Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send a textस्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो सन १७९२ मधे मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्त्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून ज्यात तिने स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करून केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, परंतु स्वतःला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची क्षमताही ती गमावून बसते.' त्यावेळी असे स्पष्ट विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड विचारांमुळे मेरीला प्रचंड प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.

Send a textपांडवांचे स्वर्गारोहण उत्तराखंडमधील माना गावाजवळील 'स्वर्गारोहिणी' पर्वतावरून झाल्याचे मानले जाते. जाता जाता वाटेत मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतु, द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होते. हे एक प्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इथवरच पोहोचू शकली.” पुढील टप्प्यात सहदेवाने प्राण सोडले. युधिष्ठिर म्हणाला, “सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला देहत्याग करावा लागला.” पाठोपाठ नकुलानेही देह ठेवला. तेव्हा युधिष्ठिराने भीमाला सांगितले, “नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता. म्हणून तो मृत्यू पावला.” त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, “आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारू, अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्धांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला.” काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले, “भ्राताश्री, मी काय केले म्हणून मला मरण येत आहे?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, तू माझा अत्यंत लाडका भाऊ! परंतु, तुझ्यातही दोष असा आहे की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे. शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.”

Send a text९४८ साल. टोकियोमध्ये युद्धानंतरचा एक ऐतिहासिक खटला चालू होता. जपानच्या नेत्यांवर युद्धगुन्ह्यांचे गंभीर आरोप ठेवले गेले होते .जगातील अकरा देशांतील न्यायाधीश त्या खटल्याचा निकाल देण्यासाठी बसले होते. एकामागोमाग एक न्यायाधीश आरोपींना दोषी ठरवत होते. जणू निकाल आधीच ठरलेला होता. पण त्या वेळी एका भारतीय न्यायाधीशाने शांतपणे वेगळे मत मांडले. ते होते न्यायमूर्ती राधाबिनोद पाल. त्यांनी सांगितले की, "न्याय म्हणजे फक्त शिक्षा देणे नव्हे, तर न्यायाची प्रक्रिया तत्त्वांवर आधारित असली पाहिजे." अकरा न्यायाधीशांत उठलेला तो एकटा भारतीय आवाज इतिहासात आजही दुमदुमत राहिला आहे.

Send a textति ज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की, “यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार?” या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं.मी काय केलं?वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकं विकत घेते; पण वाचून झाली की ती लायब्ररीला किंवा मैत्रिणींना देते. उरलेली औषधं केमिस्टकडे परत देते. ही औषधं एखाद्या गरजूंना मोफत द्या, असं त्याला सांगते.वयोमानामुळे साडी नेसणं कठीण झालं, तेव्हा दोन-तीन साड्या ठेवून बाकी देऊन टाकल्या.आता माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने नाहीत, पर्सची चळत नाही; प्लास्टिक पिशव्या किंवा डिस्पोजेबल डब्यांचा साठाही नाही.आणि गंमत म्हणजे, त्यामुळे काहीच अडत नाही, हेच आता लक्षात आलं आहे.

Send a textगोड शब्द नेहमीच गोड असतात का? कौतुकाच्या शब्दांत लपलेला सापळा कसा जीवघेणा ठरतो, हे सांगणारी ही छोटी पण तीक्ष्ण कथा — “गोड सापळा”. एका चलाख कोल्ह्याने गोड बोलून रचलेला सापळा… आणि त्या गोड बोलण्याला भुलून त्याच्यावर दोनदा विश्वास ठेवणाऱ्या भोळ्या गाढवाची गोष्ट.

Send a textएकदा अंधाराने परमेश्वराकडे तक्रार केली की सूर्याचं माझ्याशी काय वैर आहे, ते मला माहिती नाही. पण, पृथ्वीवरून मला सतत हुसकावत असतो.सूर्य म्हणाला, पण, हा अंधार कोण आहे? तो कसा दिसतो? माझी त्याची काही ओळखही नाही. मी कशाला त्याचा पिच्छा पुरवेन? एकदा त्याची माझी भेट करून दे. या गोष्टीला लाखो वर्षं झाली… पण, सूर्य आणि अंधार यांची समोरासमोर भेट परमेश्वरही करून देऊ शकलेला नाही. त्यामुळे अंधाराच्या तक्रारीचा निवाडा आजवर होऊ शकलेला नाही.

Send a textमि. बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते. पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी सतार बनवणे ही एक वेगळीच कला आहे. सतार बनवतांना कुशल कारागीर फक्त पंढरपूरचे आणि लखनौचे भोपळेच वापरतात. पंढरपूरच्या भोपळ्यांची साल जाड असते तर लखनौच्या भोपळ्यांची पातळ. सतार बनवणारे कारागीर त्याच्या पसंतीने भोपळे निवडतात. खाण्याच्या भोपळ्यांपेक्षा हे भोपळे वेगळे असतात. चवीला अत्यंत कडू असतात.

Send a textएकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?'' सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !'' वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !''

Send a textएक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला," खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे "

Send a textशाळेला १० संगणक भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन 'मिस्टर सुहास ओक' आले होते. सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता - "दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे".

Send a textएके दिवशी शिव शंभूंनी भक्त कन्नप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपनं निर्माण करून मंदिराचे छत पाडले, हे दृश्य बघून सगळे लोकं मंदिरातून पळून गेले पण कन्नप्पा यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या शरीराने शिवलिंगाला झाकून घेतलं, नंतर त्यांना शिव शंभूच्या डोळ्यांतील सांडत असलेलं रक्त दिसलं, हे बघून कन्नप्पा यांनी पटकन बाणाच्या सहाय्याने स्वतःचा एक डोळा काढला आणि शिव शंभूला लावून दिला.

Send a textएक दिवस छळछावणीत अचानक गोंधळ उडाला. एक गर्भवती स्त्री जमिनीवर पडली होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण त्या नरकात कोणाकडे तिला मदत करण्याची ताकद नव्हती… औषध नव्हतं… अन्न नव्हतं. ती स्त्री जवळजवळ बेशुद्ध पडली होती.आई मार्सेल यांनी आपल्या मुलीला विचारलं —“आपण चॉकलेटचा हा तुकडा तिला देऊया का?” " हो !"पन्नास वर्षांपूर्वी पोटात अन्नाचा कण नसलेल्या मुलीने स्वतःचा विचार न करता तिला मदत केली होती. त्या कृतीमुळे दोन आयुष्य वाचली . आणि ती मुलगी मोठी होऊन इतरांना बरे करणारी डॉक्टर बनली .

Send a text“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे… चिंटूच्या समोर तुझी ती गावाकडची भाषा बोलू नकोस!”सागरचा आवाज थोडा चिडलेला होता.“उद्या त्याचा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस माज्या राजा' ‘बरा हाय न्हवं', किंवा ‘राम-राम ' म्हटलं ना… तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही. ... स्टेटस बघतात… क्लास बघतात!”

Send a textअँटोनियोने मारियाकडे पाहिलं.एवढीशी.. लहान…इतकी घाबरलेली…आईला हाक मारणारी आणि मग…त्याने तेच केलं, जो आता त्याच्या पुढचा एकमेव मार्ग होता.त्याने आपल्या लेकीला पोर्थोलमधून बाहेर ढकललं.मारिया काळ्या पाण्यात पडताच किंचाळली.अँटोनियोने उरलेल्या ताकदीने ओरडून सांगितलं —“पोहत रहा मारिया! रोषणाईकडे पोहत जा! जहाजं येत आहेत — पोहत रहा!”

Send a text१९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते"बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो दवाखान्यात तळमळत आहे, विचारणारासुध्दा कोणी नाही"??

Send a textमनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. त्यातूनच 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच. एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. "मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या, माझी लेकरं माझी घरी वट पहात असतील. त्यांना एकवार शेवटचे जवळ घेऊ द्या" अशी हरिणीने विनंती करून परत येण्याचे वचन पारध्यास दिले.

Send a textसमीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली. गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले. ते काही गिचमिड नव्हतं. ती 'कॅल्क्युलसची अवघड समीकरणं' होती, आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.

Send a textतुम्हाला दोन-तीन दिवस ताप आला होता. औषध घेतलं नसतं तरीसुद्धा शरीर स्वतःहून बर झालं असतं.पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात.त्यांनी भरपूर चाचण्या लिहून दिल्या. थोडं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर दिसलं. आहारावर मर्यादा काटेकोरपणे पाळल्या नाहीत, पण औषधं घेणं विसरलात नाहीत.काही महिन्यांनी, सर्व औषधांच्या साईड इफेक्टमुळे तुम्हाला हृदयाचा रुग्ण, डायबेटिक, झोप न येणं, अपचन, थायरॉईड, किडनी आणि ही यादी वाढत गेली.हळू हळू गोळ्यांची संख्या वाढत गेली......हळूहळू तुम्हाला वाटू लागलं की तुम्ही गंभीर रुग्ण आहात. कुणीही सांगितलं नाही की "तुम्ही तुमचं आरोग्य मनाची ताकद, आत्मविश्वास आणि जीवनशैली बदल यामुळे सुधारू शकता!"

Send a textअक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, 'सकुबाई', भाजी विकायला बसायची . पेमेंट करायला फोन काढल्यावर , आजी गळ्यात लटकवलेला 'QR Code' पुढे करायच्या.स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं - "जीवन हॉस्पिटल ट्रस्ट".' नातवाच्या किडनीच्या उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल.' असे डॉक्टरने सांगितल्याने,ती दिवसाला एक वडापाव खाऊन पैशाला हातही न लावता ते थेट नातवाच्या जिवासाठी ट्रस्ट कडे जमा करत होती .........!

Send a textकोकणातील अनेक वयोवृद्ध रुग्णांचा आहार डाळभात, भात-डाळ किंवा पेज इतकाच मर्यादित असल्याने पोषणतुटी जाणवते. कधीतरी मच्छीची आमटी किंवा साधी भाजी हा एकमेव बदल असतो. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे बी-कॉम्प्लेक्स देणं आवश्यक ठरतं. निराधार अवस्थेत औषधांसाठी येणाऱ्या आजींना सॅम्पलची औषधं आधार देतात. म्हातारी १० पैकी ३ गोळ्या घेते. पित्ताची आणि बी-कॉम्प्लेक्सची गोळी खाते आणि महत्त्वाचं अॅन्टिबॉयोटिक खातच नाही. कोरा चहा, तंबाखू यांनी अगोदरच वाढलेल्या पित्ताला माझ्या गोळ्यांनी भडकवलेलं असतं. =========

Send a text"सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?”डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,“शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर—फक्त वर्गात येण्यासाठीही विद्यार्थी किती प्रयत्न करतो. कदाचित पहाटे उठून, कडाक्याच्या थंडीत, लांबचा प्रवास करून, बस-ट्राम-ट्रेनमध्ये उभा राहून तो इथे आला असेल.उत्तरपत्रिका कोरी असली तरी तो आला, याचा अर्थ त्याने प्रयत्न केला आहे. मग मी त्याला शून्य कसा देऊ?”

Send a textआपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे ३० पेक्षा जास्त वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन देता देता शंभर, दोनशे, तीनशे अशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हात त्यांच्या सोबतीला येऊ लागले. बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली. कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर कधी मुंबईतला भयंकर पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू शकला नाही.

Send a textमग एका दुपारी, माझ्या आईने फोन केला आणि म्हणाली, "तुझे वडील बरे नाहीत." तिचा आवाज शांत होता, पण त्यामागे लपलेली भीती मला जाणवत होती. मी विचारले काय झाले. ती म्हणाली, "ते बाजारातून परतण्याचा रस्ता विसरले." मी हलकेच हसलो, तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. "अरे, कधीकधी असे होते." माझी आई हसली नाही. ती हळूवारपणे म्हणाली, "ते काल तुझ्या चुलत भावाचे नाव विसरले होते." ते वाक्य माझ्या छातीत दगडासारखे बसले.

Send a textअत्री ऋषी स्नानाला गेल्यावर त्रिदेवांनी अतिथींच्या वेषात अनसूयेची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी “आई, इच्छाभोजन दे, पण विवस्त्र होऊन” अशी विचित्र मागणी केली. अनसूयेने तपोबलाने त्यांना ओळखले आणि वात्सल्यदृष्टी टाकताच ते तिघे बालरूप झाले. तिने त्यांना प्रेमाने भोजन व दूध देऊन पाळण्यात जोजवले.त्रिदेवींना आपापले पती ओळखता न आल्याने त्यांनी शरणागती पत्करली. अनसूयेने देवांना पूर्ववत केले, पण तिचा पाळणा रिकामा झाला. तिच्या पातिव्रत्याने प्रसन्न होऊन त्रिदेवांनी तिच्याच पोटी जन्म घेण्याचे वर दिले. मार्गशीर्ष पौर्णिमेला ते दुर्वास, दत्तगुरु आणि चंद्र या त्रिगुणात्मक रूपात प्रगट झाले.

Send a text"टिचरने खूप कौतुक केलं त्याचं — फार सुंदर पेपर लिहितो म्हणाल्या. फक्त बोलता कमी येतं, म्हणून घरी इंग्रजीत बोलायला सांगितलं."मी ऐकत होते.तिने स्वतः इंग्रजीचा क्लास लावला होता, बदल्यात टीचरच्या पोळ्या करून देत होती. मी मनोमन तिच्या जिद्दीला सलाम केला.“छोट्या गावात वाढले ताई… बाबा लवकर गेले… अकरावीत लग्न झालं… शिकायचं राहिलंच. पण आता याची आई म्हणून कमी पडणार नाही. बारावीचा फॉर्म भरलाय. उद्या याला माझी लाज वाटायला नको.”मग हसत म्हणाली, “आज याला पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार!”अशी भेटली ती साधी, पण आतून खूप खंबीर आई !=========

Send a textओशो मिनिमलिजम विषयी बोलत होते तेवढ्यात एक श्रीमंत शिष्य उठला.अंगावर महागडं वस्त्र,हातात सोन्याचं घड्याळ आणि चेहऱ्यावर थोडा ताण..तो म्हणाला,”भगवान,मी सगळं ऐकलंय..कमी वस्तू,साधं जीवन..पण माझ्याकडं तर खूप काहीये..घरं,गाड्या,पैसा..हे सगळं सोडायचं का?”ओशो म्हणाले,”तुझं घड्याळ काढ.” “आता अंगठी.”“बाहेर काढलेले बूट कचरापेटीत टाक..”तसे केले आणि शिष्य त्याच्या कक्षात जाऊन पलंगावर पडला पण झोप येईना..घड्याळ नाही..वेळ कळत नव्हती..अंगठी नाही..हात रिकामा वाटत होता..बाहेर बूटही नाहीत..जणू काहीतरी विसरल्यासारखं झालं..........!

Send a text“अहो, माझा जावई एका पोरीच्या नादी लागलाय. गाडी भाड्यानी द्यायचा त्याचा धंदा आहे.”“अग ती एवढी शिकलेली, विमानानी फिरणारी, ड्रायव्हरच्या कशी प्रेमात पडेल?”“कसंय वहिनी, माझा जावई तरणा बांड, देखणा गडी आहे, इंग्रजी बोलतो.भाळली असेल. ह्या आत्ताच्या पोरींचं काय सांगता येतंय?”नीलाने लेक-नातींना माहेरी आणलं, सगळ्यांना भिडून लेकीमागे ठाम उभी राहिली.सरते शेवटी प्रकरण मिटलं.नीलाने शांतपणे लेकीला परत सासरी पाठवलं.मला म्हणाली, “वैनी, व्यवहाराच बघायचं असतं बघा. माझ्या पोरीला जन्मभर पोसायला मी खंबीर आहे — असं बोलणं त्या वेळपुरतंच असतं. उद्या माझ्या पोरांची लग्न झाली की... बहिणीची त्यांना अडचण होणार की नाही?"“तुटेल इतकं ताणायचं नसतं बघा… वेळेवर सोडलं की फार पुढे जात नाही.”

Send us a textवयाच्या तेराव्या वर्षी तिशीची समज आली. भूक माझी सगळ्यात गोड मैत्रीण झाली आणि अपमान तिचा सावलीसारखा सोबती.भूक कायम जागी असायची, माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. अपमान आला की डोळ्यांना पाझर फुटायचा, पण त्यानंच चिंतन शिकवलं.हळूहळू कळलं, प्रत्येकाच्या आतड्यात भूकेची वसवट असते आणि अपमानाला जात नसते. हे उमगलं की उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या भूक आणि अपमानच असतात.आज मी पलीकडच्या तिरावर पोचलोय; ही गुरूमंडळी अलीकडच्या तीरावर उभी आहेत . माझ्या वाटेला येत नाहीत आता, ओळख नसल्यासारखी वागतात. पण त्यांची शिकवण माझ्यात जिवंत आहे.======

Send us a textपुण्याच्या वास्तव्यात एमव्ही सर्वांना खुशीने भेटत आणि त्यांच्या गप्पात सामील होत. मित्रमंडळींना आवर्जून सांगत की मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या पुण्याच्या मुक्कामात मला लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, साहित्यसम्राट केळकर वगैरे अनेक विद्वान, देशप्रेमी, थोर मंडळींचा सहवास लाभला. एमव्हींची आठवण म्हणून पुण्यात नाव घ्यावे असे स्मारक नाही, याची मात्र उणीव राहून गेलेली आहे.

Send us a textती म्हणाली, "मला माहित आहे की मी मरणार आहे. प्रत्येकाला वाटतं की मला काही कळत नाही, पण मला कळतं. मी त्यांना म्हणताना ऐकलं की आता कॅन्सर सगळीकडे पसरला आहे. ते म्हणाले, कदाचित सहा महिने. कदाचित त्याहूनही कमी."मी पुस्तक खाली ठेवलं. "अमारा, मला खूप वाईट वाटतंय."तिने त्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. "मिस्टर माईक, मी तुम्हाला काही विचारू का?""काहीही विचार, बाळा."तिने त्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. "मिस्टर माईक, खरंच, मी तुम्हाला काही विचारू का?""काहीही, बाळा.""मी मरेपर्यंत तुम्ही माझे बाबा व्हाल का?"

Send us a textसर्वात धक्कादायक बाब म्हणजे वनस्पतींना 'स्मृती' (Memory) आहे. एका प्रयोगशाळेत, वनस्पतींनी त्यांना पाणी देणाऱ्या व्यक्तीला (नर्चरर) आणि त्यांची पाने कात्रीने कापणाऱ्या व्यक्तीला (असॉल्टर) ओळखले. असॉल्टर खोलीत येताच, वनस्पतींच्या अंतर्गत विद्युत सिग्नलमध्ये वाढ होत असे आणि झाडे धोक्याचा सामूहिक अल्ट्रासोनिक इशारा प्रसारित करत असत. याउलट नर्चरर खोलीत आल्यावर झाडे शांत रहात असत.

Send us a textनवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रातांनुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या अदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

Send us a textसकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपला जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती. "आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल..." या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.

Send us a textदेवदूत स्त्रीजवळ गेला आणि तिला स्पर्श केला.“प्रभु, तिला तुम्ही खूपच मऊ बनवलं आहे.”देव म्हणाला,“हो, ती मऊ आहे, पण मी तिला खूप मजबूत सुध्दा बनवलं आहे. ती किती सहन करू शकते आणि किती अडचणींवर मात करू शकते, याची तुला कल्पनाही नाही करता येणार!”

Send us a textएकदा पुंडलिक नावाचा एक तरुण त्या वेळच्या पर्यटनाच्या साधनांनी काशीच्या यात्रेला निघाला होता, तो जंगलातून जातअसताना त्याचा रस्ता चुकला, तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसला …तो आश्रम श्री कुकुटस्वामीचा होता. तिथे तो दोन रात्री राहिला कारण तो खूप थकलेला होता. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुट स्वामीना काशीला जाण्याचा सोपा व जवळचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही, हे अनपेक्षित ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, “तुम्ही कसले ऋषी आहात??, स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला पण गेला नाहीत.'' कुक्कुट ऋषीची खिल्ली उडवून पुंडलिक तसाच पुढच्या प्रवासाला निघाला.

Send us a textएक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले "तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?" सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले. यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंत सर्वांचा समावेश होता."ऐसा सद्गुरु पूर्णपणी" हा पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल?" सारे शिष्य गडबडले. अगदी अकराशे पारायणे झालेला सुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला. तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले "स्वामीजी,ऐसा सद्गुरु पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."

Send us a textकुणी जिज्ञासू व्यक्तीने हा प्रश्न पू.लं.ना विचारला "तुम्ही कधी आतला आवाज ऐकला आहे का?"."माझ्या लेखी आतला आवाज म्हणजे "अहो , ऐकलं का?...जरा आत येता का?" असा जो आतून म्हणजे स्वयंपाक घरातून येतो .....तो आतला आवाज ". "जीवन शांततेत घालवायच असेल, तर नेहमी तो आतला आवाज जो सांगेल ते ऐकून वागा , सुखी व्हाल आणि राहाल"...!

Send us a text2 जून 1982, British Airways, Flight 9 , Boeing 747 हिंद महासागरावर शांतपणे उडत होतं. अचानक काचांवर निळसर प्रकाश चमकू लागला आणि अवघ्या काही सेकंदांत, एकामागोमाग एक…चारही इंजिन बंद झाली.सात मैल वर आकाशात, इंजिनशिवाय उडणारं बोइंग 747 हे तब्बल चारशे टनांचं विमान एका प्रचंड ग्लायडरसारखं खाली घसरू लागलं....

Send us a text“अहो ऐका ना…”“तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा ना .”“का? काय झालं?”“काय झालं काय?” “दिवसभर फोन… फोन… फोन! इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक! त्यांना कंटाळा कसा येत नाही? बायकोचा सूर हळूहळू वाढत गेला . .....खरं तर फोनवर बोलणारे वृद्ध फार बोलके नसतात;ते घरातल्या शांततेशी झुंज देत असतात. कधी कधी माणसाला कमी फोनची नाही, तर थोड्या जास्त सहजीवनाची गरज असते.आणि ते घरपण घरातच मिळाले , तर फोन आपोआप शांत होतो.

Send us a text“पुढे बरेच महिने गेले. वर्षही लोटली, पण माझा मित्र प्रदीप सापडलाच नाही. . "तेव्हापासून रस्त्यात मला माझ्या वयाचा रस्त्यावरील फाटका माणूस दिसला की मी तो “तो” आहे का ते पाहतो”. प्रदीप कधीच सापडला नाही, पण उमेशमामाच्या मनात तो कायम जिवंत राहिला. त्या गरीबाला मदत करताना उमेशमामाला जणू आपल्या हरवलेल्या मित्राची सेवा केल्यासारखं वाटतं. माणुसकी, आणि नात्यांची खोल भावनिक गुंफण सांगणारी ही गोष्ट आहे .

Send us a textत्यानं म्हाताऱ्याच्या पैशांची तीनही गाठोडी डोक्यावर घेतलेली होती.पण आता ओझं फक्त त्याच्या डोक्यावर नव्हतं, मनावरही होतं."मी पळून गेलो तर हा म्हातारा काय करणार? एका झटक्यात मी श्रीमंत होईन. बायकोचं रडणं थांबेल . प्रतिष्ठा , आराम, पैसा…"आणि त्याचा तो तिसरा आवाज जिंकला. तो पळून गेला. .."हरला!"" ही परीक्षा होती, प्रामाणिक सुरक्षा मंत्री शोधण्यासाठी ".....माणूस गरीब पैसे नसल्यामुळे होत नाही;तो गरीब होतो, लोभाच्या एका क्षणाला बळी पडल्यामुळे!

Send us a textशेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, संतापलेला असा दरोडेखोर नवरा , वाल्या कोळी समोर येऊन ठाकल्यावर त्याच्या अशिक्षीत बायकोने "व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !" असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?

Send us a textमोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या पथकाचे प्रमुख मार्टिन कूपर यांनी पहिला मोबाईल कॉल न्यूयॉर्कच्या सहाव्या अॅन्हेन्यू मधून पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी आपल्या मोबाईल वरून पहिला फोन न्यू जर्सीला केला होता. हा कॉल त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅबचे जोल इंग्लर यांना केला होता. या कॉल बद्दल मार्टिन म्हणाला होता, "जेव्हा मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून हातात फोन धरून बोलत चाललो होतो, तेव्हा रस्त्यावरील लोकांनी मला भर गर्दीतही वाट मोकळी करून दिली होती. त्या वेळी चालता चालता मी बरेच कॉल्स केले, ज्या पैकी एक मी रस्ता ओलांडताना न्यूयॉर्क रेडिओच्या निवेदकाला केला होता, जी तोपर्यंत मी केलेली सर्वात धोकादायक गोष्ट होती. "हा जगातला पहिला मोबाईल फोन त्या काळी $ ३९९५ ला विकला गेला होता आणि त्याचं नाव होतं 'द ब्रिक'.

Send us a textगेल्या हिवाळ्यात, एक तरुण त्या काळजी केंद्राच्या स्वागत कक्षात आला. त्याने ब्लँकेट्स बनवणाऱ्या स्त्रियांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मचारी सुरुवातीला कचरले, पण त्यांनी त्याला आमच्या सनरुममध्ये आणले. त्याच्या हातात एक निळ्या-पिवळ्या रंगाचा स्कार्फ होता, ज्यामध्ये विणलेल्या विस्कळीत ओळी होत्या."मला हा स्कार्फ डिसेंबरमध्ये केंद्रात मिळाला होता," तो म्हणाला. त्याचा आवाज कापत होता. "मी दररोज रात्री पुलाखाली तोच पांघरून झोपायचो. त्याच्या झालरीमध्ये एक टॅग लावलेला होता: 'एलेनॉर, वय ८४, यांनी हाताने विणलेला. You are not alone- तुम्ही एकटे नाही."

Send us a textमाझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —मी ते हलवत नव्हतो, मी ते हलताना पाहत होतो.मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ, मिलिमीटर अंतरावर, क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती..

Send us a textएक ६२ वर्षांचे अभियंता घाबरलेल्या अवस्थेत माझ्या दवाखान्यात आले.गेले सहा महिने त्यांची स्मरणशक्ती खालावत होती. ते बैठका विसरत होते. पार्किंगमध्ये आपली गाडी कुठे लावली आहे हे विसरत होते."माझ्या वडिलांना ६५ व्या वर्षी अल्झायमर झाला होता," ते मला म्हणाले. "मलाही तोच आजार झाला आहे."त्यांच्या पत्नीनेही या सर्व गोष्टींना दुजोरा दिला. प्रगतीतील घट. व्यक्तिमत्त्वात बदल. नेहमीपेक्षा जास्त चिडचिडेपणा ही लक्षणं पण होती.

Send us a textमी घरात शिरलो, पाहुण्यासारखा खुर्चीवर बसलो. बूट काढले, पाठोपाठ कपडे उतरविले. बाथरुममधे गेलो, हात - पाय - तोंड स्वच्छ धुतलं. टॉवेलनी हात पाय पुसत बैठक खोलीत येऊन बसलो . क्षणातच केळे घातलेला शिरा आणि उप्पीट असलेली डिश समोर आली. मला आश्चर्य वाटलं. फारच भूक लागली असल्यानं पुढं आलेलं न बोलताच सारं पोटात ढकललं. पाठोपाठ चहा आला, तसा चहा घेतला. जोराची ढेकर दिली. मन प्रसन्न झालं. कारण पोटातील यज्ञाला आहुती मिळण्याचं भाग्य लग्नानंतर प्रथमच माझ्या वाट्याला आलं होत. आज असं कसं काय घडलं, ते जाणून घ्यावयाची तीव्र इच्छा निर्माण झाली. कदाचित माझ्या चेहऱ्यावरील भावना सौने ओळखल्या असाव्यात. तेवढ्यात सौ. माझ्या जवळ आली आणि तिच्या गोड आवाजात म्हणाली “ मी राजीनामा दिलाय बरकां हो !"

Send us a textएकदा विवेकानंद असेच निश्चल ध्यानस्थ बसले होते. बऱ्याच वेळाने त्यांनी डोळे उघडले, तर समोर एक ढाण्या वाघ उभा होता. त्याच्या हिरव्याजर्द पिवळसर डोळ्यात भक्ष्याला न्याहाळणारी भूक होती. स्वामींनी मंदस्मित केलं. वाघ जणू भिक्षेला आला होता! आपल्यामुळे निदान एका जीवाची तरी भूक भागणार आहे, या विचारानं आनंदून त्यांनी डोळे मिटले आणि वाघ झेपावण्याची वाट पाहू लागले. काही क्षण तसेच सरले. त्यांनी आश्चर्यानं डोळे उघडून पाहिलं, तर तो वाघ दूर निघून जाताना दिसला. त्या वाघाच्या डोळ्यात दिसलेली भूक खोटी नव्हती आणि आता त्याचं गुर्गुरत जंगलात जाणंही खोटं नव्हतं. हा प्रसंग नंतर आपल्या गुरुबंधूंना सांगताना स्वामीजी उदगारले की, " माझ्याभोवती परमेश्वरी कृपेचं कवच आहे आणि त्यामुळेच माझं रक्षण झालं आहे, हे मला जाणवलं. माझ्या हातून काही कार्य व्हायचं आहे आणि ते पार पडेपर्यंत माझी या जगातून सुटका नाही, हे मला पुरतं समजलं होतंच, पण ईश्वर माझं रक्षण करीत आहे, हेदेखील मला कळलं होतं."

Send us a textएकदा, गजेंद्र आणि त्याच्या पत्नी त्यांची तहान भागवण्यासाठी एका तलावावर पोहोचले. तहान भागवल्यानंतर, गजेंद्रला पाण्यात खेळावेसे वाटले. तो तलावात आपल्या पत्नींसोबत खेळू लागला. दुर्दैवाने, त्याच क्षणी, एक मोठा मगर आला. त्याने गजेंद्रचा उजवा पाय आपल्या दातांनी धरला आणि त्याला तलावात ओढायला लागला. गजेंद्र वेदनेने ओरडायला लागला. तलावाच्या काठावर असलेल्या त्याच्या पत्नी त्यांच्या पतीच्या दुःखावर अश्रू ढाळायला लागल्या. गजेंद्र मगरीशी सर्व शक्तीनिशी लढला, पण तो स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवू शकला नाही. गजेंद्र त्याच्या लांब सुळ्या दातांनी मगरीवर हल्ला करत असताना, मगर त्याच्या नखांनी त्याचे शरीर ओरबाडत होता, ज्यामुळे गजेंद्राच्या रक्ताच्या धारा बाहेर पडत होत्या.

Send us a textरुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नावाच्या एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे. असे रत्न गणप्रमुखा ऐवजी राजाच्या किंवा संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच्या जवळ त्या मण्याची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.

Send us a textएकदा रामदास समर्थ मातापुरी (माहूर) गेले. तेथे देवीचे दर्शन घेऊन, श्रीदत्तात्रयांचे स्थान आहे, तेथे ते गेले. तोच अनुष्ठान करीत बसलेले दहापाच ब्राह्मण दिसले. त्यांस विचारले की, 'तुम्ही येथे का बसला?' तेव्हा त्यांनी उत्तर केले की, "श्रीदत्तात्रयांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करीत आहोत." ते ऐकून समर्थ बोलले की, "उत्तम आहे. तुमच्या समागमे आम्हांसही दर्शन घडेल." असे म्हणून आपणही तेथे बसले.