Life of Stories

Follow Life of Stories
Share on
Copy link to clipboard

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Anuradha, Mona, Shaila & More


    • Jul 19, 2026 LATEST EPISODE
    • weekdays NEW EPISODES
    • 5m AVG DURATION
    • 2,085 EPISODES


    Search for episodes from Life of Stories with a specific topic:

    Latest episodes from Life of Stories

    # 2084 : शंभर कौरवांच्या जन्माची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 19, 2026 6:34


    Send us Fan Mailएकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली होती. तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला होता की तुला माझ्याकडून जे हवे ते तू मागू शकतेस.गांधारीने त्याच्याकडे शंभर पुत्र होण्यासाठी आशीर्वादमागितला होता. गर्भपातानंतर गांधारीने त्यांना बोलावून विचारले की, तूम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे, पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे. त्याला जन्म द्या किंवा एखाद्या मातीत गाडून टाका.

    # 2083 : "असा कसा हा मनुष्य स्वभाव" लेखिका सुधा मूर्ती. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jul 15, 2026 9:43


    Send us Fan Mailआपल्याला प्रत्येकालाच आयुष्यात कधीतरी कौतुकाची थाप मिळावी, असं वाटतं. पण त्या कौतुकासाठी एखादा माणूस अशी एक खोटी गोष्ट सांगतो... आणि काही क्षणांतच ती खोटी गोष्ट त्याच्याच समोर उघडी पडते!प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात घडलेला हा अगदी खरा प्रसंग आहे.एका छोट्याशा गावात त्यांना भेटतो एक हुशार, सुसंस्कृत आणि अत्यंत आत्मविश्वासाने वागणारा तरुण. पण त्याने स्वतःच्या सुवर्णपदकाबद्दल केलेला एक दावा... पुढे असा काही वळण घेतो, की क्षणात सगळंच बदलून जातं.सत्य आणि असत्य  समोरासमोर उभं ठाकल्यावर नेमकं काय घडतं? आणि एका साध्या प्रश्नामुळे त्याचा मुखवटा कसा गळून पडतो?माणसाच्या स्वभावाचा आरसा दाखवणारी ही सत्यकथा नक्की ऐका.

    # 2082 : माहेरपण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 14, 2026 7:36


    Send us Fan Mailरसिकाचे अविनाशशी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिची सासू, सुहासिनी उर्फ मंदाकिनी, तिच्याकडे शहरात काही दिवस राहायला आली. सुहासिनी रोज रसिकाला काहीतरी नवीन खायला करायला लावायची. जर रसिकाला नाही जमलं तर ते स्वतः बनवून खायची. रात्री मनाला वाटेल तेव्हा पर्यंत टीव्ही पाहायची, कधी कधी टीव्ही सुरु ठेऊनच झोपी जायची. सकाळी कधी आठ वाजता तर कधी नऊ वाजता उठायची. रसिकाच्या साड्या नेसून पाहायची. रसिकाला सासूचे वागणं काही कळेना.

    # 2081 : अंबा, अंबिका आणि अंबालिका. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 11, 2026 8:23


    Send us Fan Mailमहाभारतात अनेक प्रमुख आणि दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. मुख्यत्वे कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या भोवती हि कथा फिरते.अंबा, अंबिका आणि अंबालिका या महाभारतातील अत्यंतमहत्त्वाची पात्रे झाल्या. काशी नरेश म्हणजेच, राजा काशीराज, यांच्या तीन कन्या होत्या. जेव्हा या तिघींचे स्वयंवर होणार होते त्यावेळी भीष्माने एकट्यानेच तेथे आलेल्या सर्व राजांना पराभूतकरून तिन्ही कन्यांचे हरण करून त्यांना हस्तिनापुरात आणून माता सत्यवतीच्या समोर उभे केले; जेणे करून त्यांचे लग्न हस्तिनापुराचा राजा आणि सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य यांच्यासोबत संपन्न केला जावा.

    # 2080 : "Project universe." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jul 8, 2026 8:54


    Send us Fan Mailकल्पना करा... एक असं जग जिथे अन्न, पाणी, सुरक्षितता आणि प्रत्येक सुखसोय भरपूर आहे. मग तिथे राहणारे जीव सर्वांत आनंदी असतील... असंच वाटतं ना? पण एका वैज्ञानिक प्रयोगाने हा समजच उलटा करून टाकला. "Universe 25" या जगप्रसिद्ध प्रयोगात उंदरांसाठी स्वर्ग निर्माण करण्यात आला, पण पुढे जे घडलं ते विज्ञानविश्वालाही हादरवून गेलं. हा प्रयोग आजही एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो—केवळ सुखसोयी पुरेशा असतात, की अर्थपूर्ण जगण्यासाठी आणखी काही आवश्यक असतं? या विलक्षण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रयोगामागचं सत्य जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका.

    2079 : "जगण्याचा उत्सव" लेखिका : ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jul 7, 2026 8:12


    Send us Fan Mailही कथा ऐकताना एक प्रश्न सतत मनात राहतो,माणूस खरंच शरीराने हरतो, की मनाने? बाईआजींनी आयुष्यभर स्वतःच्या अटींवर जगण्याचा निर्धार केला होता, पण नियतीने त्यांच्यासमोर एक अनपेक्षित वळण उभं केलं. त्या वळणावर त्यांनी स्वतःशी, मृत्यूशी आणि जगण्याशी केलेला संवाद मनाला खोलवर स्पर्शून जातो. एका छोट्याशा जाणिवेने त्यांचं आयुष्य पुन्हा कसं उजळलं, हीच या कथेची खरी ताकद आहे. शेवटी बाईआजी असा कोणता संदेश देतात, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ऐकायलाच हवा? चला, ऐकूया "जगण्याचा उत्सव" 

    # 2078 : लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय" लेखक समीर गायकवाड. प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jul 7, 2026 8:48


    Send us Fan Mailपाऊस बदललाय की आपण?लोक म्हणतात, पाऊस कोपलाय... पण खरंच पाऊस बदललाय का?पूर्वी माणसांशी, झाडाझुडपांशी संवाद साधणारा पाऊस आज वर्षाची सरासरी काही दिवसांत का गाठतोय?की घाईच्या जगात तोही आपल्यासारखाच धावायला लागलाय?पाऊस चुकलेला नाही... तो फक्त आपल्याच बदललेल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवतोय.निसर्ग, माणूस आणि हरवलेल्या निवांत क्षणांची ही हळवी गोष्ट...

    # 2077 : सत्यवती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 5, 2026 8:06


    Send us Fan Mailसत्यवती हे महाभारतातील एक महत्त्वाचे आणि प्रभावशाली पात्र आहे. ती हस्तिनापूरचा राजा शंतनू याची पत्नी, कौरव-पांडवांची पणजी आणि वेदव्यासांची आई होती. तिने हस्तिनापूरच्या राजकारणाला नवीन दिशा दिली. सत्यवतीचा जन्म एका अप्सरेच्या गर्भातून माशाच्या रूपात झाला होता. एकदा राजा सुधन्वाच्या दरबारात एका माशाचे पोट उघडल्यावर त्यातून एक मुलगा आणि मुलगी बाहेर आले. राजाने मुलाला स्वतःकडे ठेवले आणि मुलीला कोळ्याच्या स्वाधीन केले. मच्छीमाराने त्या मुलीला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले. ती जसजशी मोठी होत गेली तसतशी ती खूप सुंदरही झाली. मच्छीमारांच्या वसाहतीत राहिल्यामुळे तिचे नाव मत्स्यगंधा पडले. तीच सत्यवती होय.

    # 2076 : मिलिंद पाटील: एक माणूस एक मिशन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 4, 2026 13:58


    Send us Fan Mailपश्चिम घाट म्हणजे फक्त डोंगर नाही. पश्चिम घाट म्हणजे फक्त जंगल नाही. पश्चिम घाट म्हणजे आपला श्वास आहे. जगातल्या ३५ Biodiversity Hotspots पैकी एक म्हणजे आपला पश्चिम घाट. इथे असे हजारो प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आहेत जे जगात फक्त इथेच आढळतात. पण आज हे जंगल धोक्यात आहे. रस्ते होतायत, बांधकामं होतायत, झाडं तुटतायत आणि सोबत नाहीशा होतायत त्या प्रजाती ज्यांची नावंही आपल्याला माहीत नाहीत. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ४२५ वेगवेगळ्या वृक्ष प्रजाती आहेत. पण किती लोकांना माहीत आहे हे?

    # 2075 : कपटी शकुनी मामा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 3, 2026 9:24


    Send us Fan Mailमहाभारत म्हटलं की डोळ्यासमोर अनेक पात्रं उभी राहतात; अगदी अर्जुनापासून ते भीष्मापर्यंत परंतु सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे शकुनीचं. महाभारतातील सर्वात कपटी आणि कारस्थानी व्यक्ती म्हणून सर्वाना शकुनी परिचित आहे. गांधार देशाचा राजपुत्र आणि गांधारीचा सख्खा भाऊ असलेला शकुनी, महाभारताचे युद्ध घडवून आणण्यासाठी जबाबदार असेलल्या काही व्यक्तींपैकी एक आहे. गांधार देश हल्लीच्या अफगाणिस्तान मध्ये येतो.

    # 2074 : कुंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jul 1, 2026 11:44


    Send us Fan Mailमथुरेवर राज्य करणाऱ्या वृष्णी यदुवंशीय देवमीढ शूरसेनाची ज्येष्ठ कन्या, म्हणजेच विस्तीर्ण नयनांनीची आणि अत्यंत रूपवती असलेली पृथा, हिचे बालपण काहीसे वेगळेच होते. तिचा जन्म होण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्याच्या स्वाधीन केले होते. त्यांनी तिला आपला जवळचा मित्र आणि अपत्यहीन चुलतभाऊ असलेल्या कुंती राज्याच्या भोज यदुवंशीय कुंतीभोजाला भेट म्हणून दिले होते. पृथाचा जन्म झाल्यानंतर लगेचच कुंतीभोजने तिला दत्तक घेतले आणि तेव्हापासून ती 'कुंती' या नावाने ओळखली जाऊ लागली.

    # 2073 : पर्यावरणस्नेही भिख्खू आनंद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 30, 2026 3:34


    Send us Fan Mailभगवान बुद्धांचे थोर शिष्य भिक्खु आनंद यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असे होते. काटकसरीपणा हा महामानवांचा विशेष सद़्गुण असतो. आनंदही अत्यंत काटकसरी होते. गरजेशिवाय ते दानाचा स्वीकार करत नसत आणि दानात कोणी मौल्यवान वस्तू दिल्या, तर त्यास नकार देत. 'अंगावरचं चिवर आणि हातातल्या भिक्षापात्रावरच मी संतुष्ट आहे,' असं ते म्हणत.

    # 2072 : "पुंडलिका भेटी आले परब्रह्म " (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 30, 2026 6:54


    Send us Fan Mailपंढरीचा विठूराया… शेकडो वर्षांपासून विटेवर विनातक्रार उभा आहे.फक्त भक्ताची वाट पाहात....!कोण होता तो भक्त, ज्याच्यासाठी देव थांबून राहिला ?काय घडलं होतं त्या छोट्याशा विटेजवळ?आणि कशी सुरू झाली पंढरपूरच्या विठ्ठलाची ही अद्भुत गोष्ट?भक्ती, प्रेम आणि एका विलक्षण भेटीची कथा…“पुंडलिक भेटी आला पांडुरंग!”

    # 2071 : एक झपाटलेला शास्त्रज्ञ- जॅार्ज मरे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 29, 2026 6:39


    Send us Fan Mailडॉ. जॅार्ज मरेच्या गोष्टीतला सर्वात मोठा धडा म्हणजे ‘विज्ञानाची सुरुवात अनेकदा एका साध्या प्रश्नापासून होते..‘त्याच्याकडं आधुनिक प्रयोगशाळा नव्हती. सीटी स्कॅन नव्हते. हार्मोन चाचण्या नव्हत्या. संगणक नव्हते; होतं ते फक्त निरीक्षण, तर्कशक्ती आणि प्रयोग करण्याचं धाडस..

    # 2070 : तुलसीदासांचा सुत्रश्लोक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 28, 2026 4:35


    Send us Fan Mailश्री. तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की..."महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?"तुलसीदास म्हणाले, "हो"भक्त म्हणाला, "मला पण दर्शन घडवाल का ?"तुलसीदास म्हणाले, "हो नक्की"तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!तुलसीदास म्हणाले , "अरे हे खुप सोप्पं आहे !!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल."

    # 2069 : "पक्ष्यांची भाषा ‘निळवंती‘ समजू लागले तर?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 27, 2026 8:58


    Send us Fan Mailआपण पक्ष्यांचा किलबिलाट रोज ऐकतो... पण ते नेमकं काय बोलत असतील, हा प्रश्न कधी मनात आला आहे का?कल्पना करा... एक दिवस अशी वेळ आली की पक्षी, प्राणी आणि माणूस एकमेकांचं म्हणणं समजू लागले!हे आज विज्ञानकथेसारखं वाटत असलं, तरी त्या दिशेने विज्ञानाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.एका छोट्याशा पक्ष्याच्या आवाजामागचं रहस्य उलगडण्यासाठी एका संशोधिकेने तब्बल पंधरा वर्षे घालवली... आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जगाला एक आश्चर्यचकित करणारा शोध दिला.नेमकं काय सापडलं?  पक्षी खरोखरच एकमेकांशी बोलतात का?आणि त्याहून महत्त्वाचं... ज्या दिवशी त्यांची भाषा आपल्याला समजू लागेल, त्या दिवशी ते जे सांगतील, ते ऐकण्याची तयारी आपली असेल का?...

    # 2068 : "निवृत्तीनंतरचा 'उद्योग" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 26, 2026 5:02


    Send us Fan Mailनिवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा, हा अनेकांसमोरचा प्रश्न… पण जोशीकाकांनी त्यावर शोधलेला उपाय मात्र अगदीच भन्नाट!ना सिनेमाची आवड, ना पुस्तकांचा नाद, ना कोणता खास छंद… तरीही त्यांचा प्रत्येक दिवस मजेत जातो.एक दिवस पु. ना. गाडगीळसमोरचा ट्रॅफिक पोलीस, एक गाडी आणि जोशीकाकांची ‘निरागस' बोलणी… यातून सुरू झाला असा खेळ, की शेवटी कोण कुणाची फिरकी घेत होतं हेच कळेनासं झालं!जोशीकाकांचा हा हटके टाईमपास ऐकताना  हसू आल्याशिवाय राहणारच नाही.====

    # 2067 : "ती गेली तेव्हा रिमझिम..." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 25, 2026 10:12


    Send us Fan Mailकाही गाणी मनाच्या खोल कप्प्यात जपलेल्या आठवणी पुन्हा जाग्या करतात.कवी ग्रेस यांची “ती गेली तेव्हा रिमझिम...” ही अशीच एक कविता — विरह, एकटेपणा आणि नात्यांच्या न दिसणाऱ्या धाग्यांची कहाणी.बाहेर पडणारा पाऊस आणि मनात कोसळणारा पाऊस यातला फरक कधी मिटून जातो, हे या शब्दांतून जाणवतं.आई असो, पत्नी असो किंवा आयुष्यातली एखादी जिवाभावाची व्यक्ती… तिच्या नसण्याने निर्माण होणारी पोकळी कशी असते?ऐकूया… रिमझिम पावसात भिजलेलं एक मन.

    # 2066 : "ये ग ये ग विठाबाई". (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 24, 2026 9:34


    Send us Fan Mail“इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण?” या उत्सुकतेने संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले.पण विठ्ठलाला आईच्या मायेने हाक मारणारी जनाई त्यांना भेटली ती गोवऱ्यांच्या ढिगाजवळ एका अनपेक्षित प्रसंगात!सारख्या दिसणाऱ्या गोवऱ्यांमधून जनाईच्या गोवऱ्या कबीरांनी कशा ओळखल्या?आणि तिच्या साध्या श्रमांतही चक्रपाणी कसा वसला होता?ऐका जनाईच्या निस्सीम भक्तीची सुंदर गोष्ट...=========

    # 2065 : येरे घना येरे घना. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 23, 2026 6:17


    Send us Fan Mailआरती प्रभूंच्या कवितांत शब्द नाही , तर भावनांचे झरे वाहत असत. स्वानंदासाठी कविता करणाऱ्या त्या कवीच्या मनातून एके दिवशी काही ओळी सहज उमटल्या—"नको नको म्हणतांना, गंध गेला राना वना...ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना..."हृदयनाथ मंगेशकर वारंवार म्हणत, "ही कविता पूर्ण करा." पण आरती प्रभू प्रत्येक वेळी ते हसत हसत टाळत. अखेर एक दिवस शब्दांचा जणू बांधच फुटला आणि कविता पूर्ण झाली.पुढे हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुरांनी आणि आशा भोसले यांच्या स्वरांनी "ये रे घना, ये रे घना" अजरामर झालं. आजही हे गीत कानावर पडलं की पावसाचा सुगंध, मनाचा मोर आणि निसर्गाचा उत्सव एकाच वेळी जागा होतो.

    # 2064 : "सेकंड हॅन्डचं दुःख". लेखक कौस्तुभ केळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 22, 2026 7:19


    Send us Fan Mailतिच्या नवऱ्याला एकच मोठा भाऊ. अभ्यासात हुशार, कायम पहिला नंबर आणि आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणारा. धाकट्याच्या वाट्याला मात्र कायम मोठ्या भावाच्या वापरून झालेल्या गोष्टी आल्या—सेकंडहॅन्ड पुस्तकं, त्यातल्या रेघोट्यांसकट; सायकल, आणि नंतर नोकरीही मोठ्या भावाच्या ओळखीने. मोठ्या भावाने मोठा फ्लॅट घेतल्यावर त्याचा जुना फ्लॅट याने विकत घेतला.लग्नानंतर सासू-सासरे मात्र यांच्याच घरी राहिले. त्यांची सेवा, आजारपण, सगळ्या जबाबदाऱ्या यांनीच सांभाळल्या. पण कौतुकाची वेळ आली की, त्यांच्या तोंडी नाव मात्र कायम थोरल्याचंच.....!

    # 2063 : Pull the door - दरवाजा ओढा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 21, 2026 5:51


    Send us Fan Mailआमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचारी भगिनीचा तर हा कायमस्वरूपी कार्यक्रम. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही.पुन्हा ढकलतात मग मी आतून म्हणतो,”खिंचोऽऽ, खिंचोऽऽ."लिखा है ना दरवाजे पर..??यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, ”मै तो अनपढ हूँ, मुझे पढ़ना-लिखना नहीं आता."

    # 2062 : "राजाच्या माकड चेष्टा" लेखक : मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 20, 2026 3:40


    Send us Fan Mailराजाचा एक लाडकं माकड होतं! त्याला राजा दरबारात नेत  असे. तिथे रोज कुणाची पगडी उडव, कुणाची दाढी ओढ, असे त्याचे चाळे असतं. राजा तेंव्हा पोट धरून हसे . एके दिवशी सेनापतीने माकडाच्या हातात खरा "वस्तरा" म्हणजे तलवारच दिली. पुढच्या क्षणी माकड थेट राजाचीच दाढी करायला धावलं... राजाला पळता भुई थोडी झाली!त्या दिवसानंतर माकड दरबारात कधीही दिसलं नाही!

    # 2061 :उंदीर मारायला तलवार कशाला ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 19, 2026 4:41


    Send us Fan Mailजगातील अजेय समजला जाणारा एक तलवारबाज योद्धा... पण त्याची झोप उडवली एका छोट्याशा उंदराने! तलवार चालली, घरातील सामान तुटलं, पण उंदीर काही हाती लागेना. ही बातमी ऐकून मांजरीसुद्धा घाबरल्या. शेवटी मार्जार राणी स्वतः मैदानात उतरली आणि एका क्षणात सगळा खेळ संपवला. तेव्हा ती हसून म्हणाली, "उंदीर मारणं हे योद्ध्यांचं काम नसतं आणि तलवार हे उंदीर मारण्याचं हत्यार नाही!" ऐका, एका उंदराने अजेय योद्धा आणि संपूर्ण मांजरसमाजाला कसं हैराण करून सोडलं, ही भन्नाट झेनकथा.

    # 2060 : रामायणातील मंथरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 14, 2026 8:53


    Send us Fan Mailकैकयच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथांची तिसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती. कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे  तिच्यावर जास्त प्रेम होते. लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची ही दासी तिच्यासोबतच अयोध्येस आली होती.राणी कैकेयी आणि दासी मंथरा ह्या दोघी कैकय देशातील होत्या. मंथरा, राणी कैकेयीची लहानपणापासुन परिचयाची व अतिशय विश्वासू दासी होती. कैकेय देशाच्या राजा अश्वपती यांचा एक भाऊ होता, ज्याचे नाव बृहदश्व होते. त्याला एक मोठ्या डोळ्यांची मुलगी रेखा नावाची मुलगी होती.  ती लहानपणापासूनच कैकेयीची मैत्रीण होती. ती राजकन्या तर होतीच त्याच बरोबर बुद्धिवान सुद्धा होती. लहान वयातच तिला एक आजार झाला. या आजारात तिचं सर्वांग घामाने चिंब व्हायचे, त्यामुळे तिला खूप तहान लागायची.

    # 2059 : पाताळलोक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 12, 2026 10:18


    Send us Fan Mailवामन अवतार कथेत बळीराजाकडे श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. बळी त्यांना तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. मग वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापल्यावर आता “तिसरे पाऊल कोठे ठेवू?” असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करून शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो.

    # 2058 : काय असते पाण्याची एक्सपायरी डेट..? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 8, 2026 7:23


    Send us Fan Mailपृथ्वीवरील पाण्याचा साठा सुमारे ४.५ अब्ज वर्षे जुना आहे. हा पाण्याचा साठा अगदी आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि तो थेट सूर्यापेक्षाही जुना असू शकतो. पृथ्वीवर पाणी कसे आणि केव्हा आले?संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच धूमकेतू आणि लघुग्रहांच्या माध्यमातून हे पाणी पृथ्वीवर आले. पृथ्वी ही एक 'बंदिस्त' (Closed) सिस्टीम आहे, म्हणजेच नवीन पाणी बाहेरून येत नाही आणि इथले पाणी अंतराळात जात नाही. कोट्यवधी वर्षांपासून हेच पाणी बाष्पीभवन, पाऊस आणि नद्यांच्या माध्यमातून पुन्हा-पुन्हा फिरत आहे.

    # 2057 : "महाकालांच्या दारी...एक अनोखा नैवेद्य" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 8, 2026 6:43


    Send us Fan Mailमहाकालाच्या मंदिराचे दरवाजे बंद असताना एखादा माणूस रोज देवाला नैवेद्य का अर्पण करत असेल?लोक त्याला मूर्ख म्हणत होते, पण तो म्हणायचा, "देव बंद नाही... फक्त दरवाजा बंद आहे."लॉकडाउनच्या दोन वर्षांतही त्याने आपली श्रद्धा जपली.मग एक दिवस एक अनोळखी साधू आला... आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले .ही एका माणसाच्या विश्वास, निष्ठा आणि बंद दारांपलीकडे दिसणाऱ्या आशेची कथा आहे.

    # 2056 : "मामा जेव्हा वाकू शकला नाही" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 6, 2026 6:07


    Send us Fan Mailएकदा खूप दिवसांनी झेन गुरु रयोकान बहिणीच्या भेटीला गेला. बहिणीला आपल्या तरुण मुलाची खूप चिंता होती. "तू त्याचा लाडका मामा आहेस. तुझं तो ऐकेल. त्याला काहीतरी समजावून सांग," ती म्हणाली.पण रयोकानने दिवसभररात भाच्याला काहीही  उपदेश केला नाही.निरोप घेताना मात्र त्याने भाच्याला जवळ बोलावलं. "बेटा, जरा माझ्या जोड्याच्या नाड्या बांधून देशील का? आता माझं वय झालं आहे. आता माझ्याने वाकवत नाही. ..."एवढंच बोलून तो निघून गेला.पण  भाच्याच्या मनात बाकी जबाबदारीची जाणीव जागी झाली... ======

    # 2055 : "पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकाची कथा" ( प्रा.सौ. अनुराधा भडसावळे.)

    Play Episode Listen Later Jun 5, 2026 9:24


    Send us Fan Mailआज पुण्यातील आप्पा बळवंत चौकाला अनेकजण फक्त 'ABC चौक' म्हणून ओळखतात. पण त्या तीन अक्षरांमागे पानिपतच्या रणभूमीवर लिहिला गेलेला शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा एक जाज्वल्य इतिहास दडलेला आहे.जिथे एका दिवसात महाराष्ट्राची तरुण पिढी रणांगणावर मावळली, तिथेच तलवारींसोबत निष्ठा, प्रेम आणि कर्तव्याचाही अद्भुत संग्राम घडला.एका वीरपत्नीचे ज्वलंत शब्द, सरदार बळवंतराव मेहेंदळ्यांचा पराक्रम, सेनापती सदाशिवराव भाऊंची आपल्या माणसांवरील अपार माया आणि पुढे पुत्राने पूर्ण केलेला आई-वडिलांचा संकल्प...इतिहासाच्या पानांवर विखुरलेल्या या ठिणग्या आजही मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवतात.ही आहे पानिपतच्या रणभूमीवर जन्मलेल्या एका अमर गाथेची कहाणी...

    # 2053 : "पक्षी प्राण्यांची भाषा" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later Jun 4, 2026 9:35


    Send us Fan Mailहे थोडं अधिक प्रवाही आणि पॉडकास्टसाठी प्रभावी असं करता येईल:आपल्याला नेहमी वाटतं, "उद्याचं सगळं आजच कळलं, तर आयुष्य किती सोपं होईल! संकटं टाळता येतील, नुकसान वाचेल आणि मनाला शांती मिळेल!"पण सूफी संत एक वेगळाच प्रश्न विचारतात भविष्य कळलं तर खरंच शांती मिळेल, की चिंता वाढेल?कारण जीवनाचं सौंदर्य कदाचित त्याच्या अज्ञातपणातच दडलेलं असतं.ही कथा अशाच एका माणसाची आहे, ज्याला भविष्याचे पडदे उघडायचे होते... आणि त्या प्रयत्नात तो वर्तमानात जगणंच विसरून गेला.

    # 2053 : फिंगरप्रिंटस्. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 1, 2026 8:16


    Send us Fan Mailमानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून तयार होऊ लागतात. त्या वेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असते, तरीसुद्धा त्याची ओळख देणारी ही रेषांची भाषा त्याच्या शरीरावर लिहिली जात असते.या रेषांची रचना आपल्या DNA च्या सूचनांनुसार होते; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेषा ना आई-वडिलांसारख्या असतात, ना पूर्वजांशी जुळणाऱ्या असतात. जणू एखाद्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाने या रेषा त्वचेवर आपोआप उमटतात. ज्या एखाद्या अलौकिक व्यवस्थेकडे इशारा करतात.

    # 2052 :डोपामाइनच्या मागे असलेलं विज्ञान. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later Jun 1, 2026 8:56


    Send us Fan Mailडोपामाइन हे एक आकर्षक न्यूरोट्रांसमीटर आहे जे मेंदूच्या बक्षीस आणि आनंद केंद्रांमध्ये म्हणजे रिवॅार्ड आणि हॅपीनेस केंद्रंमधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे सहसा "फील-गुड" रसायन म्हणून संबोधले जाते. ते आपल्या एकूण मूड, प्रेरणा आणि अगदी व्यसनाधीन वर्तनावर सुध्दा प्रभाव टाकणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांसाठी जबाबदार असते. ते अशाप्रकारे आपल्या मेंदू आणि वर्तनावर परिणाम करते. न्यूरोट्रांसमीटर म्हणून याचं वर्गीकरण करण्यात आले आहे, याचा अर्थ हा एक रासायनिक संदेशवाहक आहे जो तंत्रिका पेशींमध्ये (म्हणजे न्युरोमस्क्युलर सेल्स मधे) सिग्नल वाहून नेतो.डोपामाइनचे मुख्य कार्य म्हणजे न्यूरॉन्स दरम्यान रासायनिक सिग्नल प्रसारित करणे आणि त्या द्वारे शरीराच्या विविध कार्यांवर प्रभाव टाकणे.

    # 2051 : हारा हाचि बू: वेटलॅासची जपानी पध्दत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 30, 2026 7:37


    Send us Fan Mailजपानमधील लोक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या कामातील चपळतेसाठी आणि वाढत्या वयातही असलेल्या उत्कृष्ट तंदुरुस्तीसाठी जगभर ओळखले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जीवनशैलीत आरोग्य आणि तंदुरुस्तीला दिले जाणारे महत्त्व. त्यांचे खाण्यापिण्याचे नियम खूप कडकअसतात. ते पौष्टिक पदार्थ, मोसमी भाज्या, ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेले सीफूड, कमी मसाले आणि कमी मीठ यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतात. पण त्यांच्या आरोग्याचे रहस्य फक्त आहारातच नसून जेवणाच्या पद्धतीत दडलंय.

    # 2050 : नीरा आर्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 29, 2026 8:01


    Send us Fan Mailनीरा दहा वर्षाची असताना हुबळी नदीवर पोहण्यासाठी गेली होती. तिला पोहणे येत नव्हते. ती पाण्यात गटांगळ्या खात असता एका तरुणाने तिला वाचवून बाहेर काढले. तो तरुण दुसता तिसरा कुणी नसून "सुभाषचंद्र बोस" होता. इथपर्यंतच नीरा व सुभाषचंद्र बोस यांचा संबंध होता. त्यानंतर तिचा आणि सुभाषचंद्र बोस ह्यचा संबंध कसा आला ते ऐकण्यासारखे आहे.

    # 2049 : टचग्लास बनवणारी झोउ कुनफेइ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 28, 2026 6:08


    Send us Fan Mailअमेरिका आणि चीन यांच्यात झालेल्या एका चर्चेच्या निमित्ताने आयोजित रात्रीच्या मेजवानीत मस्क आणि कुक यांच्या मधोमध सर्वाधिक चर्चेत राहिलेली एक महिला म्हणजे ‘लेंस टेक्नॉलॉजी'च्या संस्थापक झोउ कुनफेई होय.त्यांची जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे.एका छोट्या खेड्यातील मजूर मुलगी ते चीनमधील सर्वात श्रीमंत महिला असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.त्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या कष्टाच्या बळावर शून्यातून सुरुवात केली.

    # 2048 : गीतेचा दहावा अध्याय आणि वाटीभर ब्रम्ह!. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 27, 2026 4:15


    Send us Fan Mailरामदासांच्याकडे अनेक लोक बसले होते. तो शिष्य स्वामीजींकडे गेला आणि म्हणाला, "स्वामीजी, शंकराचार्यांनी वाटी पाठवली आहे ही; आणि ब्रम्ह मागितलं आहे ह्याच्यात!" रामदास म्हणाले, "देतो ना वाटीभर ब्रम्ह. पण ही वाटी रिकामी करून आण ना!"शिष्यानं उलटी वाटी करून सांगितलं, "अहो वाटी रिकामीच तर आहे."रामदासस्वामी म्हणाले, "तू शंकराचार्यांना जाऊन सांग की वाटी रिकामी करून द्या, म्हणजे ब्रम्ह घालतो त्यात."

    # 20447 : कहाणी एका कपात मावलेल्या विश्वाची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 26, 2026 5:18


    Send us Fan Mailपूर्वी भारतात पाहुणे आले की गुळ पाणी देण्याची पद्धत होती. आज याची जागा चहाने घेतलीय. भारतात चहा हा अर्थकारणाचा मोठा भाग बनलाय. अगदी ग्रामीण भाग असो वा शहरी भाग या 'अमृततुल्य' चहामुळे फार मोठा रोजगार प्राप्त होतोय. आता २१ मे हा 'आंतरराष्ट्रीय चहा दिन' म्हणून भारताच्या मागणीप्रमाणे, संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत, जगभर साजरा होतोय.

    # 2046 : श्रीरामांचा वनवासातील प्रवास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 25, 2026 13:34


    Send us Fan Mailरामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे. माता कैकयीच्या हट्टापाई श्री राम, लक्ष्मणजी आणि सीता मातेला वनवासाला जावं लागलं. विष्णूंचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही. श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला तरी त्यांनी वनवासात श्रीलंकेपर्यंत केलेल्या भ्रमंतीमूळे अवघी भारतभूमीच त्यांच्या सहवासाने पावन झाली आहे. श्रीरामांनी बरोबर चौदा वर्षे वनवास भोगला. चौदा वर्षांच्या वनवासात श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांनी नेमके कुठे कुठे वास्तव्य केले, जाणून घेऊया.

    # 2045 : "Mr.Know all" Author / W. Somerset Maugh. by . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 24, 2026 11:15


    Send us Fan Mail“मि. केलाडा, तुम्ही मोत्यांचे मोठे तज्ज्ञ आहात ना?” रॅमसे मिश्किलपणे म्हणाला. “मग सांगा बरं, माझ्या बायकोच्या गळ्यातली ही माळ किती किमतीची असेल?”हा प्रश्न ऐकताच केलाडा यांच्या डोळ्यांत चमक आली. त्यांनी माळ हातात घेतली. मोती निरखले. ओठांवर आत्मविश्वासपूर्ण हसू उमटलं.“ही माळ खरी आहे...” हे शब्द त्यांच्या ओठांपर्यंत आले.पण त्याच क्षणी त्यांची नजर वर गेली... आणि ती मिसेस रॅमसे यांच्या डोळ्यांना भिडली.क्षणभरापूर्वी आत्मविश्वासाने झळकणारे केलाडा अचानक थबकले.त्या तरुणीच्या डोळ्यांत एक विचित्र भीती होती. जणू एखादं गुपित उघड होण्याच्या उंबरठ्यावर उभं होतं. आणि त्या भीतीमागे एक मूक विनवणी—“कृपा करून... सत्य सांगू नका.”केलाडांनी पुन्हा मोत्यांकडे पाहिलं. मग त्या डोळ्यांकडे.आणि एका क्षणात त्यांना कळलं की हा प्रश्न मोत्यांचा नव्हता.तो एका स्त्रीच्या आयुष्याचा होता...

    # 2044 : "मधमाशांच्या पोळ्यात उंदीर शिरला तर..." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 23, 2026 4:35


    Send us Fan Mailकधी कधी मधमाशांच्या या पोळ्यात एखादा अनाहूत पाहुणा शिरतो — उंदीर!                                        थंडीत उब मिळावी म्हणून किंवा मधाच्या गोड वासाने आकर्षित होऊन !हजारो मधमाशा त्याच्यावर तुटून पडतात. त्यांच्या डंखांमुळे शेवटी उंदराचा मृत्यू होतो. आणि मग एक अद्भुत घडतं —तो उंदीर कुजत नाही. त्याचं शरीर जणू “ममी”सारखं जतन केलं जातं!.....

    # 2043 : "खुन्या मुरलीधर मंदिर" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 22, 2026 6:55


    Send us Fan Mailअठराव्या शतकाचा शेवटचा काळ. दादा गद्रे हे पेशवाईचे मोठे सावकार आणि सरदार होते. दृष्टांतानुसार त्यांनी मुरलीधराचं भव्य मंदिर उभारायचंच ठरवलं .मूर्तीच्या सौंदर्याच्या चर्चा थेट दुसरे बाजीराव पेशव्यांपर्यंत जाऊन पोहोचल्या. पेशव्यांनी ती शनिवारवाड्यात आणण्याची इच्छा व्यक्त केली. पण गद्रे सावकारांनी नम्रपणे नकार दिला.रातोरात मूर्ती गुपचूप त्यांच्या सदाशिव पेठेतील बागेत हलवण्यात आली.एका बाजूला अरब रक्षक. दुसऱ्या बाजूला कवायती सैनिक. त्या दिवशी मंदिराच्या दाराशी मोठा रक्तपात झाला...

    # 2042 : "वेडात मराठे वीर दौडले सात" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 21, 2026 11:53


    Send us Fan Mailसरसेनापती प्रतापराव गुजरांचं  मन द्रवलं. त्यांनी बहलोलखानाला जिवंत सोडलं. बातमी रायगडावर पोहोचली. शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते. राजे  भयंकर संतापले. महाराजांनी प्रतापरावांना खलिता पाठवून जाब विचारला,  त्या पत्रातले शब्द..तलवारीपेक्षाही तीक्ष्ण होते.“तह काय निमित्त केलात? बहलोलखाना सारख्या  शरण आलेल्या शत्रूला असं सहज सोडलंत? खानाचा पुरता बीमोड केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका.” हे वाक्य त्यांच्या जिव्हारी लागलं.....साल सोळाशे चौऱ्याहत्तर. कोल्हापूरजवळचं नेसरी नावाचं छोटंसं खेडं. आकाशात धुळीचे लोट उठलेत . समोर बहलोलखानाची  १५ हजारां ची फौज.  आणि या बाजूने  त्यांच्याशी सामना करायला ... फक्त सात.... फक्त सात घोडेस्वार वेगाने दौडत निघाले ....

    # 2041 : "डोळ्याला डोळा मिळाल्याशी मतलब" लेखक मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 21, 2026 5:06


    Send us Fan Mailएक चोर विणकराकडे चोरी करायला गेला. त्याचा  डोळा विणकराच्या धनुकलीमुळे फुटला. चोर म्हणत होता की त्याच्या  गलथानपणामुळे माझा डोळा फुटला. राजा म्हणाला, विणकराची चूक आहेच. त्याचाही एक डोळा फोडा. बाहुल्यांचे हातपाय तोडणं हा याचा छंदच बनला असलेल्या जोडप्याला त्याने दुसरी गोष्ट सांगितली...नवरा एका शेठजीकडे नोकरी करायचा. तो नवऱ्याला भयंकर वाईट वागवायचा, शिविगाळ करायचा. घरी आला की बायकोवर राग काढायचा. ती बाई तो राग साठवायची आणि पोरावर काढायची. त्याला क्षुल्ल्क कारणावरून बोलायची, मारायची, झोडायची.तो आपला राग खेळण्यांवर काढायचा. ती मोडायचा. बाहुल्यांचे हातपाय मोडायचा… अशा रीतीने एका भलत्याच मालकाच्या क्रौर्याला बिचाऱ्या बाहुल्या बळी पडायच्या,

    # 2040 : एक होता ओपनहायमर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 19, 2026 14:46


    Send us Fan Mailअखेरीस २८ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्राध्यक्षांनी मोठ्या प्रमाणावर आण्विक शस्त्रांचे देशपातळीवर उत्पादन करण्यास संमती दिली. हाच 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' म्हणून ओळखला जातो..!!संपूर्ण अमेरिकेत ३० प्रोजेक्ट साईट्स, तब्बल १ लाख कामगार आणि २.२ बिलियन डॉलर्सचा अवाढव्य खर्च..!! आणि एवढी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करत असून देखील, कोणालाही आपण अखेरीस कशाचं उत्पादन करणार आहोत ह्याची अजिबात कल्पना नव्हती ..!!

    # 2039 : "ऑफ तासाची किंमत" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 19, 2026 1:54


    Send us Fan Mail अस्मादिकांनी एकदा शाळेत, _“सर, प्लीज… आज ऑफ तास  द्या ना! खेळायला सोडा ना…”_ असा हट्ट केला.तेव्हा इंग्रजी शिकवत असलेल्या सरांनी एक जबरदस्त 'गुगली' टाकली… ते म्हणाले,सगळ्यांनी ‘One Two Three…' अशी आकड्यांची स्पेलिंग्ज लिहायची. जेव्हा कोणत्याही आकड्याच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदा ‘A' हे अक्षर येईल ना… लग्गेच  खेळायला जा!”थोड्याच वेळात _‘सौदा घाटे का है…'_ हे माझ्या लक्षात आलं.“बाळा, हजारपर्यंत  ‘Thousand' हे स्पेलिंग लिहिपर्यंत मध्ये कुठंही ‘A' येत नाही बरं…!”आणि Grammer शिकवण्याकरता फळ्याकडे वळले.....!

    # 2038 : शेवटचं पेन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 15, 2026 9:48


    Send us Fan Mailवीस वर्षे लोटली. पेरियासामी आता ऐंशी वर्षांचे झाले होते. त्यांची दृष्टी क्षीण झाली होती आणि ऐकण्याची शक्तीही मंदावली होती. तरीही, दररोज ते त्याच मंदिराच्या प्रवेशद्वाराशी बसत असत. तेच कपडे, तीच लेखणी. पण आता मात्र, त्यांचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला होता. मुले आता जेल पेन्स आणि स्केच पेन्स वापरू लागली होती; शिवाय, सर्व काही आता ऑनलाइन उपलब्ध होते.

    # 2037 : अपरा एकादशी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 9, 2026 6:16


    Send us Fan Mailएकादशी उपवासाला हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी २४ एकादशी असतात. जेव्हा अधिकमास किंवा मलमास येतो तेव्हा त्यांची संख्या २७ पर्यंत वाढते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला "अपरा एकादशी" असे म्हणतात.

    # 2032 : "Red" W. Somerset Maugham. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 9, 2026 14:57


    Send us Fan Mailदक्षिण समुद्रातील एका छोट्या बेटावर घडणारी ही गोष्ट आहे — प्रेम, विरह आणि काळाच्या शांत क्रूरतेची.रेड आणि सॅलीचं प्रेम इतकं खोल असतं, की गावातल्या लोकांना वाटतं हे दोघं कधीच वेगळे होणार नाहीत. पण समुद्रावरचं एक जहाज येतं… आणि एका क्षणात सगळं बदलून जातं.अनेक वर्षांनी जेव्हा हे दोघं पुन्हा समोरासमोर उभे राहतात, तेव्हा घडणारा प्रसंग मन सुन्न करून टाकतो.ही कथा सांगते — प्रेम संपत नाही असं आपण मानत असतो; पण काळ हळूहळू आठवणींचाही चेहरा बदलून टाकतो.Somerset Maugham यांच्या साध्या पण धारदार लेखनामुळे ही कथा संपल्यावरही मनात बराच वेळ रेंगाळत राहते.

    # 2036 : "पैज : पूर्ण एकांतवासाची" Anthony Chekhov. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

    Play Episode Listen Later May 8, 2026 14:58


    Send us Fan Mailही कथा आहे वीस लाख रुबल पैजेची …नियमानुसार त्या वकिलाला एका छोट्या घरात राहायचं होतं. कोणाशी बोलायचं नव्हतं. वर्तमानपत्र नव्हतं. माणसांचा आवाज येणार नव्हता. फक्त पुस्तकं, संगीत आणि जेवण....सुरवातीला तो रात्रभर पियानो वाजवत बसे, कधी ओरडे,...पहिल्या वर्षी त्याने प्रेमकथा, रहस्यकथा, साहसकथा वाचल्या.दुसऱ्या वर्षी तो गंभीर साहित्य वाचू लागला.....पंधरा वर्षांत त्याने पुस्तकांतून जग पाहिलं. प्रेम, युद्ध, पर्वत, समुद्र, देव — सगळं अनुभवलं शेवटी…  ही कथा आहे  एकाच्या आत्मशोधाची. त्या दोघांपैकी  खरं श्रीमंत कोण होतं, याचा शोध घेणारी.

    # 2035 : लेदर शुजची शिलाई-२० रुपये. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Play Episode Listen Later May 6, 2026 3:42


    Send us Fan Mailरस्त्याच्या कडेला चप्पल शिवणाऱ्या एका म्हाताऱ्या आजोबांकडे माझं लक्ष गेलं. माझ्या महागड्या लेदर शूजची शिलाई थोडी उखडली होती.मी गाडी थांबवली आणि त्यांच्यासमोर शूज ठेवले. "आजोबा, हे लवकर शिवून द्या, मला उशीर होतोय."आजोबांनी शांतपणे चष्मा नीट केला, शूज हातात घेतले आणि अतिशय बारकाईने काम करू लागले. पाच मिनिटांत त्यांनी शूज अगदी नव्यासारखे करून दिले."किती झाले आजोबा?" मी पाकीट काढत विचारलं."फक्त २० रुपये साहेब," आजोबा हसून म्हणाले."२० रुपये? एवढ्या कामाचे? हे घ्या १० रुपये. साधी शिलाई तर मारलीत तुम्ही," मी घासाघीस करत म्हणालो.

    Claim Life of Stories

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel