Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send us a textआपल्या हाताला धरून चालायला शिकलेली आपली मुलं जेव्हा मोठी होतात... शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आचार-विचार-अनुभवांची कक्षा रुंदावत जाते. त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीचा सामना करण्यातून ती परिपक्व होत जातात... आणि मग अशी वेळ येते जेव्हा त्यांच्या हाताला धरून आपली वाटचाल सुरू होते...

Send us a textरमेशजींचं वय आता ६५ वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरकोळ कारणांवर नाराज होणं, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता.घरच्यांना खूप त्रास व्हायचा. पत्नी विचारायची, “काय झालंय रमेशजींना? आधी इतके आनंदी असायचे, आता जरा जरी काही झालं तरी संतापतात.” मुलंही आता त्यांच्याशी बोलायला घाबरू लागली होती. रमेशजींनाही जाणवू लागलं होतं की ते स्वतः बदलले आहेत. त्यांनाही स्वतःवर राग यायचा — “मी असं का वागतोय? हा चिडचिडेपणा माझ्यात आला कुठून?”

Send us a text'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. तरीपण त्याला याची जाणीवच झाली नाही, हे तिथं उपस्थित असलेल्या होरॅस वेल्स या डेंटिस्टनं पाहिलं. दात काढताना त्याचे पेशंट मोठ्यामोठ्याने ओरडल्याने बाहेर बसलेले पेशंट देखील घाबरून पळून जात असत म्हणून तो त्रस्त होता. मग त्याने विचार केला, उद्या आपण याचा प्रयोग करून बघू.. आणि हा प्रयोग त्याने स्वतःवरच लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचा दात काढून घेऊन केला. त्याला अजिबात दुखले नाही. तो यशस्वी झाला.

Send us a textमानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले... कानाने अजिबात ऐकू येत नसल्याने कंपनांची जाणीव हेच तिचं इंद्रिय झालं होतं कंपनांच्या जाणिवेतून सुरू झालेला तिचा प्रवास आज तिला अभियंता म्हणून स्वतःच्या पायावर उभा करता झाला. यामागे आहे, तिच्या आईची अतूट इच्छाशक्ती... !

Send us a text"आयुष्याचा वेग आपणच कमी करावा लागतो, काम कधीच संपत नसतात, आपणच ठरवून थांबायचं असत..काही बिघडत नाही चार गोष्टी झाल्या नाहीत तर ."

Send us a text"तू नाही रे महिषासुर, तू माझ्यातला महिषासुर मारला आहेस, गैरसमजा चा, रागाचा.."

Send us a textप्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक चांगली व्यक्ती बनवायचे असते, जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस म्हणून घडू शकेल. जर आपण चांगल्या पालकत्वाबद्दल विचार केला, तर यामध्ये मुलाला चांगले संस्कार देणे, त्याच्या पोषणाची काळजी घेणे, मुलाच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण जपानी पालकांकडून काही टिप्स घेऊ शकतो. उत्तम पालक बनणं हे खूप कठीण काम आहे. यात बरेच चढ-उतार येतात. जपानी मुले, कोणत्याही वयाची असो, त्यांची जगण्याची स्वतःची एक विशिष्ट पद्धत असते जी त्यांना जगावेगळे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध करते. खरं तर, जपानी मुल सार्वजनिक ठिकाणी रडताना दिसणं जवळजवळ दुर्मिळ आहे! कारण जपानी पालक मुलांच्या संगोपनासाठी खूप वेळ देतात. आपल्या मुलाला एक चांगला नागरीक बनवण्यासाठी त्यावर संस्कार करतात. म्हणून जपानी पालकत्वाची पद्धत जगभर प्रसिद्ध आहे. आज आपण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यासाठी काही जपानी टिप्स पहाणार आहोत.

Send us a textएकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण ‘आलं सरकारांच्या मना तिथं देवाचंबी चालंना‘ अशातली गत होती.मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील…छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं…., विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं.

Send us a textलहानपणी शाळेचा पीळ फार घट्ट असायचा.किंग जॉर्जमध्ये असताना आम्हाला वाटायचं — "आम्ही सॉलिड स्मार्ट आहोत, धीट आहोत." बालमोहनच्यांना आम्ही ‘गणू', बावळट म्हणायचो. एखाद्याचं अक्षर पाहून मी सांगू शकतो की तो किंग जॉर्जचा की बालमोहनचा! कारण बालमोहनच्यांचं अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे! ते हुशार असायचे, पण आमच्या मते अतिसुसंस्कृत — शिवीला अपशब्द म्हणायचे इतके सौम्य!आणि त्यांचं आमच्याबद्दलचं मत? "अतिशहाणे, हुशार, पण वात्रट!"आणि आजही कुणी विचारलं की — “किंग जॉर्ज की बालमोहन?” तर हसू येतं आणि आठवणींचं दार उघडतं!

Send us a text"काका मला डॉक्टर किंवा संगीतकार व्हायचा नाही. मला अगदी साध्या मुलाप्रमाणे जगायचं स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि हे मी माझ्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितलेय म्हणून तर मला या साध्या बसने प्रवास करता येतो."" तुम्ही माझ्या घरी याल तर तुम्ही पहाल की दोन परदेशी गाड्या ड्रायव्हर सकट सतत दाराशी उभ्या असतात. मी म्हणायचं अवकाश ते मला अकॅडमी पर्यंत सोडतील आणि संध्याकाळी परत घेण्यासाठी तिथेच थांबून देखील राहतील."वाटलं, संचित आणि त्याचे आई-बाबा खऱ्या अर्थाने एकमेकांचे संचित आहेत!

Send us a text"महागाई वाढली आहे हे तर नक्की. परंतु पैशाला किंमत उरली नाही असं जे आपण सहज म्हणून जातो ते खरं आहे का?""माझ्या आयुष्यात एक प्रसंग काही वर्षांपूर्वी घडला आणि एक दोन आठवड्यातला. पण दोन्ही लक्षात राहिले. कारण पैशाला किंमत आहे हे पटवून देणारा एक, आणि दुसरा पैशापेक्षा माणुसकी किंवा सहृदयतायांचं दर्शन घडवणारा!

Send us a textलोनपोगारनं सकाळीच आपल्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला, “बाळा, ह्या शंभर मेंढ्या घेऊन शहरात जा, पण हे लक्षात ठेव — ना त्यांना मारायचं, ना विकायचं! आणि तरीही शंभर पोती जव घेऊनच परत यायचं.तो शहरात एका रस्त्याच्या कडेला पाणावलेल्या डोळ्यांनी बसला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी आली, म्हणाली — “काय झालं रे? एवढं चिंतातुर का?” त्याची हकीकत ऐकल्यावर ती हसली आणि म्हणाली — “अरे एवढंच? मेंढ्यांची लोकर काढून विक आणि त्या पैशात शंभर पोती जव घेऊन घरी जा!”. मुलगा खुश झाला !

Send us a textगर्दीत वाट काढत एस टी च्या आत घुसणार तोच मला बघून कंडक्टर एकदम ओरडला." ओ, या बाईला आधी चढू द्या. ते दिवसा या बाईन् दिलेला शाप लागला मला.दोन दिवस जेवनाचे वांदे झालेले."मी उभी थरारले.मी दिलेला शाप ? नाही रे बाबा , माझ्यासारखी सामान्य लेकुरवाळी गृहिणी कसला शाप देणार ?गाडीत चढल्यावर आतून जाणवलं की हा शाप बाईने कुठे दिला होता ? हा तळतळाट 'आईचा' होता.कोणीही आतून अगदी आतून...आत्म्यातून दुखावलं गेलं तर उमटणा-या तळतळाटाची आग भाजून काढतेच काढते.तळतळाट घेऊच नये कोणाचा !

Send us a textएक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्य गेले. डॉक्टरांच्या टीमने आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला .ऑपरेशन साठी फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे त्या कॉलमच्या पुढे त्यांनी E.D. अस लिहलं. आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ...."ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील!"........

Send us a text“काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”* “ होय आहे !."“कधी घेतलात?”* “झाली की १५-२० वर्षे.”“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”* “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”“आता कुठे असतो.”* “माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.”“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”* “अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.”

Send us a textत्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती.."पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच?'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून..त्यातील काही लोक बोलू लागलं..'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आमच्याजवळ आले.'सायेब.. कुणीकडं?'कोल्हापूरला जातोय..'मग या माकडीणीला जनावरांचे सिव्हीलला नेऊन पोचवा.. बाकी सारे आमची कोल्हापूरची मानसं करत्यात.

Send us a textडेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल' आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल' या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!'' पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन'. तिथपासून आजपर्यंत डोपामाईन, ग्लुटामिक ॲसिड, सिरोटोनीन अशी १००-१२५ जीवरसायने आणि त्यांचे परस्पर संबंध यावर संशोधन होऊन स्किझोफ्रेनिया, नैराश्य, अतिचिंता, मंत्रचाळेपणा अशा मानसिक आजारांबरोबरीने कंपवात, स्मृतिभ्रंश अशा न्यूरोलॉजिकल आजारांवरची प्रभावी औषधं बनली आणि बनत आहेत.

Send us a textलाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl' (झॉकलेटल) म्हणजे ‘कडू पाणी'! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवीचवीने पीत. नंतरच्या ऍझटेक संस्कृतीनेही मायन लोकांकडून ते कडू देवपेय हट्टाने घेतलं. स्पॅनिशांनी ते युरोपात नेलं.

Send us a textदुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला.सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता.तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले.मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे सुरु झाले, "ए चोरा! काय करतोस रे?".......

Send us a textखूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का लाजायचे ?अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खाताना सुद्धा..." आसपासचे लोक काय म्हणतील ?"यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.....

Send us a textपरवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य आहे सांगत होते, तर काहीजण मान्य नसल्याचे वाईट चेहरे. शेवटी तिघा-चौघांनी एकमेकांशी बोलून प्रोजेक्टचा मजकूर नक्की केला. या चर्चेत फक्त इमोजी टाकणाऱ्यांचं मत शेवटपर्यंत समजलं नाही ते नाहीच.

Send us a textगोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला targeted drug delivery म्हणतात.

Send us a textजाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात', असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.

Send us a textएक महिला दुकानात आली आणि म्हणाली, "सेठ, तुमचे दहा रुपये घ्या... !""तुम्ही "७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात, मला हे दहा रुपये देण्यासाठी?" त्या महिलेने सहज उत्तर दिले, "हो, मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले.माझा नवरा आता या जगात नाही, पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, "दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते."

Send us a textलग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ..."तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"तो बावचळला ...गोंधळला ...आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!

Send us a text"तुम्ही इथे आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी नवऱ्याला जागं करते. हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं. बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल." हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता." शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्यावर अन्य लेखकाच्या कथेत शेतकऱ्याने आक्रोश केला असता, पण हा म्हणतोय, 'मरण्यातनांतून तरी सुटका झाली'! भारतीय शेतकऱ्याचं जिवंत चित्र प्रेमचंद यांनी 'पुस की रात' मधे रेखाटले आहे.

Send us a textटपरीपुढच्या बाकड्यावर डिगा नाना पेपर वाचत बसले होते. पप्याचं अगोचर बोलणं ऐकलं म्हणून न राहवून ते महाद्याला म्हणाले "आत्ता पस्तोर बापाला दहा लाख रुपायला झुपीवलंय ह्यनं. गावातल्या समद्या टपऱ्यावर अन् हाटेलात उधारी हाय ह्यजी. बापाची गाडी घेवून फिरण्याबिगिर ह्यला कायबी येत न्हाय. मोप शिकून इंजिनिअर झालाय म्हणत्यात, पण आजून रुपायाची मिळकत न्हाय. नुसतं बापाच्या जीवावर जगतंय. आरं त्येला इंग्रजी येत असून त्येनं काय दिवा लावलाय अख्या गावाला ठाव हाय की. महाद्या तू जर शिकला असता तर आता जी काम करतूय ह्यातलं एकबी काम त केलं नसतंस, कारण शिक्षण विद्या देतंय, तशीच लाजबी देतंय बाबा.”

Send us a textपावसाचंही तसंच झालंय. आताशा वेळ नसतो त्याच्याकडे. वर्षाची सरासरी एका दिवसात गाठतो. कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो. अचानक येतो मग. सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा, पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन. विचारलं तर म्हणतो "आता मन रमत नाही गं आई". पावसाचंही तसंच झालंय. त्याचं आता मन रमत नाही. आता तो बसरतो फक्त 'बॅकलॉग' भरण्यासाठी. त्याच्याकडे वेळ उरला नाही. तो कुणाची विचारपूस करत नाही की कुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही.दोस्तहो पाऊस बदललेला नाही आणि चुकलेलाही नाही तो तर आपल्यासारखंच वागतोय. मग त्याला दोष देऊन कसं चालेल? तरीही एका गोष्टीने व्याकूळ व्हायला होतं. अपराध, चुका करतात वेगळेच लोक. आणि त्याचे 'वेदनासूक्त' गावे लागते भुकेजलेल्या श्रमलेल्या अर्धपोटी निरपराधांना. हा कसला न्याय म्हणायचा ?

Send us a textपरवा देव भेटला होता.माणसं बनवतांना काय त्रास होतो ते सांगत होता.म्हणाला, फार कष्टाचे काम, जरा उसंत नाही, नाही आराम.म्हणजे आकार साधारण सारखे असले तरी चालतात;पण डिझाईन्स वेगवेगळी बनवावी लागतात.म्हणून साचा बनवून भागत नाही,कारण सरळ नाकावर प्रत्येक वेळी टपोरे डोळे शोभतीलच असं नाही.आणि गोल चेहऱ्याला एक सारखी जिवणी लावून चालत नाही, म्हणूनच त्रास होतो.

Send us a textफ्रिज बिघडला.टीवी बंद.वाय-फाय डाऊन.शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं."आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.सहा वेळा प्लग काढून लावला.टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.नेट कनेक्शन गायब.सगळीकडे जणू "No Signal".तो चिडून म्हणाला,"हे घर आहे की सर्वसंकट केंद्र? दर आठवड्याला आपलं काहीतरी बिघडतंय."

Send us a textडॅा. राजेंद्रप्रसाद भाषणासाठी उठले. पण ते जेव्हा माईककडे न जाता, व्यासपीठाच्या पाय-या उतरू लागले तेव्हा मात्र सारेच बुचकळ्यात पडले. राष्ट्रपती खाली उतरले. चालत चालत पहिल्या रांगेतल्या त्या विशिष्ट खुर्चीपर्यंत गेले आणि तिथे बसलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्यांनी!'ती व्यक्ती कोण आहे,' हे तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला माहित असल्यानं, तमाम पुणेकर जनतेने राष्ट्रपतींच्या या कृतीला पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा गजर करून मनमुराद दाद दिली. कारण, *ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नव्हतं तर साक्षात अण्णा होते. अण्णा म्हणजेच ' महर्षी धोंडो केशव कर्वे'!

Send us a textखेडेगावात डॉक्टरी करणाऱ्या अश्विनीताई गावातील स्त्रियांमध्ये फार प्रिय आहेत. भिवंडीहून आवर्जून त्यांच्याकडे येणारी विठाबाई गावातील मुलीला सांगते, "तुला काही आजार झाला नं, तर नेरळला जा. तिथं माझी आई राहते". पोटाची खळगी भरण्यासाठी देहाची विटंबना करून घ्यावी लागलेल्या लांबून येणाऱ्या विठाबाईची कहाणी मनाला चटका लावणारी आहे.

Send us a textदेवीचे नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा . आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची. किती सुखाचे दिवस होते ते . सहज मिळणारा हा निर्मळ आनंद होता.आज वाड्यातल्या काकू ,ताई आठवल्या...न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती कौतुकानी करणारी आई आठवली...पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून घेणारी आजी आठवली... आमच्या पायाला टोचू नये म्हणून खडे सुद्धा ती उचलून टाकायची...!

Send us a textआम्ही पुढे विविध ठिकाणी ५० मशीन्स लावल्या असतील. या दरम्यान मशीनची काच फोडणे. ड्रिंक्सच्या बटनांवर काळे फासणे, मशीनवर आपली नवे लिहिणे/कोरणे , "भलत्याच" जाहिरातींची पोस्टर्स चिकटवणे, मशीनच्या चावीच्या होलमध्ये एम - सील भरणे असे अनेक भयानक प्रकार लोकांनी मशीन्सबरोबर केले. शेवटी आम्ही प्रत्येक मशीनसाठी एक ऑपरेटर ठेवायचा निर्णय घेतला. तो ग्राहकांकडून पैसे घेऊन मग त्यांना हवे ते ड्रिंक द्यायचा.

Send us a textपरवा मला एका बर्थडे पार्टीत जाण्याचा योग आला. बच्चेकंपनी एकदम आनंदात दिसत होती. एन्टरटेनर कम इव्हेंट अॅार्गनायझर मुलांचे खेळ वगैरे घेत त्यांना बिझी आणि आनंदात ठेवत होता. त्याच्या एका खेळात त्याने मुलांना त्यांचा आवडता पदार्थ विचारला. त्यावर सर्व मुलांनी सांगितलेले पदार्थ होते: पिझ्झा, बर्गर, नुडल्स, सॅंडविच, चीझी पास्ता, मन्चुरियन... आणि असेच आपल्याकडचे नसलेले इतर पदार्थ. एकाही मुलाने / मुलीने थालिपीठ, घावन, आंबोळी, पोहे, शिरा, उपमा, सांजा अशी नावं घेतली नाहीत. आपल्या पारंपारिक पदार्थांवर बाहेरच्या पदार्थांचं जबरदस्त आक्रमण झालेलं सहजच समजत होतं.

Send us a textजेव्हा करप्रणाली मध्ये केलेल्या बदलाला सरकार तर्फे "टॅक्स रिलीफ" किंवा "टॅक्स गिफ्ट" असे म्हटले जाते तेव्हा ते एक फ्रेमिंगच असते. किंवा जेव्हा एखाद्या गुन्ह्याला धर्माच्या रंगाने ओळखले जाते तेही एक फ्रेमिंग असते. जेव्हा एखादा नेता आपल्या कामाऐवजी आपल्या घराण्याची, धर्माची, हलाखीच्या दिवसांची कहाणी सांगत असतो तेव्हा तो फ्रेमिंगच करत असतो. जेव्हा एखादी कंपनी आमची उत्पादने तुम्हाला तंदुरुस्त करतील असे म्हणण्याऐवजी इतरांची उत्पादने तुमच्या आरोग्यास हानीकारक आहेत असे म्हणते तेव्हा ते देखील फ्रेमिंगचं असते.

Send us a textत्या दिवशी रात्री मी स्वयंपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा उलटून भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच..एका हातात पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चिमट्याने गॅसवर धरला, लगेच तो फुगून आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला "झाला पण फुलका?" "इतका सोप्पा??"मी म्हणाले, "हो, कठीण नसतोच मुळी फुलका". खर तर, सगळा स्वयंपाकच मुळी सोप्पा असतो.

Send us a textमाझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, "आई, मधू मावशीचा फोन आलाय."मी कणीक मळत होते..लेकीला म्हणाले टाक स्पिकर वर...कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली.."आज स्वयंपाक काय केलास ??"मी म्हणाले..."भरीत.!"मैत्रिण म्हणाली, "मी पण आज भरीत आणि श्रुती कडे पण आज भरीत." या वर आम्ही दणदणीत हसलो ..

Send us a textबुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेनिमित्ताने अनुभवलेलं जंगल म्हणजे मनावरचं न पुसलं जाणारं शब्दचित्र.... अंधारलेल्या जंगलात निःशब्द रात्री शांततेवर जराही ओरखडा उमटू न देता जेव्हा लांबून चार पायांची आकृती दिसू लागते... नि हळूहळू अस्पष्ट पायरव ऐकू येतो...

Send us a textमायकेल अँजेलोच्या कलाकृती पाहून लोक म्हणायचे – “दैवी प्रतिभा आहे ”David पाहून लोकांना वाटे, “ही ताकद आमची ताकद आहे.” Pietà पाहून लोक म्हणाले – “हे दु:ख आमचं दु:ख आहे.” सिस्टीन चॅपल पाहून लोक म्हणतात – “ असा स्वर्ग हे आमचं स्वप्न आहे.” त्याने देवाला दगडातून मुक्त केलं आणि माणसाला देवाजवळ नेलं.तो जितका महान कलाकार होता, तितकाच तो विनम्र होता. तो म्हणायचा, “मी शिल्प घडवत नाही,”. “शिल्प आधीच दगडात आहे. मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो.”

Send us a textमी आधीच्या रविवारी विकत घेतलेला कोंबडा त्या मुलाला आठवडी बाजारात जावून परत केला. तो पैसे परत करू लागला. "भेटीचे पैसे नसतात " असे सांगून मी मना केले.लांब गेल्यावर वळून पाहिले तर तो मुलगा त्या कोंबड्याचे मुके घेत होता आणि त्याची ताई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती!

Send us a textमाणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्यान पिढ्या सन्मानाने जगतात. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव पेला किंवा सर्वनाम 'भांडं' असं मिळालं. "माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची हार्टफेलने डेथ झाली."हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

Send us a textआपणं कितीही मोठं झालो तरी आईला आपण लहानच वाटत असतो. त्याचा एक हृद्य प्रसंग या पुस्तकात आहे. एकदा रात्री कामतांनी पोट साफ करण्याचं औषध घेतलेलं होतं. केव्हा तरी त्यांची झोप चाळवली. म्हणून ते टॅायलेटला जायला उठतले. त्या चाहुलीने त्यांची आईही जागी झाली व 'का उठलास?' म्हणून तिने चौकशी केली. 'काही कारण नाही, जाग आली म्हणून जाऊन येतो', असं सांगून ते टॅायलेटमध्ये गेले. काही वेळाने त्यांनी बाहेरून विचारलं, "का रे ठीक आहेस ना?" असं एक दोन वेळा विचारल्यावर बाहेरून "शू..शू..शू.." असा आवाज यायला लागला. त्यांनी आतूनच विचारतात, "अगं, आवाज का करतेस?" तर त्या म्हणाल्या, "काही नाही. तुला व्यवस्थित व्हावी म्हणून. लहानपणी नाही का, असंच करत होते?"कामत लिहितात, "काहीही म्हणा, आई आईच असते."

Send us a textराजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत होता. वामन अवतारातील श्रीहरी, राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर वामनाने बळीच्या यज्ञमंडपात जाऊन त्याला आपल्या वाक्चातुर्याने चकित केले अणि त्याच्याकडे तीन पावले जमीन मागितली. आणि म्हटले "हे माझ्यासाठी तीन लोकांसारखे आहे आणि हे राजा, तू ते दान केले पाहिजे". राजा बलीने ही एक क्षुल्लक विनंती समजून ती मानली आणि वामनाला तीन पावले जमीन देण्याचे वचन दिले.

Send us a textब्रिटिशकालीन भारतात दिल्ली शहरात विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली: जो कोणी मेलेला साप सरकारजमा करेल, त्याला बक्षीस दिले जाईल. अनेक लोक साप मारून बक्षिसे मिळवू लागले . पण लवकरच अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, मेलेल्या सापांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.बक्षिसाच्या लालसेपोटी काही हुशार लोकांनी पैसे कमावण्यासाठी चक्क नागांची पैदास करायला सुरुवात केली होती. इतिहासातील ही प्रसिद्ध घटना "कोब्रा इफेक्ट" म्हणून ओळखली जाते.

Send us a textगोष्टी सांगणे हा प्रकार आज जरी जुन्याकाळचा वाटत असला, तरी गोष्टींची शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही. फक्त काळाप्रमाणे गोष्ट सांगण्याचे प्रकार व माध्यमे बदलली आहेत. केवळ वाचन किंवा श्रवण हेच एक माध्यम राहिलं नाही, तर चलचित्राच्या माध्यमाने पण गोष्टी अधिक आकर्षक रितीने सांगता येतात. विज्ञापन जगात तर याला असामान्य महत्त्व आहे. कमी वेळात प्रभावीपणे गोष्ट सांगण्यास जाहिरातदार आपले कसब पणाला लावतात, जेणेकरून उपभोक्त्यांचं मन स्व:च्या उत्पादनाकडे वळविता येईल. नाटक व सिनेमा या माध्यमाने कलाकार कथेला आपल्या अभिनयाच्या जोडीने अधिक प्रभावीरीत्या मांडतो.

Send us a text" कोरवणजी, ह्या मासिकामुळे आपलाही चाहत्यांचा वर्ग निर्माण झाला असेल हे मला माहिती नव्हते. एकदा सायकलच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याने मेज़ नाव "वाहतूक गुन्हेगार" या यादीत नोंदले गेले. पण मीच तो "कोरवणजीचा व्यंगचित्रकार लक्ष्मण" आह एहे समजल्यावर मी मुक्त झालो..एवढेच नव्हे तर माझा दण्ड ही माफ झाला!........

Send us a textआर. के. लक्ष्मण. त्यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. 'कॉमन मॅन' हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रा मुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातील हा एक खुमासदार भाग.

Send us a textपरम पूज्य टेंबे स्वामींनी अंतिमसमयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असं सांगितलं. सेवेकऱ्याने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला. प. पू. टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणे धारण करु शकत नाही. शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदामाईतील मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर प. पू. टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास ऊभे राहीले. त्यांच्या पायाचे उमटलेले हे ठसे आहेत. सेवेकऱ्याने ह्या पादूका स्वत:च्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करतांना पादुकांना समाधीसमोर स्थान दिले आहे.

Send us a textबहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचायच्या. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "हे तर बावनकशी सोनं आहे ! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे !" आणि मग अत्र्यांनी त्या कविता.. मोहोरा प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.

Send us a textआज काकाना नेमकं काय झालंय याच काकूना कोड पडतं आणि या विचारात त्या बेडवर विसावतात नेमक्या त्याच वेळी काका त्यांच्या पुढे हसत उभे रहातात आणि एखाद्या सराईत जादुगारा सारखं आपल्या खिशातून आयफोन काढतात आणि काकूंच्या हातावर ठेवतात. आता मात्र काकूंच डोकं सटकतं..."अहो चाललंय काय तुमचं?...अगदी कुबेराचा खजिना सापडल्या सारखं असे कसे काय पैसे उधळायला लागलात?...आणि काही मागचा पुढचा विचार आहे की नाही तुम्हाला?"