Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Send us a textदुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा तेलाचा दाम दसपटीने वसूल करत होता. एका फाटक्या परकर पोलक्यांतल्या पोरीने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या.""अग, दिवाळीला अवकाश आहे ! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते."दिवाळी कसली? खायला त्याल द्या...""ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या""पण आमच्याकडे धाच पैशेच हाइत."'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे.
Send us a text१९९० च्या दशकात – जग बदलत होतं. संगणक वेगाने पसरत होते, इंटरनेट जन्म घेत होतं, डिजिटल क्रांतीचा नवा वेग जाणवत होता.पण सुपरमार्केटमध्ये प्रत्येक वस्तूवर असलेला काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा, स्कॅनर मशीनला वाचता येणारा संकेत बदलत नव्हता . बारकोडच्या काही त्रुटी आहेत. जशा की मध्ये कमी माहिती साठते, आणि तो ठराविक कोनातच स्कॅन होतो. थोडं जरी खरडलं गेले तरी बारकोड वाचता येत नाही मासाहिरोने QR Code : Quick Response Code शोधून काढून ओपन-सोर्स केला !
Send us a text...माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . पुनः झाड वाढले पण फुलेच ना. आता काय करावे? त्याला सॉरी म्हणू का?
Send us a textसई हलदुले या स्वित्झर्लंड मधल्या विद्यमान खासदाराच्या पत्नी. त्या म्हणतात आल्प्स मध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा सततचा खळखळाट हे तेथील जनतेच्या चिंतेचे गंभीर कारण बनत होते. हवामान बदलामुळे निसर्गाचे स्पष्टपणे बदलणाऱ्या रूपाने जुन्या पिढीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणला. ग्रीन पार्टी राष्ट्रीय राजकारणात दाखल झाली आणि बहुमताने जिंकून आली. लेखिकेचा पती विन्सेंट बोवा एकदम एक्झिक्युटिव्ह पॉवरच्या खुर्ची पर्यंत जाऊन पोहोचला. तेथील विद्यमान राष्ट्राध्यक्ष सार्वजनिक ट्रामने उभ्याने प्रवास करतो व राजकीय भरारी घेतलेला व्हिन्सेंट शुभ्र दिव्याच्या सायकल वरून ऑफिसमध्ये ये जा करतो!
Send us a textआमच्या लहानपणी ट्रॅव्हल बॅग ही सुद्धा मोठी चैनीची वस्तू होती. आमच्या चाळीत त्या मानाने काही संपन्न कुटुंबे होती. मग आई त्यांच्याकडून बॅग मागून आणायला आम्हाला पाठवायची . “जरा दोन दिवस गावी जायचं होतं. तुमची बॅग मागितली आहे आईने.” काकू लगेच बॅग द्यायच्या. अखंड प्रवासात आम्ही स्वतःपेक्षा ती बॅग जपायचे . सारखं एकच वाक्य असायचं. “ए बॅग आपली नाहीये हा! द्यायची आहे परत. सांभाळून वापरा.” खूप प्रवास अनेक वाहनांतून केला आणि ह्या प्रवासादरम्यान, वाहन म्हणजे निव्वळ माध्यम आहे हे कळलं.
Send us a textएक काळ असा होता जेव्हा आमच्या वर्गाच्या मध्यभागी एक चीनची भिंत उभी होती. एका बाजूला मुलं दुसरीकडे मुली. इकडून तिकडे बोलणं हे भयंकर लाजिरवाण. पण म्हणून नजर वळायची थोडीच राहते?.. पुरुष म्हणून आपल्या वाढीमधला एक सुरेख टप्पा मैत्रिणीच्या नात्याचा असतो, पण तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागत. या नात्याची मजा आस्वादायची असेल तर त्याला ‘मानलेली बहीण' वगैरे बनवू नये! मैत्रिणीचा नातं म्हणजे एक कॅल्डिओस्कोप असतो. प्रत्येक हेलकाव्या बरोबर बदलत जाणारा आणि स्वतःचा तोल आणि आकृतीबंध साधणारा. या नात्याला नेहमीच्या मोजपट्ट्या लावू नयेत!
Send us a textलग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे. नांव घातलेली वनांव न घातलेली भांडीवेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची. व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देवाण,घेवाणीसाठी वापरली जात असत. तर अशी ही नांव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.
Send us a textसातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही, त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी.
Send us a text"मिले सूर मेरा तुम्हारा ssssss" हे गाणे माहीत नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.झालं असं की, त्या वेळचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून "मेरा भारत महान" ही संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.
Send us a textपहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ॲापरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला अभिमान वाटेल अशा एका भारतीय महिला गुप्तहेराची कहाणी ऐकुया. ही कहाणी ऐकून राष्ट्राप्रती धैर्य आणि समर्पणाची नवीन व्याख्या तुम्हाला कळेल. या भारतीय गुप्तहेराची कहाणी 1971 च्या युद्धाशी जोडलेली आहे. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमधील एका विद्यार्थिनीला अचानक घरी बोलावले जाते आणि 1969 मध्ये ही कहाणी सुरू होते.
Send us a textमनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला, सुलभाला, बाहेर बसायला सांगितले.त्यांनी अंकुशला बोलते केले..."खूप त्रासात आहे हो मी...काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरीचा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज...कशातच मन लागत नाही...अहो, लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही....मी खूपच निराश आहे..." वगैरे म्हणत संपूर्ण जीवनाचे पुस्तकच उलगडून सांगितले.
Send us a textकाही महिन्यांपूर्वी रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये 'ओ' पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. 'ओ' गटाचे रक्त चढवण्यासाठी 'मॅच' करण्यात आले पण ते मॅच झालेच नाही. नेमका काय प्रकार झाला हे कळेना. मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने एक टेस्ट केली गेली. या टेस्टनंतर कळलं की हा 'बॉम्बे ब्लड ग्रुप' आहे. आता मात्र सगळे हादरले. कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे.
Send us a textमाझी आजी कृष्तक्का कधी शाळेत गेली नाही, तिला लिहिता-वाचता येत नसे. दर बुधवारी ते साप्ताहिक आलं, की मी ही कथा तिला वाचून दाखवत असे. त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे. ती अक्षरश: जिवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे. ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्दन्शब्द मुखोद्गत झालेला असे. माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती, त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या आजीबाईशी तिला खूप जवळीक वाटायची. त्यामुळेच गोष्टीत पुढं काय घडतंय याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिलाच जास्त असे. म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची. एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेड लागू शकतं, हे मला आत्ता समजतं; पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची.
Send us a text सैनिकी शिस्तीचा अतिरेक, आणि ‘नियम हे नियम' या वृत्तीची मिश्कील खिल्लीही ह्या कथेत आहे.
Send us a textजैन धर्मियांच्या संथारा व्रत अथवा सल्लेखना वर बंदी घालण्याच्या जयपूर उच्च न्यायालयाच्या २०१५च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याच संथारा किंवा सल्लेखना याची माहिती आणि महती सांगणारा हा लेख लिहिला आहे डॅा कल्याण गंगवाल यांनी. ते म्हणतात, वस्तुतः संथारा ही आत्महत्या नसून तो देहत्याग आहे. तो मृत्युमोहोत्सव आहे. हे व्रत म्हणजे परमसाधना आहे वैराग्य आहे व तृप्त जीवन जगण्याचे समाधान आहे व शेवटी आपला मृत्यू कसा असावा याबद्दलचे चिंतन आहे.
Send us a textतो एक काल्पनिक खेळ होता.सर म्हणाले, "तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा.""आता चार, दहा, पंधरा... जणांची नावे तुमच्या आयुष्यातून कायमची डिलीट करा कायमची !"हळू हळू फळ्यावर फक्त चार नवे उरली. तिचे आई वडील, तिचा जिवलग मित्र आणि तिचा पती.तिच्या आयुष्यात तिने कोणा एकाला प्राधान्य दिले? ते ऐकुया.....
Send us a textआमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू ते मोठ होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..एकदा मैत्रीण आली. म्हणाली, "आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या . दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला. गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. "
Send us a textपहलगाम हे भगवान शिवाशी देखील संबंधित आहे. हिंदू परंपरेनुसार त्याचे जुने नाव बैल गाव होतेहिंदू मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी अमरनाथ गुहेत प्रवेश करण्यापूर्वी येथे आपला बैल (नंदी) सोडला होता, ज्यामुळे हे गाव पूर्वी बैल गाव म्हणून ओळखले जात असे. या बद्दल ची एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा आई पार्वतीला भगवान शिवाच्या अमरत्वाचे कारण जाणून घ्यायचे होते. यानंतर भगवान शिव यांनी माता पार्वतीला सांगितले की यासाठी तिला योग्य अशा गुप्त ठिकाणी जाऊन अमर कथा ऐकावी लागेल.
Send us a text‘‘पिंगे, तू अगत्याने तुझा ' नाच रे मोरा' विषयी अनुभव कळवलास त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु.ल.देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत." हे वाचले आणि माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं ते पु.लं.नी दोन वाक्यांत सांगितलं. "जीव लावून काम करा, बस्स!"
Send us a textआलिया मोहम्मद बाकर या इराकमधील बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल होत्या. 2003, इराकमध्ये आलियांनी युद्धाचे संकट लक्षात घेऊन, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रंथालयातील 30,000 हून अधिक पुस्तके लोकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. केवळ आपल्या देशाचा ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी !
Send us a textएक दिवस आदित्यच्या वडिलांना एक कल्पना सुचली.नोकरीमुळे आपल्या दोघांना अमेरिकेला जाता येत नाहीय,पण आजीला पाठवलं तर आदित्यकडे? ती हुशार आहे,तिची तब्बेत ही ठणठणीत आहे.आणि महत्वाच म्हणजे तिचा आदित्यवर फार जीव आहे.आजीचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आपण ऑक्सिजन वरच आहोत अस आजीला वाटत होतं.सुदैवाने एअर होस्टेस चांगली होती. तिनं आजीला जास्तीची फळं, बिस्किटे दिली.
Send us a textआपल्या घराच्या भूपृष्ठा खालून 300 ते 500 फूट वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे सिद्ध करणारे संशोधन पुणे येथील डॉ. अविनाश खरात यांनी केले आहे. पाण्याच्या प्रवाहाचे अजूनही खूप काही अपघाता सारखे दृश्य परिणाम आपल्यावर होत असतात. ह्या आगळ्या पण जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची मुलाखत ऐकुया.
Send us a textन्हावी म्हणाला, 'हे काय, तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो?' तुझ्या या कु-हाडीचा दांडासुध्दा लाकडाचाच आहे व तोसुध्दा द्यायला हवास.'लाकूडतोडयाने गयावया केली करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. न्हाव्याने बळजबरीने कु-हाडीचा दांडा काढून घेतला व चार आणे देऊन त्याची बोळवण केली. बिरबलाकडे तक्रार गेल्यावर तो हसला........!
Send us a textगरजे पुरते अन्न मिळाले की तो थांबायचा. जास्तीचे गरजूंना द्यायचा. मग तो पैसे साठवू लागला काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी. गंगेत स्नान करायला उतरला तेव्हा पैसे वाळून पुरून वर शिवलिंग रचले. वर येऊन पाहतो तर सर्वत्र शिव पिंडी दिसू लागल्या!....
Send us a textएका ज्येष्ठ नागरिकाची एक खोली फक्त रद्दी पेपर ने भरलेली होती. एकटेच राहत होते. इतका कुबट वास पसरला होता घरभर की विचारूच नका. म्हणायचे, जेव्हा पैश्याची गरज असेल तेव्हा एकदाच विकून टाकीन म्हणजे भरपूर पैसे मिळतील!बाईंची मूले परदेशात होती. त्यांचे घर साड्या, कपडे, खरे खोटे दागिन्यांच्या यांच्या गाठोड्यानी गच्च भरलेलं होतं. डायनिंग टेबलवरही एवढी गर्दी की ही एकटी असूनही जेवायला ते वापरू शकणार नाही! ती असताना तिने तिचे कपडे गरजूंना देऊन टाकले असते तर?
Send us a textएकदा उन्हाळ्यात शेतकऱ्याने दहा हजाराचे कर्ज सावकाराकडून घेतले होते. परंतु शेतीचे काम सुरू असतानाच त्याच्या मुलीचे लग्न ठरले.त्यासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. सावकार दहा हजाराच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून अकरा हजार रुपये दिवाळीला घेत असे.शेतकऱ्याने खिशातून एक रुपयाचे नाणे काढले व सावकाराच्या हाती देत म्हणाला," लक्ष्मीचे दर्शन घडवण्याची ही किंमत. हा रुपया देऊन मी आज सावकार झाल्याचा आनंद घेत आहे.
Send us a textतहानेने प्राणी व्याकुळ होऊन इकडेतिकडे हिंडू लागले.काही जणांच्या लक्षात आले,आपल्या जंगलात नदीच नाही.त्यामुळे आपल्या पाणी मिळत नाही.सगळेजण मग डोंगरापलीकडच्या जंगलात गेले.तिथे एक नदी वाहत होती. " नदीबाई ,आमच्या जंगलात येतेस का? पाण्यावाचून आमचे खूप हाल होतात" प्राणी म्हणाले." कशी येऊ?" नदीने विचारले.नदीचे काम चालू असताना एक पक्षी मात्र झाडावर निवांत बसून राहिला.त्याला सर्वांनी बोलावले.मात्र तो काही गेला नाही.
Send us a textकोरड्या विहिरीतील एक भांडं पाणी भरण्यासाठी त्या दोघींची अर्ध्या तासाची धडपड उघड्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पाण्याच्या थेंबाची किंमत या माणसांना कशी आणि किती चुकवावी लागते या कल्पनेने अंगावर काटा आला. जे पाणी निघालं ते अत्यंत गढूळ होतं, पण तेच त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी होतं.
Send us a textया बायकांना विठ्ठलावर रुसून दूर राहिलेल्या रुक्मिणीच मन चांगलं ठाऊक आहे. असं एकट रहाणं लग्नाचं नातं न तोडताही नवऱ्यापासून दूर राहणं, काय सोपं असतं काय? पण तरी रुक्मिणी विठूचा गाजत्या मंदिरात त्याच्या शेजारी नाही उभी राहिली.लग्नाआधीच राधेवरच त्याचं प्रेम तिला माहित असेलही,पण लग्नानंतर इतक्या वर्षांनी तिनं पुन्हा त्या दोघांना तस पाहिलं आणि ती वंचनेच्या जाणिवेनं तडफडली.
Send us a textमी मुंबईत जन्माला आले,साहजिकच इथले फास्ट फूड, वडा पाव आणि पावभाजी माझ्या डीएनए मध्ये आले.वांगी म्हणजे माझा शत्रू क्रमांक १.तर या जळगाव करांचे वांग्यावर निस्सिम प्रेम.इतके की सासरे निगुतीने वांग्याची भाजी करत.
Send us a textएकदा मांजर रानात दिवसा हिंडायला गेले.काही खायला मिळते का पाहू लागले.त्याला एक भाकरीचा तुकडा आणि लोण्याचा गोळा एके ठिकाणी दिसल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले. थोडा सुद्धा विचार न करता हावरटपणाने तिथे एकदम झेप घेतली आणि मांजर जाळ्यात अडकले.उंदीर जाळे कुरतडू लागला; पण अशा बेताने की पहाट होईपर्यंत मांजर सुटू नये,कारण त्याला माहीत होते - पहाटेच शिकारी येणार आपली शिकार न्यायला....
Send us a text" ताई, रंग एकच आहे सगळीकडं..पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..ताई, रंगाच्या छटा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.., या सा-या गोष्टी सारख्या करा..मग रंगही समान दिसेल..!!अजून काही महिन्यांनी बघा..रंग अजूनच वेगळा दिसेल..!" रंगारी काका म्हणाले.
Send us a textत्या लहानशा जीवाला वाटायचं, "माझे आई-बाबा माझ्यासाठी काहीही करू शकतात!"पण आता… ३० वर्षांनंतर…स्टेशनवर आई मला सोडायला आली आहे. प्रवासाचं स्थान बदललंय, पण ‘वाट' तीच आहे.पूर्वी मी वाट बघायचे, आज आई वाट बघते…आणि उद्या? कदाचित मीच माझ्या मुलीची वाट बघेन…
Send us a textस्पेनमधून जाताना ती उशिरापर्यंत सायकल चालवत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इतक्यात दोन तरुण समोरून बाईकवर आले. वेदांगील पाहून ते थांबले आणि अचानक चाकू काढून तिच्यावर रोखला. त्यांना पैसे हवे होते. म्हणून त्यांनी झटापट केली. वेदांगीला थोडी दुखापतही झाली. ती घाबरली. तोवर पैसे घेऊन ते तरुण पळून गेले होते. खरी अडचण त्यापुढे होती. वेदांगीला स्थानिक भाषा येत नव्हती. स्थानिक लोकांना इंग्लिश येत नव्हते. मुश्किलीने इतरांची मदत घेतली आणि डॉक्टरांकडे गेली. तिला लुटणारे होते, तसेच मदत करणारेही होते. त्यामुळे वेदांगी खऱ्या अर्थाने जग पाहत होती. उपचार करून ती पुढे निघाली, पण असा प्रसंग पुन्हा केव्हाही येऊ शकणार होता.
Send us a textएके रात्री, माता कौशल्या जी झोपेत असताना त्यांच्या राजवाड्याच्या गच्चीवर कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला.त्या उठल्या आणि त्यांनी विचारले, "कोण आहे तिकडे?"त्यांना कळले की ती शत्रुघ्नजींची पत्नी श्रुतकीर्ती आहे.माता कौशल्येनी तिला खाली बोलावून घेतलं.श्रुतकीर्तीजी आल्या, त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्या आणि तिथे उभ्या राहिल्या.माता कौशल्याजींनी विचारले: "श्रुती! मुली, तू इतक्या रात्री गच्चीत एकटी काय करतेय? तुला झोप येत नाही का? आणि शत्रुघ्न कुठे आहे?"श्रुतकीर्तीचे डोळे अश्रूंनी भरले,ती तिच्या सासू-आईला बिलगली,तिला मिठी मारत म्हणाली:"आई, मी त्यांना पाहून तेरा वर्षे झाली आहेत".हे ऐकून कौसल्येच्या उरात धस्स झालं..!
Send us a textएकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, तिथं काही मुलं बेसबॉल खेळत असलेली त्यांनी पाहिली.हर्बर्टने वडिलांना विचारलं :"बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का?"वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखं मूल आपल्या संघात नकोच असतं. पण त्यांना हेही जाणवलं की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.वडील त्या मुलांपैकी एकाकडे गेले आणि त्याला विचारलं, "तुम्ही हर्बर्टला थोडं खेळायला द्याल का?"त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला,"आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात येऊ द्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू
Send us a textलग्नानंतर नवीन जोडपं जोतिबाला जात.तिथे जत्रा भरलेली असते.तिथे एका पाळण्यात बसून फोटो काढतात ती दोघं.छान मजेत एकत्र हसत खेळत बाजार करतात आणि शेवटी घरी येताना आईची तपकीर ची पुडी आणायचं मात्र विसरतात. सून येऊन आत्या बाईच्या (म्हणजे सासूच्या ) पाया पडते. पण सासू तोंड फिरवून जाते ,आणि म्हणते," किती वेळ तो,दिवे लागण झाली,घरी देवासमोर दिवा लाव आधी".
Send us a textसहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा शेवटच्या पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी कि कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना....रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार तिथे जाऊन?ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे....
Send us a text“साब! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर मधे बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्या सोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर,पीळदार आणि अगदी दाट मिशा आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त....होयं अवघे एकशे सात वर्षे!हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे? आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं.
Send us a textरात्री साडेअकरा-बारा वाजता दरवाज्याची कडी वाजली. बाबांनी दार उघडले. आईही उठून बसली. बाहेर एक अनोळखी माणूस... भरघोस दाढी वाढलेला... साधी विजार-साधा शर्ट... हातामधे आईची पिशवी... "मी यशवंत पवार... परळीचा आहे. आज सकाळी या ताई आणि तुमचा हा मुलगा गडावर आले होते... तेव्हा तिथून दर्शन घेऊन परत येताना ही पिशवी पेठेतल्या मारुतीच्या देवळात विसरली होती. ती घेऊन आलोय. बघून घ्या..." आईनं पिशवी बघितली. सगळं जसंच्या तस्सं होतं. "तुम्ही बरोबर आमच्या घरी कसं काय आलात ?" आईनं विचारलं. "तुमचा हळद-कुंकवाचा करंडा बघितला. त्यावर तुमचं नांव आणि शंकराचार्य मठ असा पत्ता आहे. तो बघितला आणि गडावरचा रात्रीचा प्रसाद झाल्यावर, रामरायाची आणि समर्थांची शेजारती झाल्यावर, रामराया आणि समर्थ झोपल्यावर अलगद गडावरुन आलोय बघा."आईनं त्यांना आत बोलावलं. चटकन आत जाऊन स्टोव्ह पेटवून दूध गरम करुन आणून दिलं. "पितळी पेल्यात द्या" असं त्यानं म्हटल्यावर आईनं कपातलं दूध पितळी पेल्यात घालून दिलं. घटाघटा पिल्यावर "जातो आता गडावर... वाट बघत असतील" म्हणून 'श्रीराम समर्थ' म्हणाला... आम्ही त्यांना नमस्कार केला आणि ते गेले...दुसऱ्या दिवशी आम्ही परळीला गेलो. सरपंचांना भेटलो आणि यशवंत पवारांबद्दल चौकशी केली. "परळीत यशवंत पवार या नावाचा कुणीही माणूस नाही." हे त्यांचं उत्तर. आम्ही घरी येऊन आईला हे सांगितले. झालं... आईचं सुरु झालं... "रात्री रामराया आणि समर्थ झोपल्यावर कोण यशवंत पवार येणार ? तो यशवंत पवार नव्हता तर मारुतीराया होता... नाहीतर या एवढ्याश्या फाटक्या पिशवी साठी एवढ्या रात्री गडावरुन कोण येणार ? तो नक्कीच मारुतीरायाच होता..."
Send us a textएक होता पर्वत. उघडा बोडका. खडकाळ, उजाड वाळवंटात एकटाच उभा होता. बिच्चारा! त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत, ना झाडं. पानांची सळसळ सुद्धा कधी ऐकली नाही त्याने.एक दिवस मात्र त्याच्या नीरस निसर्गचित्रावर एक लालसर पाखरू विसावलं. त्या पाखराच्या मऊ मऊ पिसांच्या शरीराचा स्पर्श पर्वताला झाला मात्र, तो त्या अनोख्या अनुभवाने थरारून गेला. पाखरू जायला निघालं. त्यावेळेला पर्वत म्हणाला "अग, तुझ्यासारखं कधी काही पाहिलंच नव्हतं आजपर्यंत. तुला जायलाच पाहिजे का ? तू इथेच का राहत नाहीस?
Send us a textताटात जेवण न मिळाल्याने नाराज झालेल्या नवरदेवाच्या कपाळावरच सावधान माझ्याशी लग्न केल्यास मुलीला हुंड्यासाठी मुलीचा हुंड्यासाठी छळ होऊ शकतो हे लिहिलेले नाही काय? असा हट्ट धरणाऱ्या नवरदेवाला तेव्हाच टाटा बाय-बाय करायला नको काय?दुसऱ्याच्या पैशाने स्वतःचे कौतुक करून घेण्याचा सोस व होंडा यात फरक नाही हे त्या मुलीला आणि तिच्या मुलीच्या आई-वडिलांना तरी स्पष्ट दिसायला हवे.
Send us a text"बंदिनी" मधली "मोरा गोरा रंग लैले" म्हणत प्रियकराला भेटायला अतुर झालेली नटखट नूतन शेवटी त्याच प्रियकराची असहाय्य अवस्था बघून समोरचा उज्वल भविष्यकाळ लाथाडून "मेरे साजन हैं उसपार" या त्याच्या शब्दांबरोबर कासावीस होत धावत सुटते. त्यावेळची तिची तगमग आपण विसरु शकतो?
Send us a textपलीकडचा वाडा प्रसिद्ध होता,तो यासाठी की तिथे एक मारुतीचे देऊळ होते.रामाची भजने तिथे लावलेली असत. खूप सुंदर आणि मोठे हवेशीर देऊळ.त्या देवळात खेळायला वेगळीच मज्जा यायची. आम्ही मुले तिथे धुडगूस घालायला लागलो की,तिथले मामा आणि पार्वती काकू खूप ओरडायचे आम्हाला.आमच्या अंगणात मोगऱ्याची खूप झाडे.त्यामुळे उन्हाळ्यात रात्री मस्त सुगंध दरवळत रहायचा.दुसऱ्या दिवशी त्याचे सुंदर गजरे करून घालायचे.
Send us a textशिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली ती निष्प्राण माकडीण. नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी. त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक, की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि तितक्याच अनामिक भावनेनं ते आईला बिलगून बसलं आहे. त्याला माहीत पण नसेल की पुढचा नंबर आपला आहे.
Send us a textसिफ्रेने गुहेत पूर्णपणे एकटे राहण्याचा स्वेच्छेने निर्णय घेतला होता. घड्याळे नाहीतसूर्यप्रकाश नाहीवेळेचा मागोवा घेण्याचा कोणताही मार्ग नाहीत्याला हे जाणून घ्यायचे होते:* मेंदू पूर्णपणे एकाकीपणाला कसा प्रतिसाद देतो* जेव्हा तुम्ही दिवस - रात्र या नैसर्गिक चक्रांपासून तुटता तेव्हा काय होतेजगाला वाटलं की तो वेडा आहे.१९७२ मध्ये, सिफ्रे टेक्सासमधील एका गुहेत ४४० फूट जमिनीखाली उतरला.त्या ठिकाणी त्याचा बाहेरील जगाशी संपर्क नव्हतात्याच्या दिवसांना मार्गदर्शन करण्यासाठी सूर्य नव्हताफक्त तो, एक स्लीपिंग बॅग आणि जगण्यासाठी साधने एवढंच काय ते त्याच्या बरोबर होतं. पूर्ण अंधार सोबतीला होता.शांतता, बधिर करणारी.सुरुवातीला, सिफ्रेने दिनचर्या राखण्याचा प्रयत्न केला. केंव्हा जेवायचे आणि केंव्हा झोपायचे या साठी तो भूक आणि थकव्याचे अनुसरण करत असे.पण प्रकाश किंवा घड्याळांशिवाय...
Send us a textएकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की, 'मला तो पारिजात माझ्या अंगणात हवा. किती छान सुवास आहे त्याला! तो पारिजातक माझ्या अंगणातचं लावा.'कृष्ण हसला, त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, "सत्यभामे, पारीजातक हा अमूल्य आहे !त्याचा सुवास जितका मनमोहक, तितकं त्याचं बहरणं कठीण! पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर, याची फुलं मालकीच्या अंगणात पङत नाहीत."पण स्त्री हट्टापुढे कृष्णाचं काही चालेना.पारिजातक तिच्या अंगणी लागला, आणि रुजलाही! पण फुलांचा बहर मात्र सगळा रुक्मिणीच्या अंगणात पडायला लागला.आता सत्यभामेला कळून चुकलं, "आपण नको तो हट्ट करून बसलो. फुलं तर गेलीचं, पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्ण पुजेला ही दुरापास्त झालो‘. आणि मग, पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलंही नाही.
Send us a text"आणि कैकयी मातेच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता ?... जर मला वनवास झाला नसता, तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृप्रेम कसं पाहू शकलं असतं ?
Send us a textएके दिवशी, तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, कुंवर साहिब यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली... आणि त्यांची शिक्षा अंमलात आणण्यासाठी त्यांना 'जन्नत बाग' येथे आणण्यात आले. राजकुमाराचा शिरच्छेद करून त्या डोक्याचा वापर करून, त्यावर पोलोचा खेळ खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. कुतुबुद्दीन स्वतः राजकुमाराच्या घोड्यावर, शुभ्रकवर, स्वार होऊन त्याच्या खेळाडूंच्या पथकासह जन्नत बागेत आला. शुभ्रकाने राजकुमाराला बंदिवासात पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुंवर सिंहाचा शिरच्छेद करण्यासाठी साखळ्या उघडताच, 'शुभ्रक' स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही.. त्याने उडी मारून कुतुबुद्दीनला स्वतः च्या पाठीवरून फेकलं आणि त्याच्या मजबूत पायांनी त्याच्या छातीवर अनेक वेळा हल्ला केला, ज्यामुळे कुतुबुद्दीनचा मृत्यू झाला!
Send us a textकारखाना कसा सुरू असतो ना,तसेच स्वयंपाक घराचे असते. एकदा सुरू झाला की थांबायचे नावच घेत नाही.लवकर उठा,मग फ्रीज मधील दूध काढा,ते तापवा,आणि सर्वासाठी आलं गवती चहा चा मस्त चहा बनवा!नंतर थोडाफार योगा उरकून ,अंघोळ करून कणिक मळून भाजीची तयारी.ते झालं की कामवाली मावशी हजर.तिच्यासमोर अक्षरश: कामे टाकावी लागतात.कारण तिचा वेग फारच असतो आपल्यापेक्षा!
Send us a textएकदा एक काव्य पं. हृदयनाथ यांच्या वाचनात आले. ते त्यांना एवढे भावले की लगेचच ते स्वरबद्ध केले. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले. पण या गडबडीत पं. हृदयनाथ हे गीतकाराची परवानगी घ्यायला मात्र विसरले. पं. हृदयनाथांच्या परिचितांनी "हे कवी खूप तापट आहेत. ते कोर्ट कचेरी करतील" म्हणत घाबरवले. त्या कवींनी नोटीस न देता या गाण्याच्या स्वरसाजाची स्तुती करुन आणखी काही गाणी पाठवली होती. एका प्रतिभावंताच्या प्रतिभेला दुसऱ्या प्रतिभावंताने दिलेली तेवढीच उत्स्फुर्त अशी ही दाद होती !