Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Send us a textबुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेनिमित्ताने अनुभवलेलं जंगल म्हणजे मनावरचं न पुसलं जाणारं शब्दचित्र.... अंधारलेल्या जंगलात निःशब्द रात्री शांततेवर जराही ओरखडा उमटू न देता जेव्हा लांबून चार पायांची आकृती दिसू लागते... नि हळूहळू अस्पष्ट पायरव ऐकू येतो...
Send us a textमायकेल अँजेलोच्या कलाकृती पाहून लोक म्हणायचे – “दैवी प्रतिभा आहे ”David पाहून लोकांना वाटे, “ही ताकद आमची ताकद आहे.” Pietà पाहून लोक म्हणाले – “हे दु:ख आमचं दु:ख आहे.” सिस्टीन चॅपल पाहून लोक म्हणतात – “ असा स्वर्ग हे आमचं स्वप्न आहे.” त्याने देवाला दगडातून मुक्त केलं आणि माणसाला देवाजवळ नेलं.तो जितका महान कलाकार होता, तितकाच तो विनम्र होता. तो म्हणायचा, “मी शिल्प घडवत नाही,”. “शिल्प आधीच दगडात आहे. मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो.”
Send us a textमी आधीच्या रविवारी विकत घेतलेला कोंबडा त्या मुलाला आठवडी बाजारात जावून परत केला. तो पैसे परत करू लागला. "भेटीचे पैसे नसतात " असे सांगून मी मना केले.लांब गेल्यावर वळून पाहिले तर तो मुलगा त्या कोंबड्याचे मुके घेत होता आणि त्याची ताई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती!
Send us a textमाणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्यान पिढ्या सन्मानाने जगतात. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव पेला किंवा सर्वनाम 'भांडं' असं मिळालं. "माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची हार्टफेलने डेथ झाली."हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.
Send us a textआपणं कितीही मोठं झालो तरी आईला आपण लहानच वाटत असतो. त्याचा एक हृद्य प्रसंग या पुस्तकात आहे. एकदा रात्री कामतांनी पोट साफ करण्याचं औषध घेतलेलं होतं. केव्हा तरी त्यांची झोप चाळवली. म्हणून ते टॅायलेटला जायला उठतले. त्या चाहुलीने त्यांची आईही जागी झाली व 'का उठलास?' म्हणून तिने चौकशी केली. 'काही कारण नाही, जाग आली म्हणून जाऊन येतो', असं सांगून ते टॅायलेटमध्ये गेले. काही वेळाने त्यांनी बाहेरून विचारलं, "का रे ठीक आहेस ना?" असं एक दोन वेळा विचारल्यावर बाहेरून "शू..शू..शू.." असा आवाज यायला लागला. त्यांनी आतूनच विचारतात, "अगं, आवाज का करतेस?" तर त्या म्हणाल्या, "काही नाही. तुला व्यवस्थित व्हावी म्हणून. लहानपणी नाही का, असंच करत होते?"कामत लिहितात, "काहीही म्हणा, आई आईच असते."
Send us a textराजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत होता. वामन अवतारातील श्रीहरी, राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर वामनाने बळीच्या यज्ञमंडपात जाऊन त्याला आपल्या वाक्चातुर्याने चकित केले अणि त्याच्याकडे तीन पावले जमीन मागितली. आणि म्हटले "हे माझ्यासाठी तीन लोकांसारखे आहे आणि हे राजा, तू ते दान केले पाहिजे". राजा बलीने ही एक क्षुल्लक विनंती समजून ती मानली आणि वामनाला तीन पावले जमीन देण्याचे वचन दिले.
Send us a textब्रिटिशकालीन भारतात दिल्ली शहरात विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली: जो कोणी मेलेला साप सरकारजमा करेल, त्याला बक्षीस दिले जाईल. अनेक लोक साप मारून बक्षिसे मिळवू लागले . पण लवकरच अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, मेलेल्या सापांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.बक्षिसाच्या लालसेपोटी काही हुशार लोकांनी पैसे कमावण्यासाठी चक्क नागांची पैदास करायला सुरुवात केली होती. इतिहासातील ही प्रसिद्ध घटना "कोब्रा इफेक्ट" म्हणून ओळखली जाते.
Send us a textगोष्टी सांगणे हा प्रकार आज जरी जुन्याकाळचा वाटत असला, तरी गोष्टींची शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही. फक्त काळाप्रमाणे गोष्ट सांगण्याचे प्रकार व माध्यमे बदलली आहेत. केवळ वाचन किंवा श्रवण हेच एक माध्यम राहिलं नाही, तर चलचित्राच्या माध्यमाने पण गोष्टी अधिक आकर्षक रितीने सांगता येतात. विज्ञापन जगात तर याला असामान्य महत्त्व आहे. कमी वेळात प्रभावीपणे गोष्ट सांगण्यास जाहिरातदार आपले कसब पणाला लावतात, जेणेकरून उपभोक्त्यांचं मन स्व:च्या उत्पादनाकडे वळविता येईल. नाटक व सिनेमा या माध्यमाने कलाकार कथेला आपल्या अभिनयाच्या जोडीने अधिक प्रभावीरीत्या मांडतो.
Send us a text" कोरवणजी, ह्या मासिकामुळे आपलाही चाहत्यांचा वर्ग निर्माण झाला असेल हे मला माहिती नव्हते. एकदा सायकलच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याने मेज़ नाव "वाहतूक गुन्हेगार" या यादीत नोंदले गेले. पण मीच तो "कोरवणजीचा व्यंगचित्रकार लक्ष्मण" आह एहे समजल्यावर मी मुक्त झालो..एवढेच नव्हे तर माझा दण्ड ही माफ झाला!........
Send us a textआर. के. लक्ष्मण. त्यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. 'कॉमन मॅन' हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रा मुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातील हा एक खुमासदार भाग.
Send us a textपरम पूज्य टेंबे स्वामींनी अंतिमसमयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असं सांगितलं. सेवेकऱ्याने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला. प. पू. टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणे धारण करु शकत नाही. शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदामाईतील मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर प. पू. टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास ऊभे राहीले. त्यांच्या पायाचे उमटलेले हे ठसे आहेत. सेवेकऱ्याने ह्या पादूका स्वत:च्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करतांना पादुकांना समाधीसमोर स्थान दिले आहे.
Send us a textबहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचायच्या. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "हे तर बावनकशी सोनं आहे ! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे !" आणि मग अत्र्यांनी त्या कविता.. मोहोरा प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.
Send us a textआज काकाना नेमकं काय झालंय याच काकूना कोड पडतं आणि या विचारात त्या बेडवर विसावतात नेमक्या त्याच वेळी काका त्यांच्या पुढे हसत उभे रहातात आणि एखाद्या सराईत जादुगारा सारखं आपल्या खिशातून आयफोन काढतात आणि काकूंच्या हातावर ठेवतात. आता मात्र काकूंच डोकं सटकतं..."अहो चाललंय काय तुमचं?...अगदी कुबेराचा खजिना सापडल्या सारखं असे कसे काय पैसे उधळायला लागलात?...आणि काही मागचा पुढचा विचार आहे की नाही तुम्हाला?"
Send us a textएका कंपनीमध्ये तेथील कर्मचारी लिफ्ट खूप हळू चालत असल्याची तक्रार करत होते. मजल्यांवरून ये-जा करण्यासाठी खूप वेळ लागत होता, ज्यामुळे लोकांचा कामातील वेळ वाया जात होता आणि त्यांची चिडचिड होत होती. लोक लिफ्ट लवकर चालेल या आशेने बटणे वारंवार दाबत असत.
Send us a textझेरॉक्सवर सही शिक्का मारून बंडोपंतांचा तो अर्ज मिळाल्याची पावती दिली. आता लवकरच काम होणार हा विचार मनात येऊन सुखासमाधानाने बंडोपंत घरी परतले.अर्ज देऊन पंधरा दिवस झाले तरी रस्ता दुरुस्त होईना. उलट तो जास्त खोल व रुंदावत चालला होता. समाजाला आपण काही देणे लागतो असे वाटून बंडोपंत पालिकेच्या कचेरीत गेले. पी०आर०ओ०कडे गेले. आणि अर्जाची नक्कल दाखविली.पी०आर०ओ० त्यांना म्हणाले, "हे बघा साहेब, एखादे पत्र आम्हांला आले की आम्ही एक महिना उघडतच नाही. त्यानंतर ते उघडले गेले की ते त्या खात्याक रवाना होते. खातेप्रमुख खूप काम असल्यामुळे एक महिना ते बघू शकत नाह बघितल्यावर शनिवारच्या साप्ताहिक सभेत ते कार्यक्रम पत्रिकेवर येते. त्यावर च होते. निर्णय होतोच असे नाही. निर्णय पुढल्या साप्ताहिक सभेपुढे ठेवला जातो. ही आमची कार्यपद्धती आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या अर्जावर लवकरच कारवाई करण्यात येईल!"
Send us a text१९४५ साल. दुसऱ्या महायुद्धाचा धूर अजून आकाशात पसरलेला होता. युरोप उद्ध्वस्त झाला होता, जपानच्या शहरांवर अणुबॉम्ब कोसळले होते, आणि जगाचा आर्थिक कणा मोडून पडला होता. अशा वेळी अमेरिकेने आपले खरे राजकीय आणि आर्थिक पत्ते उघडले. जुलै १९४४ मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर राज्यातील एका शांत गावात – ब्रेटन वूड्स इथे – ४४ देशांचे प्रतिनिधी जमले. युद्धानंतरच्या जगाच्या आर्थिक चौकटीची पुनर्बांधणी कशी करायची, हे ठरवण्याची ही संधी होती. डॉलर साम्राज्याच्या जन्माची इथेच पायाभरणी झाली.
Send us a textअडाणी शेतकरी आई- बापाने कष्ट करून लाखभर रुपये साचवले होते. ते गण्याच्या हाट्टापायी जेईईच्या क्लास वर लावले. गावातील सहावीपासून जेईई फाउंडेशन केलेला राहुल चांगल्या मार्काने पास झाला पण गण्या CET सुद्धा काठावर पास झाला. गण्याला खाजगी इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी बापाला त्याचं शेत गहाण ठेवावं लागलं.
Send us a textएका वकिलाने आपली विहीर एका शिक्षकाला विकली. दोन दिवसांनी वकील शिक्षकाकडे आला आणि म्हणाला, "सर, मी तुम्हाला विहीर विकली आहे, पण त्यातलं पाणी विकलेलं नाही. तुम्हाला पाण्याचा उपयोग करायचा असेल, तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील."
Send us a textबसमधील इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. "त्या फाट्यावर तर आपण तिला उतरुन देऊ. पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल ? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर ? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर ?"बाहेर काहीही दिसत नव्हते. त्याने तिचे बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे बखोटे धरून चालायला लागला, म्हातारीला सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी !
Send us a text“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या' एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला. शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले.
Send us a textती फ्रिट्झ ची पत्नी होती. तो एक श्रीमंत शस्त्र व्यापारी होता. पण फ्रिट्झचं तिच्यावर प्रेम नव्हतं. त्याच्यासाठी, ती एक शोभेची वस्तू होती, एक दागिना होती, ज्याचं प्रदर्शन तो मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये, पार्ट्यांमधे करत असे. तिच्यासाठी, या पार्ट्या म्हणजे एक तुरुंग होता, जिथे ती शांतपणे बसून शक्तिशाली पुरुषांना, पुढे येणाऱ्या युद्धासाठी बनवल्या जाणाऱ्या शस्त्रांबद्दल बोलताना ऐकत असे. यामध्ये भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी......आणि हो, नाझीज सुद्धा होते.
Send us a textत्या छोट्याशा मुलीच्या मैत्री मुळे जोखू भुतमध्ये किती मोठा बदल झाला होता! मैत्री ही एक जादूच असावी, नाही का? दुष्टातल्या सुष्टाला बाहेर काढू शकणारी, निराशेला आशेमध्ये बदलू शकणारी, रडणाऱ्याला हसवू शकणारी आणि राक्षसालासुद्धा माणूस बनवू शकणारी !आणि हो! ती लहानगी जोखूच्या भीतिदायक आवाजाला किंवा रूपाला घाबरली नाही त्यामुळे जोखू भूताची ‘भयकथा' अपयशी ठरली !
Send us a textइंग्रज लेखक जेम्स डग्लस याने तोरणा म्हणजे गरुडाचे घरटेच आहे असे गौरवाने लिहून ठेवले आहे. ह्या तोरण्याच्या जंगलात सखुबाई आणि रामभाऊ हे वाघ आणि वाघीण राहतात. मुलांच्या शिक्षणासाठी सुखाचा त्याग आणि श्रमाची परिसीमा गाठून यांचा संसार आता प्रगतीच्या प्रकाशाने लखलखतो आहे. एका शेतकरी कुटुंबाची मनाला चटका लावणारी ही कहाणी!
Send us a textनऊ वर्षांनंतरची 'जाग'!नऊ वर्ष ती आपल्याच बिछान्यात ७० पेक्षा जास्त पुरुषांचा बलात्कार सहन करत होती आणि तिला त्याची सुतराम कल्पना नव्हती... पण तिला भान आणणारी 'ती' घटना घडली आणि सुरू झाली न्यायालयीन लढाई... आपल्याच नवऱ्याविरुद्धची आणि बलात्काराच्या कायद्यातील बदलासाठीची... बाईच्या सन्मानासाठीची ! त्या जीझेल पेलिकॉ यांना नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'लीजिआँ ऑफ ऑनर' देण्यात आला. त्यानिमित्ताने...
Send us a textलहानपणापासून मुलांना आपण काऊ- चिऊच्या गोष्टी सांगतो. त्यातूनच त्यांचे संवेदनाक्षम मन निसर्गाकडे जाऊ लागते . ह्या सुंदर गोष्टीचा निसर्गाच्या माध्यमातून आढावा घ्यायचा प्रयत्न.
Send us a textरस्त्या वरच्या प्रवासात आपल्याला कधी कधी अशी माणसं भेटतात, जी फक्त आपली गाडी चालवत नसतात तर ते आपल्या जीवाचं रक्षणही करत असतात. त्यांची नजर रस्त्यावर असते, पण मन सतत आपल्या सुरक्षेवर. पण दुर्दैवाने, आपण त्यांचा अनुभव दुर्लक्षित करतो. आणि मग रस्त्यावरचा तो प्रसंग आपल्याला चांगलाच धडा शिकवतो!
Send us a textज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जाते, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे लता-गोविंदच्या कुटुंबाचे निघालेले वाभाडे ऐकल्यावर पटतं. मात्र घरातला एक जरी माणूस विचारी असेल तर ते घर खूप काही सोसूनही पुन्हा उभं राहू शकत त्याचीच ही कहाणी.
Send us a text'द ट्रुमन शो' हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते - त्याचे संपूर्ण आयुष्य एक असत्य किंवा काल्पनिक आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्याचे आयुष्य हा २४ तास चालणारा, जगभरात प्रसारित होणारा एक प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो आहे.या चित्रपटातील नायकाप्रमाणेच, "आपल्यासमोर जे जग सादर केले जाते, तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो." आपणही आपापल्या 'अमवेल्ट' स्वीकारतो आणि तिथेच थांबतो.
Send us a text"अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?" हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..... आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग...
Send us a textटोरेस स्कॅम मधले गुंतवणूकदार कोण होते?लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे.... प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या १ लाख २५ हजार मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या टोरेस स्कीम मध्ये कायमचे गेलेयत........कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही!
Send us a textसोमालियातील तिच्या आयुष्यात होते आई-वडील, सहा भावंडं… एक उंट, दोन शेळ्या… आणि अफाट पसरलेले वाळवंट! अवघ्या पाचव्या वर्षी तिच्यावर स्त्री जननांग छेदनाची (FGM) भीषण प्रथा जबरदस्तीने लादली गेली. ती १३ वर्षांची असताना तिचं लग्न ६० वर्षांच्या माणसाशी ठरवण्यात आलं होतं — तो तीच्या वडिलांचा मित्र होता, आणि बदल्यात वडिलांना पाच उंट मिळणार होते.....हे ऐकले आणि ती पळाली....!
Send us a textओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचं असं म्हणणं आहे की, चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी जवळपास एका चमच्याच्या पंधराव्या भागाएवढं पाणी लागतं.मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कंपनीच्या जीपीटी-3 मॉडेलकडून 10 ते 50 प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जवळपास अर्धा लीटर पाणी लागतं. याचा अर्थ, प्रत्येक उत्तरासाठी जवळपास 2 ते 10 चमचे पाणी वापरलं जातं.
Send us a textहत्तीच्या विमानप्रवासात कोंबडीची पिल्लं ठेवणं हे प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या आणि कल्याणाच्या नियमांच्या पूर्ण विरोधात आहे.हत्तीला विशेष पिंजऱ्यात ठेवले जाते, प्रशिक्षित कर्मचारी असतो, त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेतली जाते.मग... ही कथा कुठून आली?ही आहे एक ‘रूपक कथा' – symbolic story.
Send us a textजनुकांपेक्षा सुद्धा आपल्या भोवतालची परिस्थिती जीवनपद्धती, उत्पन्न आणि सामाजिक घटक अकाली मरणास कारणीभूत असतात असे इंग्लंडमधील एका अभ्यास पाहणीतून पुढे आले आहे यु के बायो बेस बँकेकडे असलेल्या पाच लाख लोकांच्या माहितीच्या विश्लेषणावर हा अभ्यास आधारित आहे ही माहिती जमा करण्यासाठी नावे नोंदवल्यानंतर संबंधितांना विविध प्रश्न विचारले गेले. जसं, माणूस कोणत्या परिस्थितीत राहतो, तो धूम्रपान करतो का, त्याची वृद्धत्वाकडे वाटचाल कोणत्या टप्प्यावर आणि कशी सुरू झाली, तशी ती झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित आजार त्याला होतात का याचाही तपास करण्यात आला.
Send us a textएकेकाळी, एक अतिशय सुंदर गोरी छोटी मुलगी होती जी नेहमी तिच्या आजीने दिलेली लाल टोपी घालायची. तिला ती इतकी आवडायची की ती कधीही टोपी काढत नसे; खरं तर, त्यामुळे, तिचं नाव काहीही असलं तरी सर्वांसाठी ती फक्त ‘लिटिल रेड रायडिंग हूड‘ नावाची मुलगी होती.
Send us a textनुकतीच शाळा सुरू झाली असल्याने मुलांचा दंगा सुरुच होता. म्हणजे खेळ कमी आणि दंगा मस्तीच जास्ती. मग मी मुलांसोबत एक खेळ खेळलो आणि गंमत म्हणजे मला त्यांच्या पालकांविषयीच जास्त माहिती मिळाली. मुलांचा गोंधळ-गुंधळ सुरू होता म्हणून मी त्यांना म्हणालो, “चला, आपण शांततेचा एक नवीनच खेळ खेळूया.”मुले तयार झाली.
Send us a textसगळ्यात आधी गेल्यावर सिनियरच्या बायकोने समजावून सांगितलेली गोष्ट म्हणजे, "बघ शामली, फौजीशी लग्न केलस खरं, पण त्याच्याकडून सामान्य नवऱ्या सारख्या अपेक्षा ठेऊ नको. कितीही काही झालं तरी पहिलं त्याचे काम.., त्यानंतर त्याचा परिवार. आणि ही गोष्ट तुला मान्य करावी लागेल. आणि हो, जे जसं आहे त्यात आनंदी राहायला शिकावं लागेल."
Send us a textजॉय लोबो एक होतकरू इंजिनियर होता. तो 20 वर्षांचा होता. तो खूप हुशार होता. मेहनती पण होता. त्याने 2009 साली आपल्या इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या रूम मध्ये बसून एक ड्रोन बनवला होता. पण त्यावेळच्या सरकारने त्याला म्हणावं तसं प्रोत्साहन दिलं नाही, उलट बाहेरच्या देशांमधून ड्रोन विकत घेतले तर दलाली खाता येईल म्हणून त्याचा प्रोजेक्ट 'फेल' करण्यात आला. नैराश्येतून तो शेवटी हॉस्टेलच्या त्याच खोलीत जिकडे त्याने ड्रोन बनवले होते, त्याने आपला जीव दिला. तुम्हाला आठवत असेल, हा सीन थ्री इडियट्स चित्रपटात पण दाखवला होता.
Send us a textअचानक जुनी वाचलेली बातमी आठवली ज्यात लिहिले होते कि एकाचवेळी, एकाच ठिकाणी शिकागो अमेरिका येथे एक हजार पक्षी मरण पावलेले आढळले. इतक्यात आपल्याच देशातील जैसलमेर येथे वीज वाहिन्यांमुळे १९००० पक्षी मरण पावले. हे सर्व सत्य असलं तरी त्या दिवशी माझ्या मनात कायम येत गेलं कि, कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना, मारामार्या करतांना बघीतलेय पण आज पर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन कोणत्याही परिसरात नैसर्गिक रित्या मृत पडलाय असे बघीतलेलं नाही. नव्हे जगात कुठेही सहसा असे आढळत नाही.
Send us a textबोलता बोलता त्यातली एक ‘आमच्या आई ना....' करत सुरू झाली. ‘आमच्या आई' म्हटल्याबरोबर लक्षात आलं की आता सासुबाईंची काही खैर नाही. मधूनच काही ऐकू येत होतं, तर मधूनच काही त्यांच्या हसण्या खिदळण्यात विरून जात होतं. बहुतेक त्या मैत्रिणी मैत्रिणीच आल्या असाव्यात. बोलण्यावरून तरी त्या मुंबईच्या वाटत होत्या. एक तुटक वाक्य ऐकू आलं, ‘अगं, असं वाटतं ना कधी कधी ...' हे वाक्य दोन वेळा पाठोपाठ बोललं गेलं. त्यामुळे बोलण्यातील तीव्रता, भावनांची तीव्रता, सासू-सुनेचं नातं कसं असेल याची कल्पना आली.
Send us a textदहिवडी बसस्थानकावर तिकिटासाठी ७ रुपये नसल्याने तिष्ठत बसलेले धनाजी जगदाळे यांना ४०,००० रुपयांचे बंडल सापडले. हे पैसे प्रामाणिकपणे परत करत मनाने धनवान असलेला धनाजीने ते बक्षीस नाकारले. म्हणाला, " तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले". आणि फक्त तिकिटासाठी ७ रुपयेच घेतले. ही केवळ प्रामाणिकतेची गोष्ट नाही, तर माणुसकीचीही आहे!
Send us a textसकासकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचं एकच म्हणणं होतं, "तुम्हीच खाताय माझे पैसे."अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.ती क्षणभर गोंधळली. दीड वर्ष सरलं. दर महिन्याला ती तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिली…मुख्य साहेबांनी तिला खरं सांगितलं.“आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे.अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे. आज त्यांना अपघात झालाय.” .......लेखक: अमोल अ. पवार, उंब्रज. 9970773576; 079727 85133
Send us a textओडिशात अगदी निर्मनुष्य जंगलात पडझड झालेले पुरातन मंदिर असले तरी तिथे गाभाऱ्यात दिवा तेवत असलेला दिसतोच दिसतो! चैत्र - वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने सगळे ओडिशा त्रस्त झालेले असते. प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेले महाप्रभू शेवटी पुरीच्या राजाला निरोप पाठवतात, "मला थंड पाण्याने स्नान करायची इच्छा आहे!" मग मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या १०८ हंडे थंड पाण्याने स्नान केल्याने त्याच दिवशी जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा ह्या तिघाही भावंडाना ज्वर चढतो! …..
Send us a textआज नेहमीप्रमाणे ती कामावर आली. टोमणे मारणाऱ्या गटाचा म्होरक्या काही अश्लील बोलत तिच्या पुढे गेला तशी ही वेगाने त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. आसपासच्या सर्वांनीच श्वास रोखले. त्याच्याही लक्षात यायच्या आत तिने त्याच्या दोन थोबाडीत मारल्या. सर्वत्र स्मशान शांतता पसरली . "गेले अनेक महिने हकनाक तुमचा मानसिक छळ मी सोसते आहे. तो आज थांबेल ही अपेक्षा आहे व न थांबल्यास पुढील कायदेशीर प्रक्रियेस सामोरे जायची तयारी ठेवा. कदाचित तुम्हाला महिला कायदे वा सक्षम महिलेची क्षमता ठाऊक नसेल पण मी संविधान मानणारी आणि जाणणारी बाई आहे हे लक्षात ठेवा." ती उद्गारली.
Send us a textद्रौपदीला इतिहासाने आणि धर्मशास्त्राने तिला 'पतिव्रता' म्हणून मान्यता दिली. आख्यानकर असे सांगतात की ,कुठल्याशा समारंभाच्या वेळी तेजस्वी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला.. त्याचं देखणेपण, तेज, व्यक्तिमत्त्व पाहून ती क्षणभर मोहीत झाली..क्षणभर तिच्या मनात विचार आला – हा सहावा पांडव असता तर?
Send us a textविठ्ठल भक्तीची ही भक्तिरसपूर्ण लोककथा आहे.संत चोखामेळा यांना सामाजिक बंधनामुळे त्यांना आत जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नव्हता . रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या घरी पांडुरंग आले. त्यांनी चोखोबांना जागे केले आणि हाताला धरुन मंदिराच्या गाभाऱ्यात नेले. तेथे देव त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसले. आपल्या कंठीचा हार त्यांच्या गळी घातला. तो प्रसिद्ध अभंग...धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥
Send us a textशेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!”
Send us a textते रोजच्या प्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली —"काका… काका…"ते वळाले.७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती."काय झालं गं... एवढी धावत आलीस?"काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं."काका... पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती..."मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं."आता दुकान बंद केलं गं... सकाळी ये, मिळेल."
Send us a textपरवाच पत्नीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले, "तुम्ही काउंसेलर आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा."मी त्यांना म्हटलं, "भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल."
Send us a textएकदा वृंदावनला धार्मिक यात्रेस गेलो होतो. तिथं एकदा रामसुखदासजींचा सत्संग ऐकायला गेलो. प्रवचन संपल्यानंतर मी त्यांना विचारलं,"स्वामीजी, माझी ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, पण मला पूजाअर्चा, विधी वगैरे करणं फारसं जमत नाही. तरीही मला ईश्वराची कृपा कशी लाभेल?"स्वामीजी थोडा वेळ शांत राहिले. मग म्हणाले," भक्ती म्हणजे सेवा. जर आपण प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचं रूप पाहिलं आणि मनापासून सेवा केली, तर तीच खरी भक्ती!"मग त्यांनी मला विचारलं,"तू काय करतोस?"" मी एक शिक्षक आहे.""मग तुझं कामच तुझी भक्ती समज. जर प्रत्येक व्यावसायिक आपल्या कामात सेवा आणि कृतज्ञतेची भावना ठेवेल, तर तो ईश्वराचीच सेवा करत असतो."
Send us a textगावातल्या म्हाताऱ्या कधीच रिटायर होत नाहीत. अगदी बिछान्याला खिळल्या तरी ओसरीत बाज टाकून पडल्या पडल्या अंगणातल्या वाळवणावर ध्यान ठेवतात. कधी रुपयाचा व्यवहार माहीत नाही, कधी मनासारखं काही नेसायचं घेता आलं नाही, चार मण्यांशिवाय अधिकचा मणी गळ्यात आला नाही. माहेरात मायबाप, भाऊ, भावजया शिल्लक नाहीत. असलीच तर दूरच्या कुठल्यातरी खेड्यात तीन लेकांनी वेगळ्या खोपटात ठेवलेली दुःखीसुखी सासुरवाशी एखादी बहीण. तिची ख्यालीखुशाली वर्ष-वर्ष मिळत नाही. जन्म जणू एक भोग होता अन् तो कधी एकदाचा सरतो याची वाट पाहत आयुष्य ढकलणाऱ्या या म्हाताऱ्या मरणासाठी धावा करत कुस बदलतात...