रत्येक सुखसोय भरपूर आहे. मग तिथे राहणारे जीव सर्वांत आनंदी असतील... असंच वाटतं ना? पण एका वैज्ञानिक प्रयोगाने हा समजच उलटा करून टाकला. "Universe 25" या जगप्रसिद्ध प्रयोगात उंदरांसाठी स्वर्ग निर्माण करण्यात आला, पण पुढे जे घडलं ते विज्ञानविश्वालाही हादरवून गेलं. हा प्रयोग आजही एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो—केवळ सुखसोयी पुरेशा असतात, की अर्थपूर्ण जगण्यासाठी आणखी काही आवश्यक असतं? या विलक्षण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रयोगामागचं सत्य जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका.

Send us Fan Mailही कथा ऐकताना एक प्रश्न सतत मनात राहतो,माणूस खरंच शरीराने हरतो, की मनाने? बाईआजींनी आयुष्यभर स्वतःच्या अटींवर जगण्याचा निर्धार केला होता, पण नियतीने त्यांच्यासमोर एक अनपेक्षित वळण उभं केलं. त्या वळणावर त्यांनी स्वतःशी, मृत्यूशी आणि जगण्याशी केलेला संवाद मनाला खोलवर स्पर्शून जातो. एका छोट्याशा जाणिवेने त्यांचं आयुष्य पुन्हा कसं उजळलं, हीच या कथेची खरी ताकद आहे. शेवटी बाईआजी असा कोणता संदेश देतात, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकायलाच हवा? चला, ऐकूया "जगण्याचा उत्सव"

Send us Fan Mailपाऊस बदललाय की आपण?लोक म्हणतात, पाऊस कोपलाय... पण खरंच पाऊस बदललाय का?पूर्वी माणसांशी, झाडाझुडपांशी संवाद साधणारा पाऊस आज वर्षाची सरासरी काही दिवसांत का गाठतोय?की घाईच्या जगात तोही आपल्यासारखाच धावायला लागलाय?पाऊस चुकलेला नाही... तो फक्त आपल्याच बदललेल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवतोय.निसर्ग, माणूस आणि हरवलेल्या निवांत क्षणांची ही हळवी गोष्ट...

Send us Fan Mailसत्यवती हे महाभारतातील एक महत्त्वाचे आणि प्रभावशाली पात्र आहे. ती हस्तिनापूरचा राजा शंतनू याची पत्नी, कौरव-पांडवांची पणजी आणि वेदव्यासांची आई होती. तिने हस्तिनापूरच्या राजकारणाला नवीन दिशा दिली. सत्यवतीचा जन्म एका अप्सरेच्या गर्भातून माशाच्या रूपात झाला होता. एकदा राजा सुधन्वाच्या दरबारात एका माशाचे पोट उघडल्यावर त्यातून एक मुलगा आणि मुलगी बाहेर आले. राजाने मुलाला स्वतःकडे ठेवले आणि मुलीला कोळ्याच्या स्वाधीन केले. मच्छीमाराने त्या मुलीला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले. ती जसजशी मोठी होत गेली तसतशी ती खूप सुंदरही झाली. मच्छीमारांच्या वसाहतीत राहिल्यामुळे तिचे नाव मत्स्यगंधा पडले. तीच सत्यवती होय.

Send us Fan Mailपश्चिम घाट म्हणजे फक्त डोंगर नाही. पश्चिम घाट म्हणजे फक्त जंगल नाही. पश्चिम घाट म्हणजे आपला श्वास आहे. जगातल्या ३५ Biodiversity Hotspots पैकी एक म्हणजे आपला पश्चिम घाट. इथे असे हजारो प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आहेत जे जगात फक्त इथेच आढळतात. पण आज हे जंगल धोक्यात आहे. रस्ते होतायत, बांधकामं होतायत, झाडं तुटतायत आणि सोबत नाहीशा होतायत त्या प्रजाती ज्यांची नावंही आपल्याला माहीत नाहीत. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ४२५ वेगवेगळ्या वृक्ष प्रजाती आहेत. पण किती लोकांना माहीत आहे हे?

Send us Fan Mailमहाभारत म्हटलं की डोळ्यासमोर अनेक पात्रं उभी राहतात; अगदी अर्जुनापासून ते भीष्मापर्यंत परंतु सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे शकुनीचं. महाभारतातील सर्वात कपटी आणि कारस्थानी व्यक्ती म्हणून सर्वाना शकुनी परिचित आहे. गांधार देशाचा राजपुत्र आणि गांधारीचा सख्खा भाऊ असलेला शकुनी, महाभारताचे युद्ध घडवून आणण्यासाठी जबाबदार असेलल्या काही व्यक्तींपैकी एक आहे. गांधार देश हल्लीच्या अफगाणिस्तान मध्ये येतो.

Send us Fan Mailमथुरेवर राज्य करणाऱ्या वृष्णी यदुवंशीय देवमीढ शूरसेनाची ज्येष्ठ कन्या, म्हणजेच विस्तीर्ण नयनांनीची आणि अत्यंत रूपवती असलेली पृथा, हिचे बालपण काहीसे वेगळेच होते. तिचा जन्म होण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्याच्या स्वाधीन केले होते. त्यांनी तिला आपला जवळचा मित्र आणि अपत्यहीन चुलतभाऊ असलेल्या कुंती राज्याच्या भोज यदुवंशीय कुंतीभोजाला भेट म्हणून दिले होते. पृथाचा जन्म झाल्यानंतर लगेचच कुंतीभोजने तिला दत्तक घेतले आणि तेव्हापासून ती 'कुंती' या नावाने ओळखली जाऊ लागली.

Send us Fan Mailभगवान बुद्धांचे थोर शिष्य भिक्खु आनंद यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असे होते. काटकसरीपणा हा महामानवांचा विशेष सद़्गुण असतो. आनंदही अत्यंत काटकसरी होते. गरजेशिवाय ते दानाचा स्वीकार करत नसत आणि दानात कोणी मौल्यवान वस्तू दिल्या, तर त्यास नकार देत. 'अंगावरचं चिवर आणि हातातल्या भिक्षापात्रावरच मी संतुष्ट आहे,' असं ते म्हणत.

Send us Fan Mailपंढरीचा विठूराया… शेकडो वर्षांपासून विटेवर विनातक्रार उभा आहे.फक्त भक्ताची वाट पाहात....!कोण होता तो भक्त, ज्याच्यासाठी देव थांबून राहिला ?काय घडलं होतं त्या छोट्याशा विटेजवळ?आणि कशी सुरू झाली पंढरपूरच्या विठ्ठलाची ही अद्भुत गोष्ट?भक्ती, प्रेम आणि एका विलक्षण भेटीची कथा…“पुंडलिक भेटी आला पांडुरंग!”

Send us Fan Mailडॉ. जॅार्ज मरेच्या गोष्टीतला सर्वात मोठा धडा म्हणजे ‘विज्ञानाची सुरुवात अनेकदा एका साध्या प्रश्नापासून होते..‘त्याच्याकडं आधुनिक प्रयोगशाळा नव्हती. सीटी स्कॅन नव्हते. हार्मोन चाचण्या नव्हत्या. संगणक नव्हते; होतं ते फक्त निरीक्षण, तर्कशक्ती आणि प्रयोग करण्याचं धाडस..

Send us Fan Mailश्री. तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की..."महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?"तुलसीदास म्हणाले, "हो"भक्त म्हणाला, "मला पण दर्शन घडवाल का ?"तुलसीदास म्हणाले, "हो नक्की"तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!तुलसीदास म्हणाले , "अरे हे खुप सोप्पं आहे !! तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल."