Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Send us a textआलिया मोहम्मद बाकर या इराकमधील बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल होत्या. 2003, इराकमध्ये आलियांनी युद्धाचे संकट लक्षात घेऊन, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रंथालयातील 30,000 हून अधिक पुस्तके लोकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. केवळ आपल्या देशाचा ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी !
Send us a textएक दिवस आदित्यच्या वडिलांना एक कल्पना सुचली.नोकरीमुळे आपल्या दोघांना अमेरिकेला जाता येत नाहीय,पण आजीला पाठवलं तर आदित्यकडे? ती हुशार आहे,तिची तब्बेत ही ठणठणीत आहे.आणि महत्वाच म्हणजे तिचा आदित्यवर फार जीव आहे.आजीचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आपण ऑक्सिजन वरच आहोत अस आजीला वाटत होतं.सुदैवाने एअर होस्टेस चांगली होती. तिनं आजीला जास्तीची फळं, बिस्किटे दिली.
Send us a textआपल्या घराच्या भूपृष्ठा खालून 300 ते 500 फूट वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे सिद्ध करणारे संशोधन पुणे येथील डॉ. अविनाश खरात यांनी केले आहे. पाण्याच्या प्रवाहाचे अजूनही खूप काही अपघाता सारखे दृश्य परिणाम आपल्यावर होत असतात. ह्या आगळ्या पण जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची मुलाखत ऐकुया.
Send us a textएकदा उन्हाळ्यात शेतकऱ्याने दहा हजाराचे कर्ज सावकाराकडून घेतले होते. परंतु शेतीचे काम सुरू असतानाच त्याच्या मुलीचे लग्न ठरले.त्यासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. सावकार दहा हजाराच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून अकरा हजार रुपये दिवाळीला घेत असे.शेतकऱ्याने खिशातून एक रुपयाचे नाणे काढले व सावकाराच्या हाती देत म्हणाला," लक्ष्मीचे दर्शन घडवण्याची ही किंमत. हा रुपया देऊन मी आज सावकार झाल्याचा आनंद घेत आहे.
Send us a textतहानेने प्राणी व्याकुळ होऊन इकडेतिकडे हिंडू लागले.काही जणांच्या लक्षात आले,आपल्या जंगलात नदीच नाही.त्यामुळे आपल्या पाणी मिळत नाही.सगळेजण मग डोंगरापलीकडच्या जंगलात गेले.तिथे एक नदी वाहत होती. " नदीबाई ,आमच्या जंगलात येतेस का? पाण्यावाचून आमचे खूप हाल होतात" प्राणी म्हणाले." कशी येऊ?" नदीने विचारले.नदीचे काम चालू असताना एक पक्षी मात्र झाडावर निवांत बसून राहिला.त्याला सर्वांनी बोलावले.मात्र तो काही गेला नाही.
Send us a textकोरड्या विहिरीतील एक भांडं पाणी भरण्यासाठी त्या दोघींची अर्ध्या तासाची धडपड उघड्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पाण्याच्या थेंबाची किंमत या माणसांना कशी आणि किती चुकवावी लागते या कल्पनेने अंगावर काटा आला. जे पाणी निघालं ते अत्यंत गढूळ होतं, पण तेच त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी होतं.
Send us a textया बायकांना विठ्ठलावर रुसून दूर राहिलेल्या रुक्मिणीच मन चांगलं ठाऊक आहे. असं एकट रहाणं लग्नाचं नातं न तोडताही नवऱ्यापासून दूर राहणं, काय सोपं असतं काय? पण तरी रुक्मिणी विठूचा गाजत्या मंदिरात त्याच्या शेजारी नाही उभी राहिली.लग्नाआधीच राधेवरच त्याचं प्रेम तिला माहित असेलही,पण लग्नानंतर इतक्या वर्षांनी तिनं पुन्हा त्या दोघांना तस पाहिलं आणि ती वंचनेच्या जाणिवेनं तडफडली.
Send us a textमी मुंबईत जन्माला आले,साहजिकच इथले फास्ट फूड, वडा पाव आणि पावभाजी माझ्या डीएनए मध्ये आले.वांगी म्हणजे माझा शत्रू क्रमांक १.तर या जळगाव करांचे वांग्यावर निस्सिम प्रेम.इतके की सासरे निगुतीने वांग्याची भाजी करत.
Send us a textएकदा मांजर रानात दिवसा हिंडायला गेले.काही खायला मिळते का पाहू लागले.त्याला एक भाकरीचा तुकडा आणि लोण्याचा गोळा एके ठिकाणी दिसल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले. थोडा सुद्धा विचार न करता हावरटपणाने तिथे एकदम झेप घेतली आणि मांजर जाळ्यात अडकले.उंदीर जाळे कुरतडू लागला; पण अशा बेताने की पहाट होईपर्यंत मांजर सुटू नये,कारण त्याला माहीत होते - पहाटेच शिकारी येणार आपली शिकार न्यायला....
Send us a text" ताई, रंग एकच आहे सगळीकडं..पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..ताई, रंगाच्या छटा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.., या सा-या गोष्टी सारख्या करा..मग रंगही समान दिसेल..!!अजून काही महिन्यांनी बघा..रंग अजूनच वेगळा दिसेल..!" रंगारी काका म्हणाले.
Send us a textत्या लहानशा जीवाला वाटायचं, "माझे आई-बाबा माझ्यासाठी काहीही करू शकतात!"पण आता… ३० वर्षांनंतर…स्टेशनवर आई मला सोडायला आली आहे. प्रवासाचं स्थान बदललंय, पण ‘वाट' तीच आहे.पूर्वी मी वाट बघायचे, आज आई वाट बघते…आणि उद्या? कदाचित मीच माझ्या मुलीची वाट बघेन…
Send us a textस्पेनमधून जाताना ती उशिरापर्यंत सायकल चालवत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इतक्यात दोन तरुण समोरून बाईकवर आले. वेदांगील पाहून ते थांबले आणि अचानक चाकू काढून तिच्यावर रोखला. त्यांना पैसे हवे होते. म्हणून त्यांनी झटापट केली. वेदांगीला थोडी दुखापतही झाली. ती घाबरली. तोवर पैसे घेऊन ते तरुण पळून गेले होते. खरी अडचण त्यापुढे होती. वेदांगीला स्थानिक भाषा येत नव्हती. स्थानिक लोकांना इंग्लिश येत नव्हते. मुश्किलीने इतरांची मदत घेतली आणि डॉक्टरांकडे गेली. तिला लुटणारे होते, तसेच मदत करणारेही होते. त्यामुळे वेदांगी खऱ्या अर्थाने जग पाहत होती. उपचार करून ती पुढे निघाली, पण असा प्रसंग पुन्हा केव्हाही येऊ शकणार होता.
Send us a textएके रात्री, माता कौशल्या जी झोपेत असताना त्यांच्या राजवाड्याच्या गच्चीवर कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला.त्या उठल्या आणि त्यांनी विचारले, "कोण आहे तिकडे?"त्यांना कळले की ती शत्रुघ्नजींची पत्नी श्रुतकीर्ती आहे.माता कौशल्येनी तिला खाली बोलावून घेतलं.श्रुतकीर्तीजी आल्या, त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्या आणि तिथे उभ्या राहिल्या.माता कौशल्याजींनी विचारले: "श्रुती! मुली, तू इतक्या रात्री गच्चीत एकटी काय करतेय? तुला झोप येत नाही का? आणि शत्रुघ्न कुठे आहे?"श्रुतकीर्तीचे डोळे अश्रूंनी भरले,ती तिच्या सासू-आईला बिलगली,तिला मिठी मारत म्हणाली:"आई, मी त्यांना पाहून तेरा वर्षे झाली आहेत".हे ऐकून कौसल्येच्या उरात धस्स झालं..!
Send us a textएकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, तिथं काही मुलं बेसबॉल खेळत असलेली त्यांनी पाहिली.हर्बर्टने वडिलांना विचारलं :"बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का?"वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखं मूल आपल्या संघात नकोच असतं. पण त्यांना हेही जाणवलं की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.वडील त्या मुलांपैकी एकाकडे गेले आणि त्याला विचारलं, "तुम्ही हर्बर्टला थोडं खेळायला द्याल का?"त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला,"आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात येऊ द्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू
Send us a textलग्नानंतर नवीन जोडपं जोतिबाला जात.तिथे जत्रा भरलेली असते.तिथे एका पाळण्यात बसून फोटो काढतात ती दोघं.छान मजेत एकत्र हसत खेळत बाजार करतात आणि शेवटी घरी येताना आईची तपकीर ची पुडी आणायचं मात्र विसरतात. सून येऊन आत्या बाईच्या (म्हणजे सासूच्या ) पाया पडते. पण सासू तोंड फिरवून जाते ,आणि म्हणते," किती वेळ तो,दिवे लागण झाली,घरी देवासमोर दिवा लाव आधी".
Send us a textसहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा शेवटच्या पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी कि कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना....रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार तिथे जाऊन?ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे....
Send us a text“साब! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर मधे बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्या सोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर,पीळदार आणि अगदी दाट मिशा आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त....होयं अवघे एकशे सात वर्षे!हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे? आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं.
Send us a textरात्री साडेअकरा-बारा वाजता दरवाज्याची कडी वाजली. बाबांनी दार उघडले. आईही उठून बसली. बाहेर एक अनोळखी माणूस... भरघोस दाढी वाढलेला... साधी विजार-साधा शर्ट... हातामधे आईची पिशवी... "मी यशवंत पवार... परळीचा आहे. आज सकाळी या ताई आणि तुमचा हा मुलगा गडावर आले होते... तेव्हा तिथून दर्शन घेऊन परत येताना ही पिशवी पेठेतल्या मारुतीच्या देवळात विसरली होती. ती घेऊन आलोय. बघून घ्या..." आईनं पिशवी बघितली. सगळं जसंच्या तस्सं होतं. "तुम्ही बरोबर आमच्या घरी कसं काय आलात ?" आईनं विचारलं. "तुमचा हळद-कुंकवाचा करंडा बघितला. त्यावर तुमचं नांव आणि शंकराचार्य मठ असा पत्ता आहे. तो बघितला आणि गडावरचा रात्रीचा प्रसाद झाल्यावर, रामरायाची आणि समर्थांची शेजारती झाल्यावर, रामराया आणि समर्थ झोपल्यावर अलगद गडावरुन आलोय बघा."आईनं त्यांना आत बोलावलं. चटकन आत जाऊन स्टोव्ह पेटवून दूध गरम करुन आणून दिलं. "पितळी पेल्यात द्या" असं त्यानं म्हटल्यावर आईनं कपातलं दूध पितळी पेल्यात घालून दिलं. घटाघटा पिल्यावर "जातो आता गडावर... वाट बघत असतील" म्हणून 'श्रीराम समर्थ' म्हणाला... आम्ही त्यांना नमस्कार केला आणि ते गेले...दुसऱ्या दिवशी आम्ही परळीला गेलो. सरपंचांना भेटलो आणि यशवंत पवारांबद्दल चौकशी केली. "परळीत यशवंत पवार या नावाचा कुणीही माणूस नाही." हे त्यांचं उत्तर. आम्ही घरी येऊन आईला हे सांगितले. झालं... आईचं सुरु झालं... "रात्री रामराया आणि समर्थ झोपल्यावर कोण यशवंत पवार येणार ? तो यशवंत पवार नव्हता तर मारुतीराया होता... नाहीतर या एवढ्याश्या फाटक्या पिशवी साठी एवढ्या रात्री गडावरुन कोण येणार ? तो नक्कीच मारुतीरायाच होता..."
Send us a textएक होता पर्वत. उघडा बोडका. खडकाळ, उजाड वाळवंटात एकटाच उभा होता. बिच्चारा! त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत, ना झाडं. पानांची सळसळ सुद्धा कधी ऐकली नाही त्याने.एक दिवस मात्र त्याच्या नीरस निसर्गचित्रावर एक लालसर पाखरू विसावलं. त्या पाखराच्या मऊ मऊ पिसांच्या शरीराचा स्पर्श पर्वताला झाला मात्र, तो त्या अनोख्या अनुभवाने थरारून गेला. पाखरू जायला निघालं. त्यावेळेला पर्वत म्हणाला "अग, तुझ्यासारखं कधी काही पाहिलंच नव्हतं आजपर्यंत. तुला जायलाच पाहिजे का ? तू इथेच का राहत नाहीस?
Send us a textताटात जेवण न मिळाल्याने नाराज झालेल्या नवरदेवाच्या कपाळावरच सावधान माझ्याशी लग्न केल्यास मुलीला हुंड्यासाठी मुलीचा हुंड्यासाठी छळ होऊ शकतो हे लिहिलेले नाही काय? असा हट्ट धरणाऱ्या नवरदेवाला तेव्हाच टाटा बाय-बाय करायला नको काय?दुसऱ्याच्या पैशाने स्वतःचे कौतुक करून घेण्याचा सोस व होंडा यात फरक नाही हे त्या मुलीला आणि तिच्या मुलीच्या आई-वडिलांना तरी स्पष्ट दिसायला हवे.
Send us a text"बंदिनी" मधली "मोरा गोरा रंग लैले" म्हणत प्रियकराला भेटायला अतुर झालेली नटखट नूतन शेवटी त्याच प्रियकराची असहाय्य अवस्था बघून समोरचा उज्वल भविष्यकाळ लाथाडून "मेरे साजन हैं उसपार" या त्याच्या शब्दांबरोबर कासावीस होत धावत सुटते. त्यावेळची तिची तगमग आपण विसरु शकतो?
Send us a textपलीकडचा वाडा प्रसिद्ध होता,तो यासाठी की तिथे एक मारुतीचे देऊळ होते.रामाची भजने तिथे लावलेली असत. खूप सुंदर आणि मोठे हवेशीर देऊळ.त्या देवळात खेळायला वेगळीच मज्जा यायची. आम्ही मुले तिथे धुडगूस घालायला लागलो की,तिथले मामा आणि पार्वती काकू खूप ओरडायचे आम्हाला.आमच्या अंगणात मोगऱ्याची खूप झाडे.त्यामुळे उन्हाळ्यात रात्री मस्त सुगंध दरवळत रहायचा.दुसऱ्या दिवशी त्याचे सुंदर गजरे करून घालायचे.
Send us a textशिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली ती निष्प्राण माकडीण. नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी. त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक, की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि तितक्याच अनामिक भावनेनं ते आईला बिलगून बसलं आहे. त्याला माहीत पण नसेल की पुढचा नंबर आपला आहे.
Send us a textसिफ्रेने गुहेत पूर्णपणे एकटे राहण्याचा स्वेच्छेने निर्णय घेतला होता. घड्याळे नाहीतसूर्यप्रकाश नाहीवेळेचा मागोवा घेण्याचा कोणताही मार्ग नाहीत्याला हे जाणून घ्यायचे होते:* मेंदू पूर्णपणे एकाकीपणाला कसा प्रतिसाद देतो* जेव्हा तुम्ही दिवस - रात्र या नैसर्गिक चक्रांपासून तुटता तेव्हा काय होतेजगाला वाटलं की तो वेडा आहे.१९७२ मध्ये, सिफ्रे टेक्सासमधील एका गुहेत ४४० फूट जमिनीखाली उतरला.त्या ठिकाणी त्याचा बाहेरील जगाशी संपर्क नव्हतात्याच्या दिवसांना मार्गदर्शन करण्यासाठी सूर्य नव्हताफक्त तो, एक स्लीपिंग बॅग आणि जगण्यासाठी साधने एवढंच काय ते त्याच्या बरोबर होतं. पूर्ण अंधार सोबतीला होता.शांतता, बधिर करणारी.सुरुवातीला, सिफ्रेने दिनचर्या राखण्याचा प्रयत्न केला. केंव्हा जेवायचे आणि केंव्हा झोपायचे या साठी तो भूक आणि थकव्याचे अनुसरण करत असे.पण प्रकाश किंवा घड्याळांशिवाय...
Send us a textएकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की, 'मला तो पारिजात माझ्या अंगणात हवा. किती छान सुवास आहे त्याला! तो पारिजातक माझ्या अंगणातचं लावा.'कृष्ण हसला, त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, "सत्यभामे, पारीजातक हा अमूल्य आहे !त्याचा सुवास जितका मनमोहक, तितकं त्याचं बहरणं कठीण! पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर, याची फुलं मालकीच्या अंगणात पङत नाहीत."पण स्त्री हट्टापुढे कृष्णाचं काही चालेना.पारिजातक तिच्या अंगणी लागला, आणि रुजलाही! पण फुलांचा बहर मात्र सगळा रुक्मिणीच्या अंगणात पडायला लागला.आता सत्यभामेला कळून चुकलं, "आपण नको तो हट्ट करून बसलो. फुलं तर गेलीचं, पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्ण पुजेला ही दुरापास्त झालो‘. आणि मग, पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलंही नाही.
Send us a text"आणि कैकयी मातेच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता ?... जर मला वनवास झाला नसता, तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृप्रेम कसं पाहू शकलं असतं ?
Send us a textएके दिवशी, तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, कुंवर साहिब यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली... आणि त्यांची शिक्षा अंमलात आणण्यासाठी त्यांना 'जन्नत बाग' येथे आणण्यात आले. राजकुमाराचा शिरच्छेद करून त्या डोक्याचा वापर करून, त्यावर पोलोचा खेळ खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. कुतुबुद्दीन स्वतः राजकुमाराच्या घोड्यावर, शुभ्रकवर, स्वार होऊन त्याच्या खेळाडूंच्या पथकासह जन्नत बागेत आला. शुभ्रकाने राजकुमाराला बंदिवासात पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुंवर सिंहाचा शिरच्छेद करण्यासाठी साखळ्या उघडताच, 'शुभ्रक' स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही.. त्याने उडी मारून कुतुबुद्दीनला स्वतः च्या पाठीवरून फेकलं आणि त्याच्या मजबूत पायांनी त्याच्या छातीवर अनेक वेळा हल्ला केला, ज्यामुळे कुतुबुद्दीनचा मृत्यू झाला!
Send us a textकारखाना कसा सुरू असतो ना,तसेच स्वयंपाक घराचे असते. एकदा सुरू झाला की थांबायचे नावच घेत नाही.लवकर उठा,मग फ्रीज मधील दूध काढा,ते तापवा,आणि सर्वासाठी आलं गवती चहा चा मस्त चहा बनवा!नंतर थोडाफार योगा उरकून ,अंघोळ करून कणिक मळून भाजीची तयारी.ते झालं की कामवाली मावशी हजर.तिच्यासमोर अक्षरश: कामे टाकावी लागतात.कारण तिचा वेग फारच असतो आपल्यापेक्षा!
Send us a textएकदा एक काव्य पं. हृदयनाथ यांच्या वाचनात आले. ते त्यांना एवढे भावले की लगेचच ते स्वरबद्ध केले. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले. पण या गडबडीत पं. हृदयनाथ हे गीतकाराची परवानगी घ्यायला मात्र विसरले. पं. हृदयनाथांच्या परिचितांनी "हे कवी खूप तापट आहेत. ते कोर्ट कचेरी करतील" म्हणत घाबरवले. त्या कवींनी नोटीस न देता या गाण्याच्या स्वरसाजाची स्तुती करुन आणखी काही गाणी पाठवली होती. एका प्रतिभावंताच्या प्रतिभेला दुसऱ्या प्रतिभावंताने दिलेली तेवढीच उत्स्फुर्त अशी ही दाद होती !
Send us a textबैलाचे पाऊल घसरले आणि तो त्या आडबाजूच्या खोल विहिरीत पडला. शेतकऱ्याने हे पहिले आणि मनात विचारांचे काहूर उठले. "बैल वाचवावा की नाही? तो बैल म्हातारा झाला होता...."बैलाने पाहिले की हे लोक त्याला जिवंत गाडत आहेत! हळूहळू बैलाचा हंबरडा मंदावत गेला आणि एका क्षणी तो गप्प झाला......!
Send us a textमाझा पहिला गुरु एक चोर होता. माझा दुसरा गुरू होता एक कुत्रा. माझा तिसरा गुरू म्हणजे एक लहान मुलगी होती. "मला हे सांग की या दिव्यात हा जो प्रकाश तेवतोय, तो कुठून आणलास?" त्या मुलीने क्षणभर विचार केला आणि मला काही कळण्याच्या आत त्या दिव्यावर फुंकर घालून तो तिने विझवला आणि म्हणाली, "आता इथे जी ज्योत होती, ती कुठे गेली? ती जिथे गेली, तिथूनच हा प्रकाश आला."
Send us a textअमिताभ महाशय घुश्शात होते. ते तडक घरी गेले आणि वडिलांसमोर उभे राहून त्यांना विचारले - तुम्ही आम्हाला जन्माला का घातलं ? आमच्यापोटी जन्माला यायचं आहे का ? असं विचारायचं तरी !"हरिवंशरायजी म्हणाले, "माझ्या असं लक्षात आलं, कि माझ्या वडिलांनीही मला काहीही न विचारता जन्माला घातलं. आमच्या आधीही बरीच वर्षे हे असंच चालू होतं.""तू हुशार आणि शहाणा आहेस. तू मुलांना जन्माला घालण्यापूर्वी त्यांना समोर उभं करून नीट खडसावून विचार आणि ते हो म्हणाले तरच त्यांना जन्म दे !"
Send us a textकोकणातील अंगणं मे महीन्यात नटलेली दिसतात. आंबे भरपूर असले की गोड आंबट मिरमि-या डिकाळया तिखटा बिटक्या काळया, शेंदरी, उग्रट सगळया प्रकारच्या आंब्यांचा रस काढतात. स्टिलच्या ताटाला तुपाचा हात लावून हा रस ताटात ओततात. एकदम जाड थर देत नाहीत. मध्यम देतात. रस चांगला वाळायला हवा. मग दुस-या दिवशी परत दुसरा थर देतात. असे पाच सहा थर देतात. रोज नवे आंबे नवा रस. त्यांचा रंग रोज बदलतो. पिवळा ते भगवा यातल्या अनेक छटा तिथे अवतरतात. याला साठं म्हणतात.
Send us a textलहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खासकरुंन दिवाळीत कारण रात्री झोपताना सामसुम दिसणार्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हां कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबार्सेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गाय आणि वासरू काढत असे ते ही रांगोळीने. मी दिवसभर त्या रांगोळीची वाट बघत बसे. आज त्याच थरथरत्या हातांना रांगोळीची दोन बोटं ओढणं किती जड जातं हे बघून गलबलून येतं.
Send us a textएवढं सगळं लक्षात ठेवणारी आजी मात्र दररोज तिचा चष्मा कुठं आहे हे साफ विसरून जायची मग शोधत बसायची. मला चष्म्याशिवाय सगळं धुरकट दिसतं, म्हातारी झाले न मी..म्हणायची असा काहीतरी यंत्र पाहिजे ज्याला काहीही विचारलं तर ते सांगेल.. मी अलेक्सा हे प्रॉडक्ट प्रथम पाहिलं तेव्हा मला आजी आठवली,आता असती तर म्हणली असती 'अग ह्या अलेक्साला विचारलं की माझा चष्मा कुठाय तर ती सांगेल?' कदाचित अलेक्सा च्या मेमरी बँकेत नसणारं गाणं आजी ने तिला शिकवलं असतं!
Send us a textभटक्या समाजात बालविवाहाचे प्रमाण जास्त व जात पंचायतीचे वर्चस्व फार. साठ वर्षाच्या पुढचा व नरबळीच्या प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या नवऱ्या बरोबर १७ वर्षांच्या सुनिताने एक रात्री साठी राहावे मग दुसऱ्या दिवशी तिचा काडीमोड करू अशा पंचायतीने निर्णय केला; अन्यथा समाजातून बहिष्कार...! सुनिताने विरोध केला तरीही या प्रकरणाचा तिच्यावर झालेला परिणाम भयंकरच होता.
Send us a text"माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का, हे देखील कुणी विचारत नाही ..!! म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन, ही सेवा देतो. त्यांच्या दुःख्खी, कष्टी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो ..!! हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात ..!! त्यांना मी जाऊन भेटतो .. पाणी देतो, चहा देतो, थोडी फार चौकशी करतो आणि दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटत असेल ..!
Send us a textअगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत . आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे , रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो “ असा होई . खरं तर वरची वाक्य मन दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई . ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.
Send us a textनेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आहेच परंतु शब्दांकितही आहे. म्हणजे साप शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमकं कसं वागावं यासंबंधीचं भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं आढळतं.उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाचं महत्व सांगणारी ओवी भेटेल. तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयाने कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र भेटतो.
Send us a textअसाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षाचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, "आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ." आजीने विचारलं," का रे, काय केलं त्या आजीनं तुला?तो: "काही नाही असंच." आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपद, "तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं."शेवटी आजी म्हणाल्या, "थांब मी त्यांना फोन करून बोलवून घेते अन विचारतेच, काय केलं आमच्या नातवाला म्हणून." मग नातू सांगू लागला, "मी त्यांच्या समोरुन दोनदा गेलो तरी आजी मला 'हॅपी बर्थडे' म्हणाली नाही. तू नाही बोलायचं."अच्छा! म्हणजे आजीनं 'हॅपी बर्थ डे' म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर.
Send us a textआज जगप्रसिद्ध असलेला मानवतेची शिकवण देणारा 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ निवृत्तीनाथांच्या आदेशानेच माऊलींनी लिहलाय. संस्कृत भाषा जनसामान्यांना समजत नव्हती तेव्हा मराठीत हा ग्रंथ लिहण्यासाठी निवृत्तीनाथांनी माऊलींना आज्ञा केली. "ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्याहातीं" अशी माऊली गुरुविषयी कृतज्ञता माऊली व्यक्त करतात.
Send us a textडॉक्टर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून शाळेतल्या माझ्या वर्गातली अनिता होती…**स्कूल क्रश...मी तिला म्हणालो…“ओळखलस का मला?”*ती म्हणाली… “नाही खरंच नाही हो!… तुम्ही कुठला विषय शिकवत होतात त्यावेळेला सर?”आणि हृदयात कळ येणं म्हणजे काय हे त्यावेळी मला चांगलच कळलं…!
Send us a textआपल्याला माहित आहे की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले. आता ते परत यायला निघालेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून निघून पृथ्वीवर परत येण्यासाठी असलेल्या यानाचं नाव आहे स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्रॅफ्ट क्रू 9.
Send us a text"आपण इतकं सुंदर आध्यात्मिक कवन लिहिलं आणि फोयिनकडे पाठवलं. तर त्याने ही कविता म्हणजे "निव्वळ पोटातला वारा सरणं आहे" असं म्हणून तिचा अवमान तरी करायला नको होता". डोंगपो क्रोधायमान होऊन फोयिनकडे याचा जाब विचारायला निघाला. "डोंगपो, जर माझा ‘पाद' हा शब्दही तुला अजूनही क्रोधीत करू शकतो, तर तुझे कमळ अजूनही वाऱ्यांनी डळमळतेच आहे!" फोयिनने लिहिले होते!
Send us a textपाट्या टाकणे म्हणजे एका ठिकाणची माती काढून पाटी भरून दुसऱ्या ठिकाणी टाकणे. हे काम आपण नक्की कशासाठी करत आहोत याची थोडीशी सुद्धा माहिती न घेता वर्षानुवर्षे तेच तेच काम नेमाने कारणे म्हणजे शासनामध्ये " पाट्या टाकणे " होय!
Send us a text“नेल्ली ब्लॉय 1864 ते 1922 ही तिच्या काळातील स्त्री शोध पत्रकारांपैकी एक होती कुख्यात मानल्या गेलेल्या मनोरुग्णालयातील स्त्रियांची स्थिती जाणून घेण्यासाठी तिने मनोरुग्णाचे सोंग घेतले. तिथे डांबलेल्या प्रक्षुद्ध रुग्णांचे ओझरते दर्शन नेल्लीला घडले आणि ती हादरून गेली. तिच्या रिपोर्तlजने समोर आलेल्या वास्तवाने समाजात खळखळ माजली”.
Send us a textकर्करोग झाल्याचं कळल्यावर, आपल्याच शरीराने फसवणूक केल्याच्या भावनेनं दुखावली गेलेली लेखिका, पुढे आयुष्यच बदलून टाकणाऱ्या अनुभवांना सामोरी गेली. कधी शरीर-मनाच्या अद्वैताचा प्रगल्भ विचार मांडणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाने आयुष्याला अद्भुत वळण लागलं तर कधी मन स्वत:च्या मर्यादांना आव्हान देत राहिलं आणि त्याचमुळे पुढच्या दहा वर्षांत तीन वेगवेगळे कर्करोग, केमोथेरपीच्या अनेक सायकल्स, तीन शस्त्रक्रिया आणि ६०-७० ‘रेडिएशन' घेऊन लेखिका आज कर्करोगमुक्त आयुष्य जगते आहे.
Send us a textसरकारी कार्यालयात काम करताना जुन्या व मोडक्या खुर्च्याच जास्त काळ वाट्याल येतात. नव्याने आलेल्या कोणी त्यावर चांगलं कव्हर घालून घेतलं तर ते खराब कसं होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आणि ,इथे सर्वजण समान आहेत हे त्याला दाखवून देऊन त्याचं विधिवत 100% सरकारीकरण केले जाते!
Send us a textभाकरीसाठी एखादी परदेशी भाषा किंवा स्वदेशी भाषा कोणी शिकावी? ह्या प्रश्नाच उत्तर खरं तर सोपं आहे! ज्याला भाकरी हवी असेल ,त्यानं शिकावी!त्याच बरोबर गृहिणींना आपल्या विद्याविभूषित, उच्च पदस्थ पतीबरोबर परदेशी गेल्यावर अधिक फायदा होत असेल तर भाषेचा. कारण बाजारहाट करणं,मोलकरणींकडून कामं करून घेणं वगैरे गोष्टींसाठी परदेशी / स्थानिक भाषेची गरज पडतेच.
Send us a text " तु विचारलस ना...माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ? खरंच ....काही नाही ग... मला वाटणी नाहीच करायची ...तर तुमची जोडणी करायची आहे.""तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. एकमेकांकडे आलं गेलं तरच ती टिकून राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा."
Send us a textअत्तराचा मंद सुगंध ( वाळा,चंदन, मोगरा) उन्हाळ्यातील तीव्र झळा कमी करायचा.ठेवणीतले शालू किंवा जरीच्या झुळझुळीत साड्या बाहेर काढल्या जायच्या.चैत्रागौरी च्या हळदी कुंकू मधील सर्वात आवडती म्हणजे कैरी डाळ, म्हणजे डाळीची कैरी घालून केलेली आंबट गोड कोशिंबीर.