Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Send us a textFully conscious and in good health, I am writing today my will.After my death, Ransack my roomSearch each item, That is scatteredUnlocked Everywhere in my house.Donate my dreams, To all those womenWho between the confines ofThe kitchen and the bedroomHave lost their worldHave forgotten years agoWhat it is to dream.Scatter my laughterAmong the inmates of old-age homesWhose children, Are lostTo the glittering cities of America.There are some colours, Lying on my tableWith them dye the sari of the girlWhose border is edged, With the blood of her manWho wrapped in the tricolor, Was laid to rest last evening.Give my tears, To all the poetsEvery drop, Will birth a poemI promise.Make sure you catch the youth Of the country, everyone And inject themWith my indignation, They will need itCome the revolution.My ecstasy एस्टेसी Belongs toThat Sufi, WhoAbandoning everythingHas set off in search of God.Finally,What's left? My envyMy greed, My angerMy lies, My selfishnessThese simply Cremate with me... ---- बाबूषा कोहिली

Send us a text"आपली शेती फायद्याची बिलकुल नाही याचा दिंडोरा पिटणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना कोण आपली मुलगी देईल? हरणाऱ्या घोड्यावर कोणी पैसे लावत नसतोय!मुलांनी शेतीतील नवनवी तंत्रे शिकून घेऊन दरवर्षी ५० लाखांची पॅकेज काढतोय असे सांगितलं तर का त्याचे लग्न होणार नाही? शिका, योग्य मेहनत करा आणि लाखोंनी कमवा. समृद्धी कोणाला नकोय?" नाना म्हणाले.

Send us a textलहानपणापासून पॅरासेल्ससचं निरीक्षण अफाट.त्याला दगडांमध्ये, धातूंमध्ये, औषधी वनस्पतींमध्ये ‘ऊर्जेचं तत्त्व' दिसायचं. तो म्हणायचा,”जगातील प्रत्येक गोष्ट विषारी आहे;फक्त त्याचं प्रमाण ठरवतं की ती औषध ठरेल की विष.”त्यानं पार्याचं, शिश्याचे आणि इतर विषारी धातूंचं सूक्ष्म प्रमाणात वापर करून अनेक आजार बरे केले; सिफिलिस ह्या त्याकाळच्या भयानक लैंगिक रोगावर त्याने नियंत्रित मात्रेत पारा वापरला. जो भयंकर विषारी मानला जात असे. मलम, वाफ आणि लहान डोस देऊन रोगावर आघात केला.रोग बरा होऊ लागला. लोक अचंबित झाले. ”विषातूनच औषध?” हा त्याच्या उपचार पद्धतीच विजय होता.

Send us a textविसाव्या शतकाच्या मध्यात डीएनएची रचना कशी शोधली गेली याची ही कहाणी आहे, ही महत्त्वाकांक्षा, सहकार्य आणि स्पर्धेची कहाणी आहे. या शोधाच्या जनकांपैकी एक असलेले जेम्स वॅाटसन यांचे काही दिवसांपूर्वी म्हणजे, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ वॉटसन पदक विकून वादात अडकले. मात्र, त्यांच्या आयुष्यात असे वादाचे अनेक प्रसंग आले. आई-वडिलांचे एकुलते एक असलेले जेम्स स्कॉटलंडहून अमेरिकेला आले व तिथे स्थायिक झाले.

Send us a textदुसऱ्या दिवशी मृत्युदूत पुन्हा त्या दालनात गेला. सर्वत्र नजर फिरवत तो म्हणाला, "अहाहा, काय सुंदर कारागिरी! एक चूक सोडली तर...""अगदी हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणाऱ्या १२ मूर्ती आहेत ह्या!""चूक ? कोणती चूक ?", समोरून प्रश्न आला.

Send us a textसुनीताबाईंनी त्या संध्याकाळी बोरकरांच्या कविता एकामागून एक, जादू उलगडत जावी तशा ऊलगडल्या. ते अनपेक्षित लाघव मला पेलवेना. मी खुर्चीत थिजून गेलो. त्या संध्याकाळी अख्खं बालगंधर्व, बोरकर नावाच्या लाटेवर उसळून ओसंडून जात राहिलं.."आहे मनोहर तरी" या सुनीताबाईंच्या आत्मचरित्राबद्दल लेखक त्यांना म्हणतात ..."पुलंचं अख्खं आयुष्य ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीची एवढी प्रदीर्घ कहाणी आहे, ती तुमच्यादेखत घडली. तुमच्या काळातली आकाशाएवढय़ा उंचीची अनेक माणसं तुमच्या आयुष्यात, घरात राहून, वावरून गेली. अनेक प्रसंगांना, गप्पांना, महत्त्वाच्या वादविवादांना तुम्ही साक्षी होतात. हे सगळं नोंदवणारी, टिपू शकणारी, त्याचं महत्त्व माहिती असणारी प्रखर बुद्धिमत्ता तुमच्यापाशी होती; तर तुम्ही त्यातलं काहीही न लिहिता, पुलंनी कपाटात ठेवलेल्या शर्टाच्या घडय़ा मोडून त्यांची इस्त्री कशी विस्कटली, हे इतकं सामान्य काहीतरी कसं काय लिहिता तुमच्या पुस्तकात? याला काही अर्थ तरी आहे का?''

Send us a textजेव्हा नॉर्मनने त्याच्या बरे होण्याच्या शक्यतांबद्दल विचारले तेव्हा डॉक्टरांनी त्याला असं काहीतरी सांगितलं की ते ऐकून तो गार पडला:ते म्हणाले,"पाचशे रुग्णांपैकी फक्त एकच यातून वाचतो."त्या रात्री, नॉर्मनने जीवन बदलणारा निर्णय घेतला.‘जर पारंपारिक औषध त्याला वाचवू शकत नसेल, तर तो स्वतः त्याच्या जीवनासाठी लढेल‘ हाच तो निर्णय..!

Send us a textफळवाल्या म्हातारीला कृष्ण म्हणतो, "ती सगळीच फळं मला दे. "म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल."कृष्ण निरागसपणे विचारतो, "मोल म्हणजे काय ?" त्यावर ती समजावून सांगते, "लल्ला, आपण जेव्हा कोणाकडून काही घेतो, तेव्हा त्याच्या बदल्यात काही तरी देतो, त्यालाच मोल म्हणतात."कृष्णाचं बोलणं मोठं गोड आणि मन मोहून घेणारं आहे. तो तिला म्हणतो, "माझी आई तर मला रोज दही, दूध, लोणी देते. मला हवं ते सगळं सगळं देते. पण माझ्याकडून कधी काही घेत नाही. मग ती मोल का मागत नाही? गोपी सुद्धा मला दही दूध लोणी देतात माझ्यावर खूप प्रेम करतात पण त्या माझ्याकडून काही घेत नाहीत. "

Send us a textकाय अद्भुत होतं ते दृश्य!विजयी अल्फा नरने दुसऱ्याच्या मानेवर फक्त हलके दात टेकवले. चावा नाही, रक्तपात नाही . त्या क्षणी सत्तेचा प्रश्न सुटला होता.पराभूतात भेकडपणा नव्हता, विजेत्यात दया नव्हती — फक्त एक नाजूक समतोल होता. दोघांनीही एकमेकांकडे पाठ फिरवली. टोळी पुन्हा शांत झाली.

Send us a text‘पिट्सबर्ग डिसपॅच' या स्थानिक वृत्तपत्रात‘मुली कसल्या कामाच्या?' अशा आशयाचा एक लेख छापून आला. अपत्यप्राप्ती करून देणे आणि घर राखणे, मुली एवढ्याच कामाच्या असे त्या लेखक महाशयांचे म्हणणे. वयाच्या जेमतेम विशीत पाऊल ठेवलेल्या एलिझाबेथने त्यावर एक खरमरीत प्रतिक्रिया लिहून पाठवून दिली. ती संपादकांना आवडली. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात तिला एक छोटा स्तंभलिहिण्याची संधी दिली. त्याकाळी स्त्रिया सहसा टोपणनावाने लेखन करीत. वृत्तपत्राच्या संपादकाने 'नेल्ली ब्लाय' हेच नाव टोपणनाव म्हणून दिले.

Send us a textअगदी आदिमानवाच्या काळापासून उत्सव ही माणसाच्या मनाची गरज आहे. आदिमानव शोधीपारधी होता. अन्नाच्या, शिकारीच्या शोधात वणवणताना त्याला सगळीकडून शत्रूंचं, संकटांचं भय असे. त्या वेगवेगळ्या संकटांवर लक्ष ठेवायची जबाबदारी त्याच्या मेंदूतल्या एका केंद्राची होती. ते मेंदूच्या बुडाशी असलेलं बदामाच्या आकाराचं केंद्र (Amygdala) सतत धोक्याची घंटा वाजवत राही. मेंदूच्या इतर सगळ्या कर्त्याकरवत्या केंद्रांचं लक्ष नेहमी त्या बदामकेंद्रावरच खिळून असे.

Send us a textजेव्हा मोहम्मद घोरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला, तेव्हा "गजनीचे सर्वोच्च काझी व मोहम्मद घोरीचे गुरु निजामुल्क" यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले –"या घोरी या! आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्थानवर विजय मिळवून इस्लामचे नाव उजळवलेस. सांग, त्या ‘सोने की चिड़ीया' हिंदुस्थानचे किती पंख कापून आणलेस?"

Send us a textआपल्या हाताला धरून चालायला शिकलेली आपली मुलं जेव्हा मोठी होतात... शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आचार-विचार-अनुभवांची कक्षा रुंदावत जाते. त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक बऱ्या-वाईट गोष्टीचा सामना करण्यातून ती परिपक्व होत जातात... आणि मग अशी वेळ येते जेव्हा त्यांच्या हाताला धरून आपली वाटचाल सुरू होते...

Send us a textरमेशजींचं वय आता ६५ वर्षांचं झालं होतं. वयानुसार त्यांचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. आधी ते खूप हसतमुख आणि सर्वांशी मिसळणारे होते, पण आता त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागला होता. कोणत्याही छोट्या गोष्टीवर राग येणं, मुलांवर ओरडणं, किरकोळ कारणांवर नाराज होणं, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता.घरच्यांना खूप त्रास व्हायचा. पत्नी विचारायची, “काय झालंय रमेशजींना? आधी इतके आनंदी असायचे, आता जरा जरी काही झालं तरी संतापतात.” मुलंही आता त्यांच्याशी बोलायला घाबरू लागली होती. रमेशजींनाही जाणवू लागलं होतं की ते स्वतः बदलले आहेत. त्यांनाही स्वतःवर राग यायचा — “मी असं का वागतोय? हा चिडचिडेपणा माझ्यात आला कुठून?”

Send us a text'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. तरीपण त्याला याची जाणीवच झाली नाही, हे तिथं उपस्थित असलेल्या होरॅस वेल्स या डेंटिस्टनं पाहिलं. दात काढताना त्याचे पेशंट मोठ्यामोठ्याने ओरडल्याने बाहेर बसलेले पेशंट देखील घाबरून पळून जात असत म्हणून तो त्रस्त होता. मग त्याने विचार केला, उद्या आपण याचा प्रयोग करून बघू.. आणि हा प्रयोग त्याने स्वतःवरच लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचा दात काढून घेऊन केला. त्याला अजिबात दुखले नाही. तो यशस्वी झाला.

Send us a textमानसी जन्मतः कर्णबधिर. तिचं बधिरत्व १०५ टक्के: म्हणजे जलद लोकल जाताना होणाऱ्या आवाजाने फलाट दणाणतो तशा प्रकारच्या आवाजाला मानसीने प्रतिसाद दिला नाही. .. एके दिवशी मानसी दरवाजात उभी असताना जवळचे नातेवाईक घरी आले आणि मानसीला म्हणाले, 'ऐ बहिरे बाजूला हो... हो की बाजूला' असं दोन- तीनदा म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. मी खूप रडले आणि मनाशी पक्कं केलं. माझी मुलगी बहिरी असेलही, पण सामान्य मुलांपेक्षा मोठी होईल... मी निर्धार केला, जणू पेटून उठले... कानाने अजिबात ऐकू येत नसल्याने कंपनांची जाणीव हेच तिचं इंद्रिय झालं होतं कंपनांच्या जाणिवेतून सुरू झालेला तिचा प्रवास आज तिला अभियंता म्हणून स्वतःच्या पायावर उभा करता झाला. यामागे आहे, तिच्या आईची अतूट इच्छाशक्ती... !

Send us a text"आयुष्याचा वेग आपणच कमी करावा लागतो, काम कधीच संपत नसतात, आपणच ठरवून थांबायचं असत..काही बिघडत नाही चार गोष्टी झाल्या नाहीत तर ."

Send us a text"तू नाही रे महिषासुर, तू माझ्यातला महिषासुर मारला आहेस, गैरसमजा चा, रागाचा.."

Send us a textप्रत्येक पालकाला आपल्या मुलाला एक चांगली व्यक्ती बनवायचे असते, जेणेकरून तो भविष्यात एक चांगला माणूस म्हणून घडू शकेल. जर आपण चांगल्या पालकत्वाबद्दल विचार केला, तर यामध्ये मुलाला चांगले संस्कार देणे, त्याच्या पोषणाची काळजी घेणे, मुलाच्या शारीरिक आणि मानसिक समस्या समजून घेणे इत्यादींचा समावेश होतो. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण जपानी पालकांकडून काही टिप्स घेऊ शकतो. उत्तम पालक बनणं हे खूप कठीण काम आहे. यात बरेच चढ-उतार येतात. जपानी मुले, कोणत्याही वयाची असो, त्यांची जगण्याची स्वतःची एक विशिष्ट पद्धत असते जी त्यांना जगावेगळे व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध करते. खरं तर, जपानी मुल सार्वजनिक ठिकाणी रडताना दिसणं जवळजवळ दुर्मिळ आहे! कारण जपानी पालक मुलांच्या संगोपनासाठी खूप वेळ देतात. आपल्या मुलाला एक चांगला नागरीक बनवण्यासाठी त्यावर संस्कार करतात. म्हणून जपानी पालकत्वाची पद्धत जगभर प्रसिद्ध आहे. आज आपण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यासाठी काही जपानी टिप्स पहाणार आहोत.

Send us a textएकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण ‘आलं सरकारांच्या मना तिथं देवाचंबी चालंना‘ अशातली गत होती.मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील…छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं…., विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं.

Send us a textलहानपणी शाळेचा पीळ फार घट्ट असायचा.किंग जॉर्जमध्ये असताना आम्हाला वाटायचं — "आम्ही सॉलिड स्मार्ट आहोत, धीट आहोत." बालमोहनच्यांना आम्ही ‘गणू', बावळट म्हणायचो. एखाद्याचं अक्षर पाहून मी सांगू शकतो की तो किंग जॉर्जचा की बालमोहनचा! कारण बालमोहनच्यांचं अक्षर म्हणजे मोत्याचे दाणे! ते हुशार असायचे, पण आमच्या मते अतिसुसंस्कृत — शिवीला अपशब्द म्हणायचे इतके सौम्य!आणि त्यांचं आमच्याबद्दलचं मत? "अतिशहाणे, हुशार, पण वात्रट!"आणि आजही कुणी विचारलं की — “किंग जॉर्ज की बालमोहन?” तर हसू येतं आणि आठवणींचं दार उघडतं!

Send us a text"काका मला डॉक्टर किंवा संगीतकार व्हायचा नाही. मला अगदी साध्या मुलाप्रमाणे जगायचं स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि हे मी माझ्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितलेय म्हणून तर मला या साध्या बसने प्रवास करता येतो."" तुम्ही माझ्या घरी याल तर तुम्ही पहाल की दोन परदेशी गाड्या ड्रायव्हर सकट सतत दाराशी उभ्या असतात. मी म्हणायचं अवकाश ते मला अकॅडमी पर्यंत सोडतील आणि संध्याकाळी परत घेण्यासाठी तिथेच थांबून देखील राहतील."वाटलं, संचित आणि त्याचे आई-बाबा खऱ्या अर्थाने एकमेकांचे संचित आहेत!

Send us a text"महागाई वाढली आहे हे तर नक्की. परंतु पैशाला किंमत उरली नाही असं जे आपण सहज म्हणून जातो ते खरं आहे का?""माझ्या आयुष्यात एक प्रसंग काही वर्षांपूर्वी घडला आणि एक दोन आठवड्यातला. पण दोन्ही लक्षात राहिले. कारण पैशाला किंमत आहे हे पटवून देणारा एक, आणि दुसरा पैशापेक्षा माणुसकी किंवा सहृदयतायांचं दर्शन घडवणारा!

Send us a textलोनपोगारनं सकाळीच आपल्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला, “बाळा, ह्या शंभर मेंढ्या घेऊन शहरात जा, पण हे लक्षात ठेव — ना त्यांना मारायचं, ना विकायचं! आणि तरीही शंभर पोती जव घेऊनच परत यायचं.तो शहरात एका रस्त्याच्या कडेला पाणावलेल्या डोळ्यांनी बसला. तेवढ्यात एक सुंदर तरुणी आली, म्हणाली — “काय झालं रे? एवढं चिंतातुर का?” त्याची हकीकत ऐकल्यावर ती हसली आणि म्हणाली — “अरे एवढंच? मेंढ्यांची लोकर काढून विक आणि त्या पैशात शंभर पोती जव घेऊन घरी जा!”. मुलगा खुश झाला !

Send us a textगर्दीत वाट काढत एस टी च्या आत घुसणार तोच मला बघून कंडक्टर एकदम ओरडला." ओ, या बाईला आधी चढू द्या. ते दिवसा या बाईन् दिलेला शाप लागला मला.दोन दिवस जेवनाचे वांदे झालेले."मी उभी थरारले.मी दिलेला शाप ? नाही रे बाबा , माझ्यासारखी सामान्य लेकुरवाळी गृहिणी कसला शाप देणार ?गाडीत चढल्यावर आतून जाणवलं की हा शाप बाईने कुठे दिला होता ? हा तळतळाट 'आईचा' होता.कोणीही आतून अगदी आतून...आत्म्यातून दुखावलं गेलं तर उमटणा-या तळतळाटाची आग भाजून काढतेच काढते.तळतळाट घेऊच नये कोणाचा !

Send us a textएक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्य गेले. डॉक्टरांच्या टीमने आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला .ऑपरेशन साठी फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे त्या कॉलमच्या पुढे त्यांनी E.D. अस लिहलं. आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ...."ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील!"........

Send us a text“काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”* “ होय आहे !."“कधी घेतलात?”* “झाली की १५-२० वर्षे.”“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”* “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”“आता कुठे असतो.”* “माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.”“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”* “अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.”

Send us a textत्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती.."पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच?'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून..त्यातील काही लोक बोलू लागलं..'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत..‘'आवो सायेब.. या माकडास्नी दया करू नका..रामाची सेना ही.. पर लई उपद्रावी.‘त्या प्राणीप्रेमी लोका पैकी काही लोक आमच्याजवळ आले.'सायेब.. कुणीकडं?'कोल्हापूरला जातोय..'मग या माकडीणीला जनावरांचे सिव्हीलला नेऊन पोचवा.. बाकी सारे आमची कोल्हापूरची मानसं करत्यात.

Send us a textडेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल' आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल' या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!'' पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन'. तिथपासून आजपर्यंत डोपामाईन, ग्लुटामिक ॲसिड, सिरोटोनीन अशी १००-१२५ जीवरसायने आणि त्यांचे परस्पर संबंध यावर संशोधन होऊन स्किझोफ्रेनिया, नैराश्य, अतिचिंता, मंत्रचाळेपणा अशा मानसिक आजारांबरोबरीने कंपवात, स्मृतिभ्रंश अशा न्यूरोलॉजिकल आजारांवरची प्रभावी औषधं बनली आणि बनत आहेत.

Send us a textलाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl' (झॉकलेटल) म्हणजे ‘कडू पाणी'! मायन लोक ते रसायन त्यांच्या समारंभांत देवाचं पेय म्हणून चाखतमाखत चवीचवीने पीत. नंतरच्या ऍझटेक संस्कृतीनेही मायन लोकांकडून ते कडू देवपेय हट्टाने घेतलं. स्पॅनिशांनी ते युरोपात नेलं.

Send us a textदुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला.सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता.तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले.मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे सुरु झाले, "ए चोरा! काय करतोस रे?".......

Send us a textखूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का लाजायचे ?अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खाताना सुद्धा..." आसपासचे लोक काय म्हणतील ?"यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.....

Send us a textपरवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य आहे सांगत होते, तर काहीजण मान्य नसल्याचे वाईट चेहरे. शेवटी तिघा-चौघांनी एकमेकांशी बोलून प्रोजेक्टचा मजकूर नक्की केला. या चर्चेत फक्त इमोजी टाकणाऱ्यांचं मत शेवटपर्यंत समजलं नाही ते नाहीच.

Send us a textगोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला targeted drug delivery म्हणतात.

Send us a textजाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात', असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्यांना विशेष ट्रेनिंग मिळालेले असते. काही स्टंट कॉम्प्युटरच्या मदतीने केलेले असतात.

Send us a textएक महिला दुकानात आली आणि म्हणाली, "सेठ, तुमचे दहा रुपये घ्या... !""तुम्ही "७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात, मला हे दहा रुपये देण्यासाठी?" त्या महिलेने सहज उत्तर दिले, "हो, मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले.माझा नवरा आता या जगात नाही, पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, "दुसऱ्याच्या मालकीचा एक पैसाही खाऊ नका. कारण देव कधीही हिशोब मागू शकतो. आणि आपल्या मुलांनाही त्या हिशोबाची शिक्षा होऊ शकते."

Send us a textलग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ..."तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"तो बावचळला ...गोंधळला ...आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!

Send us a text"तुम्ही इथे आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी नवऱ्याला जागं करते. हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं. बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल." हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या थंडीत इथं येऊन कुडकुडत तर पडावं लागणार नाही ना आता." शेतातलं पीक उद्ध्वस्त झाल्यावर अन्य लेखकाच्या कथेत शेतकऱ्याने आक्रोश केला असता, पण हा म्हणतोय, 'मरण्यातनांतून तरी सुटका झाली'! भारतीय शेतकऱ्याचं जिवंत चित्र प्रेमचंद यांनी 'पुस की रात' मधे रेखाटले आहे.

Send us a textटपरीपुढच्या बाकड्यावर डिगा नाना पेपर वाचत बसले होते. पप्याचं अगोचर बोलणं ऐकलं म्हणून न राहवून ते महाद्याला म्हणाले "आत्ता पस्तोर बापाला दहा लाख रुपायला झुपीवलंय ह्यनं. गावातल्या समद्या टपऱ्यावर अन् हाटेलात उधारी हाय ह्यजी. बापाची गाडी घेवून फिरण्याबिगिर ह्यला कायबी येत न्हाय. मोप शिकून इंजिनिअर झालाय म्हणत्यात, पण आजून रुपायाची मिळकत न्हाय. नुसतं बापाच्या जीवावर जगतंय. आरं त्येला इंग्रजी येत असून त्येनं काय दिवा लावलाय अख्या गावाला ठाव हाय की. महाद्या तू जर शिकला असता तर आता जी काम करतूय ह्यातलं एकबी काम त केलं नसतंस, कारण शिक्षण विद्या देतंय, तशीच लाजबी देतंय बाबा.”

Send us a textपावसाचंही तसंच झालंय. आताशा वेळ नसतो त्याच्याकडे. वर्षाची सरासरी एका दिवसात गाठतो. कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो. अचानक येतो मग. सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा, पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन. विचारलं तर म्हणतो "आता मन रमत नाही गं आई". पावसाचंही तसंच झालंय. त्याचं आता मन रमत नाही. आता तो बसरतो फक्त 'बॅकलॉग' भरण्यासाठी. त्याच्याकडे वेळ उरला नाही. तो कुणाची विचारपूस करत नाही की कुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही.दोस्तहो पाऊस बदललेला नाही आणि चुकलेलाही नाही तो तर आपल्यासारखंच वागतोय. मग त्याला दोष देऊन कसं चालेल? तरीही एका गोष्टीने व्याकूळ व्हायला होतं. अपराध, चुका करतात वेगळेच लोक. आणि त्याचे 'वेदनासूक्त' गावे लागते भुकेजलेल्या श्रमलेल्या अर्धपोटी निरपराधांना. हा कसला न्याय म्हणायचा ?

Send us a textपरवा देव भेटला होता.माणसं बनवतांना काय त्रास होतो ते सांगत होता.म्हणाला, फार कष्टाचे काम, जरा उसंत नाही, नाही आराम.म्हणजे आकार साधारण सारखे असले तरी चालतात;पण डिझाईन्स वेगवेगळी बनवावी लागतात.म्हणून साचा बनवून भागत नाही,कारण सरळ नाकावर प्रत्येक वेळी टपोरे डोळे शोभतीलच असं नाही.आणि गोल चेहऱ्याला एक सारखी जिवणी लावून चालत नाही, म्हणूनच त्रास होतो.

Send us a textफ्रिज बिघडला.टीवी बंद.वाय-फाय डाऊन.शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं."आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.सहा वेळा प्लग काढून लावला.टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.नेट कनेक्शन गायब.सगळीकडे जणू "No Signal".तो चिडून म्हणाला,"हे घर आहे की सर्वसंकट केंद्र? दर आठवड्याला आपलं काहीतरी बिघडतंय."

Send us a textडॅा. राजेंद्रप्रसाद भाषणासाठी उठले. पण ते जेव्हा माईककडे न जाता, व्यासपीठाच्या पाय-या उतरू लागले तेव्हा मात्र सारेच बुचकळ्यात पडले. राष्ट्रपती खाली उतरले. चालत चालत पहिल्या रांगेतल्या त्या विशिष्ट खुर्चीपर्यंत गेले आणि तिथे बसलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्यांनी!'ती व्यक्ती कोण आहे,' हे तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला माहित असल्यानं, तमाम पुणेकर जनतेने राष्ट्रपतींच्या या कृतीला पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा गजर करून मनमुराद दाद दिली. कारण, *ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नव्हतं तर साक्षात अण्णा होते. अण्णा म्हणजेच ' महर्षी धोंडो केशव कर्वे'!

Send us a textखेडेगावात डॉक्टरी करणाऱ्या अश्विनीताई गावातील स्त्रियांमध्ये फार प्रिय आहेत. भिवंडीहून आवर्जून त्यांच्याकडे येणारी विठाबाई गावातील मुलीला सांगते, "तुला काही आजार झाला नं, तर नेरळला जा. तिथं माझी आई राहते". पोटाची खळगी भरण्यासाठी देहाची विटंबना करून घ्यावी लागलेल्या लांबून येणाऱ्या विठाबाईची कहाणी मनाला चटका लावणारी आहे.

Send us a textदेवीचे नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा . आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची. किती सुखाचे दिवस होते ते . सहज मिळणारा हा निर्मळ आनंद होता.आज वाड्यातल्या काकू ,ताई आठवल्या...न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती कौतुकानी करणारी आई आठवली...पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून घेणारी आजी आठवली... आमच्या पायाला टोचू नये म्हणून खडे सुद्धा ती उचलून टाकायची...!

Send us a textआम्ही पुढे विविध ठिकाणी ५० मशीन्स लावल्या असतील. या दरम्यान मशीनची काच फोडणे. ड्रिंक्सच्या बटनांवर काळे फासणे, मशीनवर आपली नवे लिहिणे/कोरणे , "भलत्याच" जाहिरातींची पोस्टर्स चिकटवणे, मशीनच्या चावीच्या होलमध्ये एम - सील भरणे असे अनेक भयानक प्रकार लोकांनी मशीन्सबरोबर केले. शेवटी आम्ही प्रत्येक मशीनसाठी एक ऑपरेटर ठेवायचा निर्णय घेतला. तो ग्राहकांकडून पैसे घेऊन मग त्यांना हवे ते ड्रिंक द्यायचा.

Send us a textपरवा मला एका बर्थडे पार्टीत जाण्याचा योग आला. बच्चेकंपनी एकदम आनंदात दिसत होती. एन्टरटेनर कम इव्हेंट अॅार्गनायझर मुलांचे खेळ वगैरे घेत त्यांना बिझी आणि आनंदात ठेवत होता. त्याच्या एका खेळात त्याने मुलांना त्यांचा आवडता पदार्थ विचारला. त्यावर सर्व मुलांनी सांगितलेले पदार्थ होते: पिझ्झा, बर्गर, नुडल्स, सॅंडविच, चीझी पास्ता, मन्चुरियन... आणि असेच आपल्याकडचे नसलेले इतर पदार्थ. एकाही मुलाने / मुलीने थालिपीठ, घावन, आंबोळी, पोहे, शिरा, उपमा, सांजा अशी नावं घेतली नाहीत. आपल्या पारंपारिक पदार्थांवर बाहेरच्या पदार्थांचं जबरदस्त आक्रमण झालेलं सहजच समजत होतं.

Send us a textजेव्हा करप्रणाली मध्ये केलेल्या बदलाला सरकार तर्फे "टॅक्स रिलीफ" किंवा "टॅक्स गिफ्ट" असे म्हटले जाते तेव्हा ते एक फ्रेमिंगच असते. किंवा जेव्हा एखाद्या गुन्ह्याला धर्माच्या रंगाने ओळखले जाते तेही एक फ्रेमिंग असते. जेव्हा एखादा नेता आपल्या कामाऐवजी आपल्या घराण्याची, धर्माची, हलाखीच्या दिवसांची कहाणी सांगत असतो तेव्हा तो फ्रेमिंगच करत असतो. जेव्हा एखादी कंपनी आमची उत्पादने तुम्हाला तंदुरुस्त करतील असे म्हणण्याऐवजी इतरांची उत्पादने तुमच्या आरोग्यास हानीकारक आहेत असे म्हणते तेव्हा ते देखील फ्रेमिंगचं असते.

Send us a textत्या दिवशी रात्री मी स्वयंपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा उलटून भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच..एका हातात पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चिमट्याने गॅसवर धरला, लगेच तो फुगून आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला "झाला पण फुलका?" "इतका सोप्पा??"मी म्हणाले, "हो, कठीण नसतोच मुळी फुलका". खर तर, सगळा स्वयंपाकच मुळी सोप्पा असतो.

Send us a textमाझा स्वयंपाक चालू होता. इतक्यात लेक धावत आली, "आई, मधू मावशीचा फोन आलाय."मी कणीक मळत होते..लेकीला म्हणाले टाक स्पिकर वर...कामाचं बोलून झाल्यावर गाडी आपोआप जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळली.."आज स्वयंपाक काय केलास ??"मी म्हणाले..."भरीत.!"मैत्रिण म्हणाली, "मी पण आज भरीत आणि श्रुती कडे पण आज भरीत." या वर आम्ही दणदणीत हसलो ..

Send us a textबुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेनिमित्ताने अनुभवलेलं जंगल म्हणजे मनावरचं न पुसलं जाणारं शब्दचित्र.... अंधारलेल्या जंगलात निःशब्द रात्री शांततेवर जराही ओरखडा उमटू न देता जेव्हा लांबून चार पायांची आकृती दिसू लागते... नि हळूहळू अस्पष्ट पायरव ऐकू येतो...