Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send us Fan Mailदक्षिण समुद्रातील एका छोट्या बेटावर घडणारी ही गोष्ट आहे — प्रेम, विरह आणि काळाच्या शांत क्रूरतेची.रेड आणि सॅलीचं प्रेम इतकं खोल असतं, की गावातल्या लोकांना वाटतं हे दोघं कधीच वेगळे होणार नाहीत. पण समुद्रावरचं एक जहाज येतं… आणि एका क्षणात सगळं बदलून जातं.अनेक वर्षांनी जेव्हा हे दोघं पुन्हा समोरासमोर उभे राहतात, तेव्हा घडणारा प्रसंग मन सुन्न करून टाकतो.ही कथा सांगते — प्रेम संपत नाही असं आपण मानत असतो; पण काळ हळूहळू आठवणींचाही चेहरा बदलून टाकतो.Somerset Maugham यांच्या साध्या पण धारदार लेखनामुळे ही कथा संपल्यावरही मनात बराच वेळ रेंगाळत राहते.

Send us Fan Mail"महाराज, तुम्हाला हे ज्ञान कुठून मिळाले?"कीर्तनकार म्हणाले, "ज्ञानेश्वरीतून."नारायणाने लगेच विचारले, "मला शिकवाल का?"कीर्तनकरांना त्याच्या डोळ्यांत सच्चेपणा दिसत होता. ज्ञानेश्वरी ही नुसती वाचून समजणारी गोष्ट नव्हे, हेही त्यांना ठाऊक होते. ते म्हणाले —"शिकवीन. पण त्यात तीन मोठ्या अडचणी आहेत.""पहिली अडचण — संपत्ती. "जोपर्यंत माणूस संपत्तीला धरून बसलेला असतो, तोपर्यंत तो खरंच मुक्त होत नाही." " दुसरी — सेवा घेण्याची सवय. ज्याला कायम सेवा घ्यायची सवय असते, त्याला नम्रता समजत नाही. ""आणि तिसरी — प्रतिष्ठा ज्याला प्रतिष्ठा प्रिय असते, त्याला शरणागती जमत नाही. "नारायण लक्ष देऊन ऐकत होता. कीर्तनकार पुढे म्हणाले —ज्ञानेश्वरी या तिघांना सोडल्याशिवाय उलगडत नाही."

Send us Fan Mailराजाच्या पाहुण्यांना निरोपाची वेळ आली तेव्हा काही प्रजाजनही हजर होते. त्यात सरदार, दरकदारांपासून माळी, मजूर, दासी असे सगळ्या वर्गांमधले लोक होते. कृष्णकेतूने मोठ्या रुबाबात सगळ्यांना आज्ञा दिली, "तात्काळ निर्वस्त्र व्हा." सगळे कपडे उतरवून उभे राहिले.शुभ्रकेतू हसला.............लोकशाही असो वा राजेशाही —राजा किती बलवान आहे यापेक्षा, सामान्य माणूस किती निर्भय आहे, यावर त्या समाजाचं भविष्य ठरत असतं.

Send us Fan Mailअस्वस्थ राजा प्रधानाला म्हणाला, “एक य:कश्चित न्हावी माझ्यापेक्षा अधिक सुखी आहे, हे मला सहन होत नाही. काहीतरी करा.”प्रधानाने त्याच्या आयुष्यात नव्याण्णव रुपये टाकले. मग त्याच्या आयुष्याची परवड सुरू झाली. “आधी न्हावी 'आहे त्यात आनंदी होता.' पण आता त्याला शंभर पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर दोनशे, मग पाचशे, मग हजार. आता त्याच्या मनाच्या भुकेला शेवट उरला नाही.”“आता त्याच्याही नशिबात तुमच्या सारखा राजयोग आला आहे. आता तोही कधी शांत राहणार नाही.”हे ऐकून राजा प्रसन्न झाला... ...मात्र, प्रधान जाईपर्यंतच.... कारण आपल्यापेक्षा प्रधान अधिक प्रसन्न आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं!

Send us Fan Mailपांडवांनी द्रौपदीच्या सोबतीने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत १२ वर्षे वनवास पूर्ण केल्यानंतर त्यांना अज्ञातवासात जायचे होते. अज्ञातवास म्हणजे ते कुठे आहेत हे कोणालाही माहित न होणे. द्युताच्या नियम अटीनुसार त्यांना अज्ञातवासात कोणी ओळखले तर त्यांना परत वनवासात जावे लागणार होते. यासाठी पांडवांनी अज्ञातवासासाठी विराट राजाचे मत्स्य राज्य निवडले. त्यांनी आपला वेष बदलला आणि विराट राजाच्या सेवेत वेगवेगळ्या नावांनी रुजू झाले. सर्वांनी आपापल्या स्वभाव आणि गुणधर्माला अनुसरुन रूप घेतले.

Send us Fan Mailज्या समाजात मुलीचा जन्मच अस्वागतर्ह आहे, तिथे तिचं लग्न होणं, तिला मुल व त्यातही मुलगाच होणं अत्यावश्यक असतं. अन्यथा अशा स्त्रीला, वांझ, निपुत्रिक म्हणून समाज छळतो. अशा स्त्रियांना अपत्यप्राप्ती साठी चुकीच्या मार्गला नेलं जातं, जिथे तिचं शोषणच होतं.बुवा-बाबांच्या शोषणाला समाजातील सर्वच स्तरांतील लोक बळी पडतात. नीताला मूल होण्यासाठी सदाबाबाने तरंगणाऱ्या गडव्याचा चमत्कार करून दाखवला.पण तिने योग्य वेळी 'अंनिस'चे ( अंधश्रद्धा निर्मूलन समिती ) कार्यालय गाठल्यामुळे तिचे शोषण थांबले.समाजाची ही दुबळी मानसिकता दूर करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे.

Send us Fan Mailगुलाबचे बाबा गटारे साफ करायचे. म्हणून शाळेतली मुलं तिला "वासाडी" म्हणून चिडवायची. एक दिवस खूप दुखावून ती बाबांवर ओरडली, "हे घाणेरडं काम का करता तुम्ही? पिढ्यानपिढ्या हे काम चालत आलं असलं तरी आता बदलायला हवं. कोणतं तरी मशीन वापरायला हवं यासाठी." आणि तिने खरोखरच एक मशीन बनवलं. गटार साफ करणारं, जेणेकरून बाबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आत उतरावंच लागणार नाही. बाबांच्या मनात आलं, "हिला कसं सांगू की अशी मशीन्स आधीच अस्तित्वात आहेत. पण......."

Send us Fan Mailपर्ल बक या साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखिका. ही कथा स्त्रीच्या आंतरिक स्वातंत्र्याचा शांतपणे शोध घेणारी आहे. चाळिसाव्या वाढदिवशी मादाम वू एक अशी घोषणा करतात की संपूर्ण वाडा हादरून जातो.त्या आपल्या पतीला शांतपणे सांगतात की “आजपासून पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्यं पूर्ण झाली असं त्या मानतात. आता त्या त्यांच्याबरोबर शयनकक्षात राहणार नाहीत. पण तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या त्यांच्यासाठी एक तरुण उपपत्नी आणणार आहेत”.

Send us Fan Mailकाही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा स्वर्गीय सूर यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. कोणीही अमर नाही हे माहीत असूनही आशाताईंच्या नावामागे स्वर्गीय लिहायला मन तयार होत नाही. अशी एकही भाषा नसेल आणि स्री व्यक्तिरेखेचं असं एकही रुप नसेल ज्याला आशाताईंच्या स्वरांचं कोंदण मिळालं नाही.नवरसातले सर्वच्या सर्व भाव आजपर्यंत त्यांच्या गळ्यातून निघाले आहेत. अनेक संगीतकारांनी त्यांच्या आवाजाच्या पोताला न्याय दिलाय. शब्दांना सूर हवे असतात तसंच भावनांना ही सूरांची गरज असते.ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन यांनी आशाताईंना एकही शब्द गायला न लावता त्यांच्या स्वर्गीय सुरांचा वापर करून ज्या गीताची निर्मिती केली त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत एक इतिहास घडवला.

Send us Fan MailThe Old Man and the Sea या जगप्रसिद्ध कादंबरीची ही गोष्ट आहे . या कादंबरीमुळे अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील नोबेल प्रतस्काराने सन्मानित करण्यात आलं. हेमिंग्वेचं यांचं हे अजरामर वाक्य — “A man can be destroyed but not defeated.”माणूस नष्ट होऊ शकतो… पण पराभूत होऊ शकत नाही.या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचं तत्त्वज्ञान दडलं आहे. शरीर थकू शकतं, काळ संकटं देऊ शकतो, नशिबाने वारंवार झटके देऊ शकतात, स्वप्नांचे तुकडे होऊ शकतात… पण मनातली जिद्द जिवंत असेल, आत्मविश्वास अजून श्वास घेत असेल, आणि पुन्हा उभं राहण्याची तयारी असेल — तर पराभव कधीच अंतिम ठरत नाही.हरणं म्हणजे पडणं नव्हे… हरणं म्हणजे उठण्याची इच्छा संपणं....!

Send us Fan Mailवाढदिवस किंवा कुठलाही विशेष कार्यक्रम करताना आजकाल फुग्यांची सजावट करण्याची जोरदार पद्धत आली आहे. फुगे स्वस्त आहेत म्हणून सजावटीसाठी वापरले जातात परंतु ते पर्यावरणासाठी किती मोठ्या प्रमाणावर हानिकारक आहे याचा विचार केला जात नाही! प्रदूषणाचा महाराक्षस सर्व बाजूंनी पृथ्वीला वेढत आहे त्यात आता ही फुगेबहार आली आहे!

Send us Fan Mailव्यायामानंतर मेंदूत नेमकं काय घडतं?कधी विचार केलाय का, की फक्त काही मिनिटांची शारीरिक हालचाल तुमच्या मेंदूमध्ये चक्क विजेच्या लहरी निर्माण करू शकते? हो, हे खरं आहे. याच लहरी तुमच्या विसरभोळ्या मेंदूला अतिशय वेगवान बनवू शकतात.

Send us Fan Mailएका गरीब घरात तिचा जन्म झाला.ती तीन वर्षांची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. अनेक अडचणींवर मात करून तिने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं.इतकं हलाखीचं आयुष्य असूनही ती पायलट होण्याचं मोठं स्वप्न ती पहात होती. संधी मिळताच ती " पॅराशूट क्लब " मध्ये सराव करू लागली. नियमित सराव, अविरत मेहनत, अभ्यास आणि अंतराळात जाण्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यातून वेलेनतिना तेरेशकोवा हिने जगातील पहिली महिला अंतराळवीर होण्याचा इतिहास घडवला.

Send us Fan Mailराजाच्या आमंत्रण वरून तो तरुण राजमहालात राहू लागला. गाद्यागिरद्यांवर झोपू लागला. पंचपक्वान्नं खाऊ लागला. सुंदर दासी त्याची सेवा करू लागल्या. तो सगळ्यांचा उपभोग घेत होता ,अगदी सहजपणे. राजाची झोप उडाली. रात्री रात्री तो तळमळत पडे. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न ठाण मांडून असे,"या तरुणात आणि माझ्यात फरक काय? मी राजसुख उपभोगतोय, आणि तो ही त्याचा उपभोग घेतोय. मग, मी राजा, तू साधक. मी भोगी, तू योगी. असं का?"

Send us Fan Mail"डॉक्टर, तो साध्या 'पॅरासिटॅमॉल'ने बरा होणार नाही हो... तुम्ही त्याला ते 'स्ट्राँग एंटीबायोटिकच द्या. उद्या मुलाची ट्रीप आहे, आम्हाला रिस्क नकोय!"त्या सुशिक्षित बापाचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगाचा तिळपापड झाला.त्यांना 'रिस्क' नको होती. कळस म्हणजे, त्या ५ वर्षांच्या मुलाला फक्त व्हायरल सर्दी होती, आणि त्याचे वडील स्वतःच्या हाताने त्याच्या शरीरात एका 'भस्मासुरा'ला जन्म द्यायला निघाले होते.

Send us Fan Mailहे ठिकाण पूर्वी 'गंधादन' वन म्हणून ओळखले जात असे. येथे मेधावी नावाचे एक महान ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना अपत्य नव्हते, म्हणून त्यांनी महालक्ष्मीची आराधना केली. एके दिवशी त्यांना वंजुल वृक्षाखाली एक लहान मुलगी सापडली. ऋषींनी तिचा सांभाळ आपल्या मुलीप्रमाणे केला आणि तिचे नाव 'वंजुलवल्ली' ठेवले. जेव्हा वंजुलवल्ली लग्नाच्या वयात आली, तेव्हा स्वतः भगवान विष्णू गरुडावर बसून तिच्याशी विवाह करण्यासाठी तिथे आले. पण एका कन्येच्या पित्याला, मेधावी ऋषींना, आपल्या लाडक्या मुलीला सासरी पाठवताना काळजी वाटत होती. म्हणून ऋषींनी भगवान विष्णूंकडे एक अट घातली. ते म्हणाले, "हे प्रभू, जर तुम्हाला माझ्या मुलीशी विवाह करायचा असेल, तर या घरात आणि या मंदिरात माझ्या मुलीचा शब्द अंतिम असेल, तिला तुमच्यापेक्षाही पहिला मान मिळेल." भक्ताच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विष्णूंनी हे मान्य केले.

Send us Fan Mailहा नैसर्गिक वायू पृथ्वीच्या पोटातून काढला जातो तेंव्हा तो वायू रुपात असतो आणि तो वायू रूपातच ठेवला आणि वहन करायचं म्हटलं तर त्याला प्रचंड मोठी जागा लागणार म्हणून याला द्रव रुपात परीवर्तित करावा लागतो आणि त्यासाठी त्याचे तापमान शून्याच्या खाली म्हणजेच वजा 163 डिग्री सेल्सिअस इतकं उतरावे लागते म्हणजे तो गॅस द्रावरूपात परीवर्तित करून आम्हाला आमच्या जहाजात नेता येतो, हे गॅस थंड करण्याचे एकमेव कारण म्हणजे 600 लिटर गॅस जेंव्हा -163 डिग्री वर थंड केला जातो त्यावेळी तो फक्त 1 लिटर द्रव इतकाच होतो.

Send us Fan Mailकाही दिवसांपूर्वी माझे मामे सासरे घरी आले होते. त्यांचा ठाम नियम — “माझ्याजागी देवाच्या पाया पडा.”त्यांचं म्हणणंही योग्यच.पण माझं थोडंसं वेगळं म्हणणे आहे.देवाला नमस्कार — तो रोजचा, मनापासून.पण माणसातल्या देवाला नमस्कार — तोही तितकाच आवश्यक.कारण देवाचे आशीर्वाद आपल्यामागे असणे गरजेचेच. पण ते ऐकू येत नाहीत, मोठ्यांचे ऐकू येत असलेले आशीर्वाद —“सुखी रहा”, “आनंदी रहा”, “यशस्वी हो”…हे शब्द कानावर पडतात, मनात मुरतात.

Send us Fan Mailजॉन स्टाइनबेक ह्या अमेरिकन नोबेल साहित्य पुरस्कार विजेत्या लेखकाची ही कथा आहे. मेक्सिकोच्या किनाऱ्यावर एक लहानसा कोळीवाडा आहे. किनो कोळ्याचं चं आयुष्य अगदी साधसुध आहे. बायकोच शांत, समजूतदार, आणि नवऱ्यावर जीव टाकणारी. त्यांच कधी पोट भरतं, कधी भरत नाही. पण ते समाधानी आहेत. त्यांना एक लहानसा मुलगा आहे — कोयोटिटो. जेमतेम काही महिन्यांचा. त्याच्या कडे एक विशेष कला आहे — समुद्रात बुडी मारून मोती काढण्याची.. एक दिवस त्याला एक मोती मिळाला . साधासुधा नाही. असा सफरचंदाच्या आकाराचा. चांदीसारखा चकाकणारा. आत अनेक चंद्र, अनेक आकाशगंगा सामावल्यासारखा. मोती कधीच कोणी बघितला नव्हता.......तो मोती आता फक्त एक वस्तू राहिला नव्हता. तो झाला होता एक आरसा. माणसांचं खरं रूप दाखवणारा आरसा.....

Send us Fan Mail३ एप्रिल १९७३. ठिकाण :न्यूयॉर्क शहर. सकाळचे साधारण दहा वाजले आहेत. सिक्स्थ ॲव्हेन्यूवर त्या एका माणसाकडे लोकं वळून वळून बघतायत.कारण त्याच्या हातात जी वस्तू आहे, ती दिसायला अगदी एखाद्या विटेसारखी आहे. लांबलचक, जाडजूड, वर एक मोठा अँटेना... आणि त्या विटेसारख्या वस्तूतून हा माणूस, चक्क बोलतोय! रस्त्याच्या मधोमध उभं राहून, फोनवर बोलतोय!ज्यादिवशी मार्टिन कूपरने तो फोन हातात घेतला, त्या दिवशी त्यांनी फक्त एक तांत्रिक चमत्कार केला नाही. त्यांनी माणसाला वायरच्या गुलामगिरीतून मुक्त केलं.

Send us Fan Mailशीलाने कामावरच्या लोकांसाठी लेमोनेड व फुलांचे गुच्छ घेतले. एक पर्फेक्ट बिझनेस मॅाडेल 12 वर्षांच्या अनाथ मायाने उभं केलं होते. आजीची रेसिपी, “लेमोनेड फॅार स्माईल्स” हे सुंदर नाव, “आजीचं लेमोनेड तुमचा सगळा शीण घालवेल!” अशी उत्तम टॅग लाईन व प्रमोशन..पाच लेमोनेड वर एक गुच्छ फुकट! कुठं शिकली हे सगळी एवढीशी पोरं ? लॅव्हेंडर, जिंजर-मिंट, बेरी असे किती प्रकारचे लेमोनेड होते!

Send us Fan Mailव्यंकटेश माडगूळकर यांचं पुस्तक वाचत असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली .. ही गोष्ट आयुष्यात फारच उपयोगी ठरली. माडगूळकरांच्या बहिणीचा कान ठणकत होता. डॉक्टर म्हणाले, "ऑपरेशन तर करावंच लागेल."माडगूळकर मग त्यांच्या एका परिचित वैद्याकडे बहिणीला घेऊन गेले. वैद्यांनी कान पाहिला. लक्षणं विचारली. औषध कानात टाकलं आणि म्हणाले, .. "तीन दिवसांत कान बरा होईल. काळजी करू नका ..!!" विशेष म्हणजे, या औषधानं कानाचा ठणका थांबला. फडफड बंद झाली. चांगले ऐकायला येऊ लागलं. ..!! माडगूळकर या लेखात म्हणतात .. 'कुठल्याही आजाराच्या बाबतीत आणखी एखाद्या डॉक्टरांचं किंवा वैद्याचं मत घ्यावंच. हे *सेकंड ओपिनियन* आपल्या समस्या कदाचित सोडवू शकतं

Send us Fan Mailन्यायाधीशांनी केस ऐकली आणि मुलाला विचारले, “तू खरंच ब्रेड आणि चीजचं पॅकेट चोरलं होतंस का?”मुलाने खाली मान घालून उत्तर दिलं,“हो.”न्यायाधीश :- “का?”मुलगा :- “गरज होती.”न्यायाधीश :- “खरेदी का नाही केली?”मुलगा :- “माझ्याकडे पैसे नव्हते.”न्यायाधीश :- “घरच्यांकडून घेतले असते.”मुलगा :- “घरी फक्त आई आहे… ती आजारी आहे आणि बेरोजगार आहे. ब्रेड आणि चीज तिच्यासाठीच चोरलं.”

Send us Fan Mail“दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात. पण नातं फाटलं की लोक थांबतात. अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…”ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले,“दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.”============

Send us Fan Mailरॅपिड आय मूव्हमेंट (REM) स्लीप ही झोपेची एक अद्वितीय, सक्रिय अवस्था आहे, जी तीव्र मेंदू क्रियाकलाप, स्पष्ट स्वप्ने, डोळ्यांची जलद हालचाल आणि तात्पुरत्या स्नायू पक्षाघाता मुळे (अटोनिया) वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणपणे दर ९० मिनिटांनी चक्रात येणारी, REM अवस्था स्मृती दृढीकरण, भावनिक प्रक्रिया आणि शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Send us Fan Mailनसरुद्दीनने मित्राला राजेशाही पोषाख घालायला दिला. जिथे जातील तिथे परिचित त्या मित्राशीच बोलू लागले. त्याच्या पाहुणचार करू लागले. त्याने नसरुद्दीनच्या मनात असूया जागी झाली. यजमानांना मित्राचा परिचय करून देताना त्याने सांगितलं की "हा माझा फार जवळचा मित्र आहे, आजच आला, मग माझेच कपडे मी त्याला घालायला दिले. छान आहेत ना?"पुढे काय झालं ?.....

Send us Fan Mailजेवण संपल्यावर बटू म्हणाला , " काकू सगळं छान झालं होत." मैत्रिणीने आनंदाने विचारलं " आवडलं ना सगळं ? "यावर निरागसपणे आठ वर्षांचा आशिष म्हणाला," हो, आईने सांगितलंय ...कसेही झाले असले तरी छान म्हणावे. समोरच्याला बरे वाटते " ===========

Send us Fan Mailतुम्ही खूपच उत्तम कामगिरी करत आहात. तुम्ही लोकांचा आदर करता, मग त्यांची पदे किंवा दर्जा काहीही असो. आता आम्हाला सांगा—आमच्यापैकी 'बॉस' (मुख्य अधिकारी) कोण आहे?""हो, सर. तुमच्यापैकी दोन जण केवळ निरीक्षण करत आहेत. त्यातील एक जण वित्त विभागातील (Finance) आहे—ते केवळ पगाराविषयी चर्चा होईल तेव्हाच बोलतील. दुसरे गृहस्थ या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शक आहेत—ते 'एचआर' (HR) विभागातील आहेत. अगदी टोकाच्या खुर्चीवर बसलेले गृहस्थ अधूनमधून बोलतात आणि कधीकधी स्मितहास्य करतात. तेच खरे 'बॉस' आहेत. मध्यभागी बसलेल्या व्यक्तीकडे मात्र तुम्ही सर्वजण अधिक लक्ष देत आहात; आणि हे केवळ असा आभास निर्माण करण्यासाठी केले जात आहे की, तेच या सर्वांचे 'बॉस' आहेत."

Send us Fan Mailएकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता.त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले.

Send us Fan Mailअख्ख्या कोर्टरूममध्ये एकदम स्मशानशांतता पसरली. सुनीता आणि कविताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या नवऱ्यांनी (दाजींनी) एकमेकांकडे पाहिले आणि ते हळूच बहिणींच्या कानात पुटपुटले, "आपल्याला हे घर नको आणि ती म्हातारीची जबाबदारी आणि कर्जही नको! तू केस मागे घे." बहिणींनी खाली मान घातली. त्यांना आपली चूक समजली होती.

Send us Fan Mail“ओह! इट इज टू लेट'', म्हणत तो जायला निघाला. त्याला हसून सगळ्यांनी निरोप दिला. तो गेल्यावरही मंजिरीचं ‘राजा पुराण' चाललंच होतं. माधवला भुरक्यावरून खडसावूनही झालं. रात्री मंजिरी शांत झोपली, पण माधवची मात्र झोप उडून गेली. कारण…‘बायकोचा मित्र!'माधव-मंजिरीचा नित्यक्रम सुरू झाला, राजा गेला खरा, पण माधवच्या मनातून राजा काही जात नव्हता. मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी त्या राजाने घर करून ठेवलं होतं आणि ती बोच अधूनमधून डोकं वर काढत होती.

Send us Fan Mailपूर्वी पश्चिम उपनगरांतून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करत असताना ट्रेन अंधेरी सोडून पुढे गेली की पार्ले ग्लुकोज बिस्कीटांचा वास येई. बिस्कीटं भाजली जात असल्याचा तो दरवळ गाडीभर पसरे. अनेकांची भूक खवळून उठे. गाढ झोपेतला प्रवासीही या घमघमाटाने जागा व्हायचा. ट्रेन पार्ल्याच्या जवळ आलीय, हे कळायचं. किती वर्षं तरी मुंबईकरांनी रेल्वेने येता जाता त्या वासामुळे मनात ती बिस्कीटं खाल्ली असतील. पूर्वी बिस्कीट म्हणजे पार्ले असंच वाटायचं.

Send us Fan Mail‘हिस्ट्री टुडे'नुसार, पिझ्झाच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल १८८९ मध्ये झाला. खरे तर, राजा उम्बर्टो पहिला आणि राणी मार्गेरिटा (मार्गेरिटा ऑफ सॅवॉय) नेपल्सला भेट देणार होते. त्यांना फ्रेंच जेवणाचा कंटाळा आला होता आणि त्यांना काही स्थानिक पदार्थ चाखून बघायचे होते. प्रसिद्ध पिझ्झा निर्माता राफेल एस्पोसिटो यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी राणीसाठी तीन प्रकारचे पिझ्झे तयार केले, त्यापैकी एक तिला खूपच आवडला.

Send us Fan Mailकल्पना करा की कडाक्याची थंडी पडली आहे. बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळिंदरांचा एक कळप थंडीने कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवी आहे. साहजिकच, उबेसाठी ते एकमेकांच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात, तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचायला लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उबेसाठी पुन्हा जवळ येतात आणि पुन्हा तेच काटे टोचतात. हा खेळ असाच सुरू राहतो. जोपर्यंत त्यांना एक असं 'योग्य अंतर' सापडत नाही, जिथे त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत.

Send us Fan Mailमी ॲमेझॉनमधून मनात एक हुरहूर घेऊन परत आलो…आणि एक जाणीव घेऊन , की त्या सात दिवसांत… माझं शरीर त्याच्या नैसर्गिक घरात होतं !आणि आता ज्या पिंजऱ्यात मी परत आलो…तो मीच बांधला होता…हळूहळू… एकेक सोयीच्या नावाखाली.अजूनही…कधी कधी…डोळे बंद केले की…ते जंगल आठवतं… विचार येतो , "जर मी पुन्हा तिथे गेलो…तर ते मला ओळखेल का?"आतून एक उत्तर येतं "जंगल आपल्यापेक्षा खूप जुनं आहे…आणि खूप संयमी सुद्धा …जंगल लक्षात ठेवत नाही…पण ते नाकारतही नाही."==========

Send us Fan Mailजेरुसलेमच्या गोलगाथा टेकडीवर, प्रभू येशूचं क्रुसीफिक्सेशन उरकून, दोन मजूर खाली सैनिक छावणीत, क्रुसीफिक्सेशनचा 'मेहनताना' घेण्यासाठी आले. मुकादमाने त्यांना किती खिळे ठोकले विचारलं व प्रभू येशूच्या अंगावर ठोकलेल्या खिळ्यांइतक्या सुवर्णमुद्रा अदा करुन, त्यांना म्हणाला, 'जा ऐश करा!'

Send us Fan Mailएक टॅक्सी चालक नेहमी रात्रपाळी करत असे. एक दिवस एक वयोवृद्ध गृहस्थ त्याची टॅक्सी भाड्याने घेतात. पण त्यांची एक अट असते - ते त्याला काही रोख रक्कम देणार असतात. त्याच्या बदल्यात त्याने ते सांगतील त्या त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं व वाटेत एकदाही " का " असा प्रश्न विचारायचा नाही. टॅक्सी चालक त्यांना सगळीकडे घेऊन जातो.परंतु सुरुवातीला त्याला त्यांच्या बद्दल वाटलेलं आश्चर्य शेवटी सहानुभूतीत परावर्तित होतं. अस काय घडतं त्या दोघांच्या प्रवासात?...

Send us Fan Mailअयोध्येत दररोज एक तास रामकथा रंगायची.त्या दरबाराची सुरुवात एका अनोख्या आमंत्रणाने व्हायची“या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा…”त्या काळात ही केवळ परंपरा नव्हती,ती होती अढळ श्रद्धेची जिवंत अनुभूती.त्या दरबारात एक विद्वान वकीलही नियमित येत असे.भक्तिभावाने तो कथा ऐकत असे, पण त्याची बुद्धी तर्काला सरावलेली होती.एक दिवस मनात प्रश्न उभा राहिला,“खरंच येतात का हनुमंतजी?”प्रश्न विचारला गेला…विश्वासाला आव्हान दिलं गेलं…....!

Send us Fan Mail“आजोबा, तुम्ही रोज स्वतःच्याच नंबरवर फोन का करता?”“तुझी आजी जिवंत होती ना… ती मला रोज याच वेळी फोन करायची."दुसऱ्या दिवशी, अगदी त्याच वेळी,त्यांना जगातला सगळ्यात गोड आवाज ऐकू आला“हाय आजोबा… फक्त एवढं सांगायचं होतं, की या वेळी अजूनही कुणीतरी तुमची आठवण काढतंय.”

Send us Fan Mailअनेक वर्षापासून दारावर एक ड्रेस मटेरियल, बेडशिट असे कापड प्रकार विकायला मुलगा येतो. तो सुरतेहून कापडं आणतो.त्याने आणलेल्या सामानावरून मी एक नजर टाकते. एक- एक प्रिंटही फार सुंदर असायची.त्यातल्या त्यात वेधक वेचक असं काही असेल तर केवढ्याला आहे! अमूक अमूक उघडून दाखव वगैरे संवाद सुरू होतो.त्याचा माझा सौदा पटला तरच ती वस्तू घरात येते.बरेचदा आमच्या दोघां मधला सौदा तुटतो/ फिसकटतो. मग मी सरळ नकार देऊन दरवाजा लावू का विचारून दार बंद करते.

Send us Fan Mailजेव्हा खटला सुरू झाला, तेव्हा गिडियनने न्यायालयाकडे एक साधी, घटनात्मक मागणी केली:"महाराज, माझी अशी विनंती आहे की, या खटल्यात माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला एक वकील दिला जावा."जजचे उत्तर सभ्य होते, पण भयंकर होते:"मिस्टर गिडियन, मला क्षमा करा, पण मी तुम्हाला वकील देऊ शकत नाही. फ्लोरिडा राज्याच्या कायद्यानुसार, न्यायालय फक्त तेव्हाच वकील नियुक्त करू शकते जेव्हा आरोपीवर मृत्युदंडाच्या शिक्षेचा गुन्हा असेल."

Send us Fan Mailआज्जी चांगल्या घरच्या दिसत होत्या. अगदी गळून गेल्या होत्या थकव्याने. घाबरलेल्या स्थितीत होत्या. कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देता येत नव्हते. कसंबसं हे कळलं की कोणीतरी त्यांना बाइकने धक्का मारला आणि त्या पडल्या. ज्याची बाईक होती तो तसाच निघून गेला.त्या सतत एकच गोष्ट सांगत होत्या ,'मी माझ्या मुला सोबत आले, हरवले आणि माझ्या जवळ १०० रुपये होते ते सुद्धा चोरले.

Send us Fan Mailनिसर्गावर प्रेम करणारा कवीमनाच्या मुलाची गोष्ट. त्याला शिस्त, संयम लावण्यासाठी एका रेषेत अडकवल. तिथे त्याची शाळा सुरू झाली. मग प्रतिभेला धुमारे फुटले. वडीलांनी पण साथ दिली. त्यातून एका निसर्गप्रिय महान व्यक्तीचा शिक्षण प्रवास सुरू झाला.

Send a textतुळजापुरात तुळजाभवानी भवानी मंदिर परिसरात काळभैरव आणि टोळभैरव या दोन क्षेत्रपाल देवतांची मंदिरे आहेत. वास्तविक तुळजापूर परिसरात भैरवाची अनेक ठाणे आहेत. त्यात कालभैरव, टोळ भैरव, उन्मत्त भैरव, रक्तभैरव, बटभैरव ही प्रमुख आहेत. इथे प्रचलित असलेल्या श्रद्धेनुसार कालभैरव हे देवस्थान तुळजाभवानी मंदिरापेक्षाही पूर्वीचे असून देवीच्या पूर्वीपासून कालभैरव इथे विराजमान आहेत.

Send a textपुण्याच्या 'वैकुंठ स्मशानभूमीत' गेल्या तीस वर्षांपासून 'महादेव' हे मृतदेह जाळण्याचे काम करायचे. अंगावर एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्र वास... हीच महादेव यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कोणीही जवळ करत नसे.

Send a textतेरावं झाल्यावर रोहित शंकरपाशी गेला आणि तोरा दाखवत म्हणाला,"बघा शंकरराव, आता आई नाहीये. त्यामुळे तुमचं आणि माझं नातं संपलं. हे घर माझ्या सख्ख्या वडिलांचं आहे. मला हे घर विकायचं आहे. तुम्ही तुमची सोय बघा आणि उद्यापर्यंत रूम खाली करा."शंकर शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुखः होतं, पण रोहितच्या वागण्याचं आश्चर्य नव्हतं.ते फक्त एवढंच म्हणाले, "हो बाळा. मला माहित होतं हा दिवस येणार आहे. मी माझी बॅग भरली आहे. मी आजच निघतो."

Send a text"मी सुंदर आहे का?" हा तिला पडलेला प्रश्न. शाळेतल्या मुलींच्या तोंडून ऐकलेले टोमणे, कुत्सित हसू तिला सांगत होतं, तू सुंदर नाहीस. तीलाही ते पटायला लागलं होतं. आरसा सांगू लागला होता, "ती सुंदर नाही. " अखेर तिनं आईला विचारलं, " मी सुंदर आहे? " आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, " पण तुला काय वाटतं स्वरा.....?"

Send a textस्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करून केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, परंतु स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची क्षमताही ती गमावून बसते.' त्यावेळी असे स्पष्ट विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड विचारांमुळे मेरीला प्रचंड प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.

Send us Fan Mailपप्याचा चिन्मय हा बालमित्र. सध्या बेंगलोरला पायलट म्हणून काम करत असतो. गावाकडे जत्रेसाठी वर्षातून एकदा येतो. “ “अरे विमान चालवणं म्हणजे काय तुला बैलगाडी चालवणे इतका सोपं वाटतं काय?” चिन्मयने विचारले.दोघे पप्या ची बैलगाडी घेऊन रानात निघाले. पण चिन्मयला काही बैलगाडी आणि बैल सांभाळता येईना. त्यांने बैलगाडी डायरेक्ट ओढ्यामध्येच लँड केली.“अरे निर्जीव मशिनी चालवण्या परीस हे जिवंत चित्रा व सांभाळणं लय अवघड असतं बाबा! जीवाला जीव जोडावा लागतंय तवा कुठे जनावर ऐकतय” म्हणत पप्प्याने बैलांच्या सोन्या आणि गुण्याच्या शेपट्या विरघळल्या आणि गाडी झपाट्याने रानात पोहोचवली.“ मित्रा खरंच हृदय आणि मन असलेल्या बैलांचे ड्रायव्हिंग करणं अवघड असते बरं आम्ही विमानाने माणसं वाहून नेतो पण तुम्ही शेतात बैल चालवणारे शेतकरी तुमच्या बैलगाडीने देशाची अर्थव्यवस्था ओढत असता” चिन्मय म्हणाला.

Send us Fan Mailपरिस्थिती संवेदनशील होती. इतक्यात बचाव मोहिमेची बातमी आली आणि त्या महिलेला सकाळी सव्वादहाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. संपुर्ण महिला विमान कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. वास्तविक दुसरीच पायलट मोहिमेवर जाणार होती परंतु आयत्यावेळी एका 23 वर्षीय महिला पायलटच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या या बचाव मोहिमेत, कॅप्टन जसविंदर कौर यांच्यासोबत ती कार्य करत होती जिचे नाव दीपिका अधाना होतं.

Send us Fan Mailमुनेच्या काठी गायी चारताना कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी एकत्र केलेला “काला” – आणि त्यामागे दडलेली एक सुंदर कृष्णलीला. देवांनीही तो प्रसाद मिळवण्यासाठी किडे-मुंग्या आणि माशांचे रूप का घेतले? आणि काल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुवू नयेत अशी प्रथा कशी पडली? संतांच्या अभंगातून जपलेली ही कथा आपल्याला एकत्र येण्याची, प्रेमाने वाटून खाण्याची आणि सख्य जपण्याची शिकवण देते. चला, गोपाळकाल्याच्या या रंजक कथेत डोकावूया.========